Monday, February 28, 2011

घरटं - सासवा

सासू-सुनेचं नातं असं नुस्तं म्हटलं तरी भांडणाचे आवाज कानात घुमू लागतात. पण ’मॉडर्न डेज सासू-सून’ असलेल्या घरांमध्ये जरा डोकावून पाहिलं की लक्षात येतं, ‘अरेच्या! वादविवाद कायम असले तरी बोलण्यातले विषय बरेच बदललेत. हे नातंच बदलतंय का हळूहळू!’



घरं म्हटलं की, त्यात अनेक नाती आणि त्यातले वाद असणारच...वाद म्हटलं की, हमखास आठवणारं एकच नातं, सासू-सुनेचं!


मनुष्य या प्राण्यामध्ये तीन प्रकार असतात- सासू, सून आणि इतर! सासवांमध्येही प्रकार आहेत. सुनेशी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणार्‍या, सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवणार्‍या आणि इतर!

या इतर सासवा पहिल्या प्रकाराच्या जरा अलीकडे आणि दुसर्‍या प्रकारच्या बर्‍याच पलीकडे असतात. त्या उगीच काहीबाही करत असतात. सुनेला लहानसहान गोष्टींमध्ये डिवचणं हा त्यांचा छंद असतो.

सुनांचेही प्रकार आहेत. सासूला स्वतःची आई समजणार्‍या, सासूला श्‍वास घेणं मुश्कील करणार्‍या आणि इतर! इतर वर्गातल्या सुना सासूला सतत डिवचण्याचं काम करत असतात.

आधीचे दोन प्रकार तसे ‘नॉट सो मच इन फॅशन’ असल्यामुळे फक्त ‘इतर’ वर्गाबद्दलच बोलूया.

या नात्याइतकं अजब रसायन दुसरं नाही. ‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हणच या नात्यासाठी बनवली गेली असावी. सनातन काळापासून या नात्याला वादाचा शापच आहे. बदलत्या काळात वादाचे विषय बदलले इतकंच. हो पण, आपला मुलगा/नवरा कसा दुसरीच्या मुठीत आहे यावर आजही सासवा-सुनांचं एकमत असतं. असो.

अतिशयोक्ती वाटेल, पण एक गमतीशीर किस्सा हल्लीच ऐकायला मिळाला. नवीन घराचं काम करताना सासूच्या बेडरूमला लाल रंगाचं फर्निचर चांगलं दिसणार नाही हे सुनेने सर्वांना (सासू सोडून) पटवून दिलं. काम पूर्ण झाल्यानंतर सासूने रंगारी, ग्रिलवाला, सुतारांसकट सगळ्या कामगारांना एका रविवारी घरी मटणाच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या रविवारी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.

दरवेळी सासूच अशी वागते असंही नाही. ओळखीतल्या एक सासूबाई इतक्या हौशी आहेत की, दिवसभर घरकामांमध्ये रेंगाळणार्‍या सूनबाईला त्यांचा राग येतो. या सासूबाई प्रवचन, भजनी मंडळ, पिकनिक असं सगळं करतात. तरीही त्यांच्याकडे केसांना मेंदी लावणं, फेशिअल करणं, शॉपिंग यासाठी वेळ असतो. इतकं कमी की काय, म्हणून त्या दिवाळीचा फराळ, उन्हाळ्यात पापड, कुरड्या हे सगळंही करतात. यंदाच्या दिवाळीत सुनेला फेशियल केल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांनी चकल्या तळायला बोलावलं म्हणून राग आला होता.

ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली, पण या प्रसंगांवरून एक लक्षात आलं की, सासू-सून हे नातंही आता बदलतंय. सासूबाईंसाठी वेगळी रूम आणि त्यातली रंगसंगती ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचवेळी सुनेलाही त्यात हस्तक्षेप करण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळतोय. एकाच घरात सासू-सून मिळून पार्लरच्या अपॉइंटमेंट घेताहेत, एकमेकींच्या डिझायनर साड्या एक्सचेंज करताहेत. अनेक सासवांनी स्मार्ट सूनबाईंकडून शिकवणी घेत स्वतःमध्ये सकारात्मक बदल केलेले दिसतात. आपणही नीटनेटकं राहायला हवं, बदल म्हणून तरी घराबाहेर पडायला हवं हे स्वतःला समजावून दिलंय.

शिकलेल्या, नोकरी करणार्‍या सुना, बायकोला समजून घेणारे-सन्मानाने वागवणारे नवरे, बदलत्या जगाचं भान येत असलेल्या सासवा असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. मागच्या पिढीतल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अनेक जणी आज सासूच्या भूमिकेत आहेत. त्यांना बदलणारं, विस्तारणारं जग माहितीचं आहे. या सगळ्याचा परिणाम एका अत्यंत नाजूक नात्यावरही होतोय.

ओळखीतल्या एक सासूबाई पार्टटाइम नोकरी करतात. त्यांची सून मात्र काही कारणांनी घरीच असते. या सासूबाई रात्री उशिरा, कामाच्या ठिकाणी जेवूनच घरी परततात. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या सीरियल्स पाहत जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. घराबाहेर पडल्यानंतर सून काय करते, काय जेवण बनवते असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो. इतकंच नाही, अनेक छोट्या-मोठ्या समारंभांनाही त्या सुनेलाच सांगतात, ‘तू जाऊन ये. तेवढाच तुझा टाइमपास.’ त्यामुळे, भिशी मंडळ, किटी पार्टी, सोसायटीच्या पूजा वगैरेंमध्ये सूनबाईंचीच हजेरी असते. यात सुनेला चिडवण्याचा हेतू नसतो. उलट सुनेनं घराबाहेर पडावं यासाठी त्या प्रयत्न करत असतात. आणखी एक सासूबाई तर सुनेसाठी शॉपिंगही करतात. हळदीकुंकवाच्या भेटवस्तूंपासून तिच्या कपड्यांपर्यंत सगळं काही. लग्नानंतर चांगला टेलर, पार्लर, वडापावची गाडी या सगळ्यांशी सुनेची ओळख सासूबाईंनीच करून दिली.

हे नातं बदलण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक हा टीव्ही असावा. अगदी जवळच्या नात्यातल्या एका सुनेने सीरियल्स पाहण्याचं कारण सांगितलं होतं,‘ ही माझ्या आयुष्याची फँटसी आहे. या बायकांसारखं आयुष्य असलेलं मला आवडलं असतं, पण ते तसं नाही. मग बघण्याची तरी मजा घ्यायची.’

काहीही असलं तरी या कार्यक्रमांनी सासू-सुनेला किमान काही तास एकत्र ठेवण्याची किमया केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यातल्या प्रत्येकीची साडी, मंगळसूत्राचं डिझाईन, एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स अशा अनेक विषयांवर चहाच्या घोटासोबत हल्ली गप्पा रंगतात.

हा बदल नेमका काय आहे? याची प्रचिती काही दिवसांपूर्वीच आली. एका इंग्रजी वृत्तपत्राची गुळगुळीत पुरवणी हाताळत सासूबाईंनी विचारलं, ‘या विद्या बालनचा कोणी बॉयफ्रेंड नाही अजून?’

मी आहे!

मी हा शब्द फार छोटा आहे, पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. अनेक मोठ्या शब्दांचा, विचारांचा, भावनांचा बाप म्हणजे ‘मी’. या शब्दाचा अर्थही परिस्थिती आणि काळानुसार बदलत राहतो. तो कधी स्वाभिमान असतो, कधी त्याग असतो, तर कधी अहंकार. आपण कुणाशी व कुणाबद्दल बोलत आहोत यावरही हा अर्थ वेगळे वळण घेतो. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणात ‘मी’ असतोच. तो असावाही, पण तो हवा तेवढाच असावा. आपण आपल्यात गुरफटून राहिलो तर त्या ‘मी’ला काहीच अर्थ राहत नाही. स्वार्थ आणि त्याग हे खरेच, पण दुसर्‍यांसाठी ठेवलेल्या स्वार्थाची रंगत वेगळीच असते. तसेच दुसर्‍यांसाठी ‘मी’ जोपासला तर त्या ‘मी’चे नकळत ‘आपण’ होते. ज्या लोकांसोबत ‘मी’ म्हणजे ‘आपण’ असे वाटते त्यालाच नाती म्हणतात. बाकी सगळे वरवरचे बुडबुडे. स्वत:वर प्रेम करा, आपल्या असण्याचा स्वाभिमान बाळगा, पण त्या स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात होता कामा नये. आपण आपल्या मोठेपणाचे पोस्टर जगभर लावणे याला स्वाभिमान म्हणत नाहीत. मोठ्या माणसाला ‘मी मोठा आहे’ असे सांगावे लागत नाही. आचारांनी आणि विचारांनी मोठे व्हा. अहंकाराच्या सागरात सर्वच बुडून मरतात. त्यात वाचणे कठीण असते. त्यामुळे या सागरात उडी टाकण्याचा विचार सोडा. स्वाभिमानाच्या संथ नदीचा अनुभव घ्या. त्यात ‘मी’ असतो. आपल्या जगाबाहेर थोडेसे डोकावा आणि आपल्या जगातही आपल्यांना जागा द्या. ऑफिसमध्ये, घरी, समाजात वावरताना स्वत:तला मी जिवंत ठेवून सर्वांसोबत आपण व्हा! स्वत: बदलू नका, दुसर्‍यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. ‘आपण’ झालात तर बदल आपोआप घडतील. तुम्हाला कळणारही नाहीत आणि ते सुखदही वाटतील. आता तुम्हीच पहा, या लेखात ‘मी’ किती वेळा आला, पण मी या ‘मी’त तुम्हाला पाहिले. हा लेख संपता संपता माझ्या ‘मी’चा ‘आपण’ झाला तर माझे ‘मी’ सार्थकी लागेल. आजकालचा ‘मी’ म्हणजे ‘इगो’ सोडून द्या. आपलेपणा आणि समजूतदारपणा त्याहून लाखमोलाचा आहे. कुणाला तरी म्हणा, ‘मी आहे’ तेव्हा त्या ‘मी’ला खरा अर्थ येईल.


‘मीच रहा, पण आपण व्हा’ या लेखात किती मी आहेत ते मोजा. जास्त असतील, पण ते कमी वेळा आलेल्या ‘आपण’पुढे फिके पडतील. ‘मी आहे.’

फॅट फ्री मद्य

सगळेच मद्य मुळात ‘फॅटफ्री’ असते. अगदी खरंच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईनसारख्या काही ड्रिंक्समध्ये नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी ‘आहे काय न् नाही काय’ असे. मग तरी, सर्वसामान्य समजाप्रमाणे (हा समज 100% बरोबर नाहीये) ज्या व्यक्ती मद्यपान करतात त्या जाड का असतात?


कुठल्याही मद्यात इथेनॉल असते जो एक अल्कोहोल (केमिकल नाव)चा प्रकार आहे. एरवी आपण काही पण खाल्लं की आपलं शरीर लगेच त्याचे पचन सुरू करते आणि अन्नातल्या ग्लुकोज/शर्करा, फॅट (चरबी), प्रोटिन शोषून घेतले जाते आणि जर यापैकी कुठलाही पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात असेल (खाल्लं असेल) तर त्याचे ‘फॅट’ किंवा चरबीमध्ये रूपांतर होऊन त्याचे थर आपल्या शरीरावर जमा होत राहतात. माणसाचं वजन वाढणे ही पण एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. असे एका रात्रीत कोणी 10 किलो वजन वाढवू शकत नाही. जेव्हा आपण महिनोन् महिने अशाप्रकारे गरजेपेक्षा जास्त खात राहतो तेव्हा आपण जाड होतो.

तर मग, अल्कोहोलच्या बाबतीत काय घडतं? समजा तुम्ही बीयर पिताय (फक्त समजा!!) आणि त्याबरोबर फ्रेंच फ्राइज किंवा काजू खाताय (कुठलाही चखणा) अशा वेळी त्या चखणाच्या कॅलरी शोेषून घ्यायच्या आधी अल्कोहोलच्या कॅलरीज ऍब्सोर्ब होऊन वापरल्या जातात. म्हणजे, तुम्ही जो चखणा खाल्लात त्या सगळ्या एक्स्ट्रा कॅलरीज होतात. आणि शिवाय, एका माईल्ड बीयर पॉईंटमध्ये साधारण 150 कॅलरीज असतात. तुम्हीच सांगा फक्त एक पॉईंट बीयर कोण पितंय? जरी व्हिस्की, व्होडका पीत असलात तरी त्यात मिक्स करता त्या जूस, कोला इ.मधे पण भरपूर कॅलरीज असतात. ड्रिंक्स घेताना कॅलरीजचा हिशेब ठेवणं खूप अवघड होतं आणि म्हणून ‘अल्कोहोल कॅलरीज’ खूप जास्त प्रमाणात शरीरात वाढतात. तर एकूण तुमच्या पेयाचा उष्मांक बराच वाढल्यामुळे तुमचे वजन वाढते.

पण मग त्या ‘बीयर बेली’चं काय? 25+ वर्षाच्या पुरुष किंवा स्त्री दोघांच्या शरीरात एक्सेस चरबी जमा होण्याचे ठिकाण म्हणजे ‘पोट’. स्त्रियांच्या शरीरात हिप्सवर पण पुष्कळ प्रमाणात चरबी जमा होण्याची प्रवृत्ती असते. जेव्हा अल्कोहोलमधून मिळणार्‍या कॅलरीज वाढतात तेव्हा त्या सर्व चरबी बनून जाडी वाढवतात. बहुतेक चखणा पदार्थ कॅलरी रिच असतात.

तात्पर्य अल्कोहोलने वजन वाढतं, पण त्याच्यात फॅट किंवा साखर असते म्हणून नाही तर त्याच्यातून मिळणार्‍या अल्कोहोलिक कॅलरीज खूप असतात आणि जोडीला असलेला चखणा पण त्या आगीत तेल-तुपाचं काम करतं म्हणून.

(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)

नो स्मोकिंग!

आता तरी स्मोकिंग सोडा . . .
वॉशिंग्टनमधील वृत्त स्मोकिंग करणार्‍यांसाठी धक्कादायकच आहे. तेथे भाड्याच्या घरात धूम्रपान करण्यास घरमालकांनी पायबंदी घातली आहे. अमेरिकेत रेस्टॉरंट, कार्यालय, सार्वजनिक स्थळे, क्लब व बीयर बारमध्ये स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातले आहे. भविष्यात धूम्रपान करणार्‍यांची मोठी गोची होणार आहे. त्यांना धूम्रपान करण्यासाठी वारंवार दंड भरावा लागेल किंवा सिगारेट ओढणे तरी बंद करावे लागणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांना हृदयविकार, कॅन्सर व इम्फेसिमासारखे भयानक आजार होऊ शकतात. संयुक्त राष्ट्राच्या 19 राज्यांमधील सुमारे 2300 शहरात सिगारेट ओढणार्‍यांविरुद्ध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स, शिकागो व वॉशिंग्टन आदी मोठी शहरे सहभागी झाली आहेत. हिंदुस्थानातही सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीविरुद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.

एवढे असूनदेखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदुस्थानात 25 कोटी लोक सिगारेट किंवा तंबाखू सेवन करतात ही धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयातून उपलब्ध झाली आहे. वयाच्या 30 ते 40 वषार्र्त हार्टऍटॅक येण्यामागे सिगारेट ओढणे हे सगळ्यात मोठे कारण असल्याचे कॅन्सर रोगतज्ज्ञांनी म्हटले आहे.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.

सतत आनंदी राहण्यासाठी. . .

* आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा.


* समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.

* दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.

* आवडते गाणे पुन: पुन्हा ऐका व गुणगुणत राहा.

* चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा.

* लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा.

* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या. दीर्घ श्‍वसन करा.

* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्‍या चेहर्‍याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा.

* एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा.

* नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा

* चार वर्षांचे बालक दिवसात साधारणत: 500 वेळा हसत असते तर एव्हरेज मनुष्य जेमतेम 15 वेळा. यामुळे स्ट्रेस वाढत जातो. याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा.

* शरीरातील 83 टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात. याकरिता भोवतालाचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.

* रिकामे मन सैतानाचे घर असते. त्याकरिता स्वत:ला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा.

* संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या.

* चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा.

* विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो.

सौजन्य :- मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

Sunday, February 27, 2011

बिनधास्त मराठीतूनच शिका!

केवळ इंग्रजी बोलता आले म्हणजे प्रगती होते या एकमेव (गैर)समजुतीने जे पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. त्यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे ‘इंग्रजी शिकणे व इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न बाबी आहेत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की विद्यार्थ्यांचा बौद्धिक, आत्मिक विकास साधायचा असेल तर मेंदूला मातृभाषेतूनच सूचना देणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे.


एकीकडे ‘मराठी’ शाळा बंद होत असताना जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी एकविसाव्या शतकात केलेली तंत्रज्ञानातील प्रगती बघितली की, एक गोष्ट नक्की जाणवते ती म्हणजे, ‘ज्यांचे शिक्षण मातृभाषेतून होते, त्यांची सदैव प्रगतीच होते.’ इंग्रजीचा A व B सुद्धा माहीत नसलेले हे देश व त्यांची प्रगती पाहता एका गोष्टीवर नक्कीच शिक्कामोर्तब होते, ते म्हणजे प्रगतीसाठी आवश्यक आहे मायबोलीतून शिक्षण घेणे.

मुळातच केवळ इंग्रजी बोलता आले म्हणजे प्रगती होते या एकमेव (गैर)समजुतीने जे पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. त्यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे ‘इंग्रजी शिकणे व इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न बाबी आहेत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की विद्यार्थ्यांचा बौद्धिक, आत्मिक विकास साधायचा असेल तर मेंदूला मातृभाषेतूनच सूचना देणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणारी मराठी मुले विज्ञान, समाजशास्त्र अजिबात समजून ‘न’ घेता पाठांतर करतात. जी गोष्ट समजून ‘न’ घेता पाठ केली जाते, त्यामुळे त्या कोवळ्या मनावर अनिष्ट परिणाम होऊन अभ्यास हे ओझे वाटू लागते. आपल्या मुलांच्या ‘मनाचा’ विचार न करता, स्वत:च्या (खोट्या) प्रतिष्ठेकरिता पोटच्या गोळ्याचा (मुलाचा) कोवळ्या मनाचे पोस्टमार्टेम करणार्‍या पालकांना शैक्षणिक क्षेत्रातील ‘अतिरेकीच’ म्हणावे लागेल.

सुजाण पालकहो! थोडंसं जहाल वाटतंय, परंतु ते ‘सत्य’ आहे. आपल्या पाल्याची खरोखरच शैक्षणिक प्रगती व्हावी, असं आपल्याला मनापासून वाटत असेल तर सर्वप्रथम शास्त्रीयदृष्ट्या विचार करून फ्रान्स, जपान या देशांची प्रगती बघून आता तरी जागे व्हा. मातृभाषेतून शिकून सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या जयंत नारळीकर, नरेंद्र जाधव आदी अनेक व्यक्तींना डोळ्यांसमोर आणा.

केवळ उत्तम इंग्रजी बोलता यावे म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पाल्याला इंग्रजीतून शिकवत असाल तर आपल्यासारखे अज्ञानी आपणच. कारण हजारो रुपये डोनेशनसोबतच प्रति महिना हजारो रुपये सलग दहा वर्षे (1ली ते 10 वी) फी भरण्यापेक्षा मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपल्या पाल्याला नियमितपणे ‘इंग्लिश स्पीकिंग’ क्लासला पाठवा (ज्याची फी नाममात्र असते) म्हणजे मातृभाषेतून शिकणेही होईल व त्याचबरोबर फाडफाड नव्हे तर आत्मविश्‍वासाने इंग्रजी बोलतासुद्धा येईल.

पालकांकरिता माय-मराठी हेल्पलाइन : 9820096079

सौजन्य- थर्ड जनरेशन. मराठी वृत्तपत्र.

लाभले आम्हास भाग्य...

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 27 फेबु्रवारी रोजी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने केलेले हे एक मुक्तचिंतन...

चामुंडाराये करविले ते ‘मी जरा टेक्स्ंिटग करतोय. मी तुला नंतर पिंगवतो’... 2600 हून जास्त वर्षांचा इतिहास असणारी, काळाप्रमाणे बदललेली ही माझी मराठी भाषा... मराठी बांधवांप्रमाणेच तीही प्रेमळ ...जगभर फिरताना तिने सगळ्यातले सगळे चांगले आपल्यात सामावून घेतले... म्हणूनच आज मराठीत असंख्य संस्कृत, फारशी, उर्दू इतकेच काय इंग्रजी शब्ददेखील आहेत ... याउलट, जगभरात जवळपास 10 कोटी लोक मराठी बोलतात. जगाच्या प्रत्येक प्रदेशात निदान एक तरी मराठी माणूस भेटेलच भेटेल. नव्या जगांचा संयोग करणारी ही भाषा आहे...


* - * - *

ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि खेबुडकरांनी सोळावं वरीस धोक्याचं ठरवलं... विरोधाभासच ना! पण हीच खरी गंमत आहे... ताडपत्री आणि बोरू ते आता मी टाईप करतोय तसं युनिकोड... मराठी भाषा काळाप्रमाणे बदलत राहिली आणि म्हणूनच टिकून राहिली... समृद्ध झाली... ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांनी मराठीतून कसे जगावे ते जगाला सांगितले... चिपळूकरांनी समाजशास्त्र सांगितले... तर गडकरी, अत्रेंनी चार घटका करमणूक दिली... आयुष्याचे सर्व रंग सर्व अनुभव या मराठीने मुक्तपणे उधळले... तीन ज्ञानपीठ पुरस्कारांबरोबरच विविध भाषांत होणारे मराठीचे भाषांतर ही त्याचीच प्रचीती आहे... मग, नुकतंच गुलजारसारख्या ग्रेट कवीला सौमित्रच्या मराठी कवितांची भुरळ पडते यात नवल ते काय!

* - * - *

‘धरून सोडला’,‘डोक्याला शॉट लावू नको’,‘पायात चप्पल घाल’ अशी एक ना अनेक वाक्ये .. ही खरी मराठीची गंमत आहे . मराठी भाषा दर कोसाला बदलते असे म्हणतात ... अर्थात त्यात मग एखादी कोल्हापुरातली पुल्लिंगी वस्तू नाशकात स्त्रीलिंगी होते ही मजा... शिव्यांचेदेखील एवढे भांडार इतर कोणत्या भाषेत असेल असे वाटत नाही... मराठी माणूसच तसा आहे रांगडा ..मर्दाचा पोवाडा , नजाकतदार लावणी... गगनभेदी आरोळी .... हीच ती खरीखुरी मराठी... इतर भाषेतली नाटके मराठीत आणताना त्या भाषेच्या तोडीस तोड ‘कोणी घर देता का घर’ असे संवाद हा मराठीचा इतिहास आहे... आणि म्हणूनच, 24 तास इतर कोणतीही भाषा बोलायला लागली तरी मनातले मराठीपण तसेच अभेद्य आहे, सह्याद्रीसारखे....

* - * - *

मराठी भाषा दिन... वरचे सारे आजच आठवायला हवे असे काही नाही... सचिनने मराठीत भाषण दिले, लताबाईंचा आवाज जगभर गेला की ते आठवते... पण ते तेव्हाच आठवावे असे नाही... मराठीची ज्योत कायम मनात तेवत हवी... एखादा छानसा लेख वाचला, एखादी झणझणीत शिवी ऐकली की क्षणभर वाटून गेले पाहिजे... की येस, मला अभिमान आहे की माझ्याकडे ही भाषा आहे, बोलण्यासारखे खूप आहे, पण गंमत अशी आहे की या भाषेची महती सांगायला शब्दच बापडे अपुरे पडतात... असो असे असायलाही भाग्य लागते... शेवटी इतकेच की या भाग्याचा आनंद घ्या, मराठीचा झेंडा खांद्यावर घ्या आणि जग जिंका... बॅकग्राऊंडला गाणे वाजत असेलच...

‘‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...’’

सौजन्य :- vinayakpachalag@gmail.comमी मराठी

Saturday, February 26, 2011

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी


Swatantryaveer Savarkar: He wanted Hindus to be the most powerful in the world !

Once known to be a Hindu nation due to the major influence of leaders like Swatantryaveer Savarkar, it has now become a pro-Muslim and pro-Christian nation as a result of present Government's policies. The main reasons also being the self-destructive politics played by Gandhi and Nehru, their favouritism towards non-Hindus and indifference towards Hindus. If we defy the legacy of Gandhi and Nehru and implement the policies advocated by Swa. Savarkar with regards to the protection of the nation, then the days are not far for our country to regain its past glory. We pay obeisance to 'Hindu-Rashtrapati' Swa. Savarkar on the occasion of his memorial day on 26th Feb !


Swa. Savarkar was also a humanitarian like all Hindus. Only selfish and power-thirsty rulers and politicians can make false allegations against Savarkar that he was a supporter of casteism or communalism. Savarkar had advised Muslims with the same affection and warmth too. He advised them to let go of fanaticism and instead believe that the true caste is being human, the true religion being humanity, the true nation being the earth and the true king being God, the Almighty. He had advised Muslims to follow these principles and be sensible and be science orientated as per the changing times. In fact, nobody has advised Muslims in a better manner than Savarkar. As he, however, realized that despite such good advice, Muslims were not ready to accept India as their motherland, he advised Hindus to adopt a 'Tit for Tat' policy against Muslims and propagated this policy through his writings as well.


We pay obeisance at the feet of the patriotic Savarkar brothers who had to go through so much of anguish and sacrifice fighting for the freedom of their motherland! People therefore, should not be ungrateful like all our political parties but should always remember these great revolutionaries !

Remembering Veer Savarkar

In the history of struggle for Indian independence, V.D. Savarkar's place is unique. He had a firm belief that only a strong, armed revolt by Indians would liberate India from the British. An extraordinary Hindu scholar (he is one who coined Indian words for the telephone, photography, the parliament, among others), a recklessly brave revolutionary (he tried to swim the sea waters and escape when captured by the enemy) and a fiercely patriotic leader, he uncovered the truth about the Sepoy Mutiny. His disagreements with Gandhi's non-violent methods and the pleasing Pakistan's efforts appealed to a large number of Hindus who were wronged by Pakistanis and this led to the assassination of Mahatma Gandhi by Nathuram Godse. - By Dr. Jyotsna Kamat

Born Leader

Savarkar could be called a born rebel. He organized a gang of kids, Vanarsena (Monkey Brigade) when he was just eleven. A fearless individual, he wanted everybody around him to become physically strong and be able to face any disasters-- natural or man-made. He conducted long tours, hiking, swimming and mountaineering around Nasik, his birthplace in Maharashtra. During his high school days, he used to organize Shivaji Utsav and Ganesh Utsav, started by Tilak (whom Savarkar considered as his Guru) and used these occasions to put up plays on nationalistic themes. He started writing poems, essays, plays, etc. to inspire people, which he had developed with a passion. Later he went to Pune for his college education and founded the "Abhinav Bharat Society". As a serious student of nationalism he found a bigger platform now; with growing youngsters, he bloomed as a leader as well. All political activities were banned by the ruling British then and he had to undertake all transactions, communications in secret and was expelled from hostel and at one point from the college as well. But since he managed to get the prestigious 'Shivaji scholarship' (named after Shivaji) to study law at London, the college authorities had to make way for his scholastic journey!

Magnum Opus

Savarkar greatly nurtured the idea of bringing out an authentic informative researched work on The Great Indian Revolt, which the British termed as the "Sepoy Mutiny" of 1857. Since the India Office Library was the only place which contained all records and documents, he was determined to undertake a detailed study, but was cautious enough not to make his intentions known. Hence after landing in London, he wrote a biography of Gieuseppe Mazzini, the great revolutionary and leader of modern Italy who inspired his countrymen to overthrow the Austrian Empire's yoke (Holy Roman Empire). Written in the Marathi language, the manuscript was smuggled out with great care which was published by his brother Baba. The book created a wave. 2000 copies sold out secretly and were read and reread. By a British estimate, each copy was read by at least 30 people. Some could verbally reproduce page after page ! His brother however was imprisoned for printing the book.



At London, Savarkar undertook the task, his mission in life, to create awareness regarding the first Armed National Revolt in India in 1857. Through friends, he could get access to all the much-needed first hand information regarding the men of this earlier countrywide effort. It was a sincere one on the part of the leaders, princes, soldiers and commoners to drive away the British, (though grossly misrepresented by British historians.) It was the first national effort towards getting political independence and he rightly called his book "The Indian War of Independence 1857".

He wrote in Marathi and could not get it printed in Europe. Though the manuscript found its way to India, due to British vigilance, all printing presses were raided and in the nick of time, the manuscript could be taken out, due to a friendly police officer's information, before seizure. However, when it went back to Europe, it unfortunately got lost.

But the English version became a necessity. Savarkar was helped in this venture by the other revolutionaries who had come to study Law and Civil Service. But printing it in Britain was out of the question, so also in France, as British and French spies were working together to face imperial Germany which was becoming a great threat. Ultimately the book was published in Holland by Madam Cama without a cover or name. The cover pages of popular classics like "Don Quixote", "Oliver Twist", etc. were used for the book and it was successfully smuggled to India. One box with a false bottom was used to take books at great risk by a Muslim friend who later became the Chief Minister of Punjab ! The book reached the right people through secret sympathizers in Ireland, France, Russia, U.S.A., Egypt, Germany and Brazil as well.

Fierce Nationalist

While in London, Savarkar organized festivals like Rakshabandhan and Guru Gobind Singh Jayanti and tried to create awareness among Indian students.The slogan Savarkar coined for Indian festivals became a unifying factor.

"One Country. One God

One Caste, One Mind

Brothers all of us

Without Difference

Without Doubt"

It was during this period that Savarkar helped design the first Indian National Flag, which Madam Bhikaji Cama unfurled at the World Socialist Conference at Stuttgart, Germany.

The Scotland Yard Police's noose was tightening around Savarkar. Revolutionary activities in London, Mumbai, Pune, Nasik were traced to his provocation ! His speeches and articles smelt of sedition; his friends were traced as those learning about the preparation of bombs and transporting arms (pistols) illegally. Finally he was arrested and ordered to be sent back to India. In India, punishments were very harsh, tortuous and the greatest crime of the land was that of incitement to rebellion which could easily send one to the gallows. He was sent on a ship "Morena" which was to halt briefly at Marseilles. (1910)

Swimming the Ocean

Savarkar and his friends then attempted a brave escape which has since become legendary. Savarakar was to jump from a sailing ship, swim the sea waters and his friends were supposed to pick him up and lead him to freedom. Savarkar was under strict watch. There was no way out. With a constable waiting outside, he entered the toilet, broke the window, wriggled out somehow, and jumped into the ocean to swim his way to the Marseilles port. Alas! The rescue party was late by a few minutes and the French Police on guard returned the prisoner to the British cops, now chained and under stricter watch.

After a formal trial, Savarkar was charged with serious offences of illegal transportation of weapons, provocative speeches and sedition and was sentenced to 50 years' of jail and deported to the Blackwaters (kalapani) at Andaman's cellular jail.

Conditions in jail were inhuman with prisoners having to do the back-breaking job of stone breaking, rope making, and milling. Prisoners had to grind the copra in the mill, while being tied like oxen. Each had to extract 30 pounds of oil everyday. Some died of sheer exhaustion and the inhuman treatment of beating and whipping. The bad food, unsanitary conditions, a stone bed and cold weather in winter would take their toll.

Talented Mr. Savarkar

Since political prisoners were treated like hardened criminals, they had no access to "luxuries" like a pen and paper. The poet in Savarkar was restless and uneasy. Finally he found a nail and wrote (etched) his epic "Kamala" consisting of thousands of lines on the plastered mud wall of his cell, in the darkness. A Hindi journalist friend who was taught Marathi by Savarkar came to his cell when Savarkar was removed all of a sudden and sent to another remote cell. The friend learnt the entire poem by heart and later when he was released, put it on paper and sent it to Savarkar's relatives.


After spending 16 years in the Andamans, Savarkar was transferred to a Ratnagiri jail and then kept under house arrest. He was reunited with his wife. (He had married before leaving for England and it was a long separation). A daughter and later a son were born.

Books, poems, and articles came out. But now he was known for his book on 1857 (The Indian War of Independence) throughout the world. Two generations of Indians were influenced by his magnum opus. The second edition was printed in the U.S.A. by Savarkar's revolutionary friends. The third edition was brought out by Bhagat Singh and its Punjabi and Urdu translations followed and were widely read in India and the Far East. Even in the Indian National Army of Subhash Chandra Bose, the Tamil translation of this work was read out like a Bible by the South Indian soldiers in Singapore, though nobody knows till today, who translated it into Tamil.

Savarkar stood by what he wrote till the last and never compromised with "adjustments," "reforms" and peaceful solutions which according to him meant nothing ! As a great scholar full of originality and independent standing, he coined several new technical terms of parliamentary usage and of Indian parlance such as chhayachitra (photography), Sansad (Senate), Vyangyachitra (Cartoons) etc.

He earnestly believed that Indian Independence was a reality not because of a few individuals, leaders or sections of society but that it was possible because of the participation of the common Indian citizen who prayed to his family deity everyday. However, he said, the youngsters who went to gallows to see their motherland free, were the greatest "Veeradhiveers".

Legacy

Savarkar passed away in 1966, after being looped into the controversy regarding the assassination of Mahatma Gandhi by Nathuram Godse. The Hindu Mahasabha, an institution that Savarkar had helped grow, had opposed the creation of Pakistan, and took exception to Gandhi's continued Muslim appeasement stances. Nathuram Godse, a volunteer of the Hindu Mahasabha, assassinated Gandhi in 1948 and upheld his actions until his hanging.


Savarkar is revered in India today as the "Brave Savarkar" (Veer Savarkar), and is on the same level as Mahatma Gandhi, Subhas Chandra Bose, and Tilak. The intellectuals as well as the common man in India continue to debate what would have happened if the ideas of Savarkar were endorsed by the Nation, especially after freedom in 1947. A famous general is said to have quoted Savarkar after the Indians conceded land to the Chinese in a military conflict in 1962... Savarkar had advocated a militarily strong India.

सौजन्य :- hindujagruti.org

Friday, February 25, 2011

जीवनसत्त्वाची बाराखडी : अ

चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला जीवसत्त्वांचा ‘डोस’ मिळणे गरजेचे आहे. औषधं, इंजेक्शनमधून अनेकजण ही व्हिटॅमिन्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण रोजच्या आहारातही आपण पुरेसी जीवनसत्त्वे मिळवू शकतो. एकंदरीतच कुठल्या अन्नपदार्थातून कुठले जीवनसत्त्व मिळू शकते, प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य, अभावाने उद्भवणारे आजार याची माहिती देणारे हे ‘जीवनसत्त्वाची बाराखडी’ हे नवीन सदर...


लहानपणी अभ्यासाचा श्रीगणेशा करताना पाठीवर पहिलं अक्षर गिरवले जाते ते ‘अ’ त्याप्रमाणे जीवनसत्त्वांच्या बाबतीत विचार करताना नेहमीच ‘अ’ जीवनसत्त्वापासूनच सुरुवात केली जाते. शरीरातील चयापचय प्रक्रियेसाठी ‘अ’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते.

कशातून मिळेल?

शुद्ध रूपात प्राण्यांपासून मिळते. तर कॅरोटिनच्या रूपात अनेक भाज्यांमधून मिळते. उदाहरणार्थ पालक, गाजर, रताळे, कोबी याशिवाय अंड्याचे बलक, दूध, दही, लोणी.

उपयोग

रोगप्रतिकार शक्ती वाढवते, त्वचा, दातांचे आरोग्य सुधारते, हाडे बळकट होतात.

कमतरतेमुळे होणारे आजार

झिरोप्थेलमिया, दातांचे आजार, एनिमिया, किडनी स्टोन.

लक्षणे

त्वचा कोरडी होणे, रातांधळेपणा, वजन कमी होणे, सूज चढणे.

सौजन्य:- सर्वांसाठी सर्वकाही असणारे एक मराठी वृत्तपत्र.

मान सांभाळा

ऑफिसात हल्ली संगणकाचा वापर वाढला आहे. सतत बैठे काम, बसण्याची चुकीची पद्धत व कामाचा ताण या सर्वांचा अप्रत्यक्षपणे भार मानेवर येतो व सुरू होते मानदुखी. या मानदुखीकडे जर वेळीच लक्ष नाही दिले तर सर्व्हायकल स्पॉंडिलायसिससारखा आजारही होऊ शकतो.


* मानदुखी टाळण्यासाठी सर्वप्रथम एकाच जागी, एकाच पद्धतीत बसू नका.

* दर एक तासाने निदान एक मिनिटाचा ब्रेक घेऊन मानेचा हलका व्यायाम करा.

* हा व्यायाम तुम्ही कामाच्या ठिकाणी बसल्या जागेही करू शकता. यासाठी मानेला घडीच्या दिशेने पाच वेळा फिरवा. नंतर हीच क्रिया उलट्या दिशेने करा.

* तिळाच्या तेलाने हलक्या हाताने मालिश करा. मालिश नेहमी वरून खाली या दिशेने करा.

* गरम, थंड पाण्याचा आलटून पालटून शेक घ्या.

* झोपून टीव्ही पाहणे, अति वजन उचलणे टाळा.

* झोपताना कडक किंवा जास्त उंचीची उशी वापरू नका.

* सर्वात शेवटी महत्त्वाच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.

डांग्या खोकला म्हणजे काय?

बोर्डेटेला पेर्तुसिस नावाच्या विषाणूमुळे डांग्या खोकला होतो. हा संसर्गजन्य आजार असून दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.


लक्षणे : शिंका, डोळ्यांतून पाणी, नाक वाहणे, रात्रीच्या वेळी खोकला येणे, श्‍वास घेताना आवाज येणे, खोकल्याची न थांबणारी उबळ येणे ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त असल्यास तो डांग्या खोकला असू शकतो.

उपाय : डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांना घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला अशी डीटीपीची संयुक्तपणे लस दिली जाते.

सौजन्य :- सर्वांसाठी सर्वकाही असणारे एक मराठी वृत्तपत्र.

Thursday, February 24, 2011

टिप्स

* टोमॅटो नरम झाले असतील तर त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवावेत ते कडक होतील


* लोखंडी, पितळी भांड्यामधला स्वयंपाक अधिक रुचकर आणि सत्त्वयुक्त होतो शक्य असल्यास ही भांडी वापरावी

* जेवण किंवा दूध फ्रिजमधून काढून लगेच गरम करू नका थोडावेळ रुम टेंपरेचरला आणा आणि मगच गरम करा

* रश्श्याच्या भाजीला कमी तेलात तवंग आणायचा असेल तर भाजीत थोडी साखर घाला भाजीवर छान तवंग येईल

* मटन, चिकनच्या रश्श्यामध्ये थोडेसे बाजरीचे पीठ भाजून घाला हलकासा घट्टपणा येतो

* कोरड्या भाजीला चांगला सुगंध येण्यासाठी दालचिनी आणि वेलची घालावी भाजी घालण्याआधी सुरूवातीलाच तेलात हे पदार्थ घालावेत

* बीर्यानी, पुलाव करताना त्या भांड्याला तूपाचा हात लावा भात भांड्याला चिकटत नाही

सौजन्य  :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

फळं आणि सौंदर्य

फळं आणि सौंदर्य यांचं नातं फार अतूट आहे फळं खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारतंच पण ते तुमच्या त्वचेतूनही खुलतं फळांच्या सेवनाबरोबरच त्वचेवरही फळांचा वापर केल्यास त्वचेला चांगला ग्लो येतो आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी फळांचा उपयोग होतो


* पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होते

* ओठांवरही डाळिंबाचा रस लावा त्यामुळे ओठांचा रंग सुधारतो

* पिकलेल्या पपईचा गर सौंदर्य प्रसाधनात अतिशय उपयुक्त ठरतो यात अ, ब, क ही जीवनसत्त्वे असतात याचा गर चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचे आरोग्य सुधारते

* चेहर्‍यावर चामखीळ असेल तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळावा हा उपाय नियमित केल्यास त्याचा परिणाम जाणवेल

* पिकलेल्या केळ्याच्या गरात मलई मिसळून हा पॅक चेहर्‍याला लावा पंधरा मिनीटांनी चेहरा धुवा यानंतर आणखी एका पिकलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या कापून त्या मधात ठेवा थोड्यावेळाने मधातून चकत्या काढून त्या चेहर्‍यावर लावा त्यानंतर पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा शुष्क चेहर्‍यावर याचा उपयोग होतो त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचे आरोग्य सुधारते

* चेहर्‍यावर पुटकुळ्या असतील तर पिकलेल्या केळ्याचा गर चोळून लावा अर्ध्या तासाने कच्च्या दुधाने चेहरा धुवा नियमितपणे केल्यास याचा फायदा होईल

* सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घाला व ते चेहर्‍यावर चोळा सावळा रंग उजळविण्यास मदत होते रंग उजळवण्यासाठी सफरचंदाचा गर थोडा उकडा व चेहर्‍यावर चोळा तो वाळला की चेहरा धुवा नियमितपणे हा प्रयोग करा तुम्हाला फरक जाणवेल हा प्रयोग रंग उजळविण्यास उपयोगी ठरतो

* केसातील कोंडा घालवण्यासाठी सफरचंदाचा रस काढून तो ओल्या केसांच्या मुळाशी लावून ठेवा वीस ते पंचवीस मिनिटांनी केस धुवा

* संत्र्याची ताजी साल चेहरा, हात, पाय यावर चोळून लावा त्वचा मुलायम होतो

* हात नरम व मुलायम करण्यासाठी ताज्या रसात थोडा मध घाला व तो चोळा चांगला परिणाम जाणवेल

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

पालकांची शाळा - संवाद साधा


लहान मुलांशी नक्की कसं वागायचं तेच पालकांना कधीकधी कळत नाही. काही पालक शिस्तीच्या नावाखाली मुलांना अक्षरश: बदडतात. तर काही पालक मुलांना मारत नाहीत, पण बोलूनबोलून मुलांच्या भावना दुखावतात. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत कसं वागायचं हे सांगणारं सदर.


मनात वाईट इच्छा नसली तरी पालक आपल्या लहान मुलांचे शालेय जीवन खडतर बनवतात ‘राहुल आणि लीना जर चांगले मार्क मिळवतात तर तू का नाही चांगले मार्क्स मिळवत?’ असे बोलून मुलांचा स्वाभिमान दुखावतात


भावनिक, मानसिक व नैतिकदृष्ट्या कमजोर झालेल्या बालमनाचे पुढे कसे होत असेल? काही मुले आत्महत्येचा विचार करतात, काही हिंसक वर्तन करतात, काही मुले व्यसनाधीन बनतात तर काही मुले नैराश्याच्या गर्तेत सापडतात उशीर होण्याआधीच पालक व गुरूजनांनी योग्य पावले उचलायला हवीत काही मार्गदर्शक सूचना पुढे दिल्या आहेत बालमानसशास्त्र व स्वपरीक्षण यावर आधारित मुलांच्या मानसिक व भावनिक जडणघडणीस हातभार लावणार्‍या या सूचना आहेत

* मुलांचा कधीही अपमान करू नये लहान मुलांनी जरी काही चुकीची गोष्ट केली असेल तरी त्यांच्याशी बोलताना काळजीपूर्वक शब्द वापरा ‘तू वाईट मुलगा आहेस, कारण तू फुलदाणी तोडलीस’ असे म्हणू नका त्याऐवजी ‘वस्तू तोडणे चुकीचे आहे’ असे म्हणा समस्येवर जोर द्या

* परीक्षा, शिक्षण व खेळ यामधील मुलांची गुणवत्ता यांची तुलना वर्गमित्रांशी, भाऊबहिणांशी किंवा स्वतः पालकांच्या गुणवत्तेशी करू नका त्याने मुलांचा आत्माभिमान दुखावेल त्याऐवजी त्याची गुणवत्ता त्याच्या स्वतःच्याच पूर्वीच्या गुणवत्तेशी करा

* ‘हल्ल्यास प्रतिहल्ला’ हा विचार मुलांना कधीही शिकवू नका त्याऐवजी समस्या, वादविवाद सोडवण्याचा प्रयत्न करा एखाद्या मुलाने तुला मारलं तर तू पण त्याला मार, असं शिकवू नका.

* ‘प्रयत्न केले नाही म्हणून अपयश आले’ असे म्हणू नका तुम्ही किती वेळा अपयशी झालात हे विशेष नसून तुम्ही किती वेळा अपयशातून यशाची पायरी आत्मविश्‍वासपूर्वक चढलात हे महत्त्वाचे आहे

* समाजात मानप्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुलांनी मिळवलेली पदके, पारितोषिके यांचा वापर करू नका

* भीती, शिक्षा, स्पर्धात्मक वातावरण यामुळे मुलांचे भावनिक स्थैर्य डगमगेल म्हणून काळजीपूर्वक राहा त्यांना कशाचीही भीती घालू नका, अद्दल घडवण्यासाठी शिक्षा करू नका किंवा सतत कोणाशी तरी तुलना करू नका.

* मी तुझ्या सोबत आहे, धीर धर असे म्हणून त्याचा आत्मविश्‍वास वाढवा

* तुमचे दैनंदिन संभाषण केवळ शाळा, गुण व परीक्षा इथपर्यंतच मर्यादित ठेवू नका मुलांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींबद्दल विचारा. त्यांचं जास्तीत जास्त ऐकून घ्या. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचे भावविश्‍व खूप मोठं आहे. ते समजून घ्या.

* आजकाल पालक आपल्या मुलांना मागतील ती वस्तू विकत घेऊन देतात. लॅपटॉपही देतात. पण मांडीवर प्रेमाने बसवायला त्यांना वेळ नसतो. हा विरोधाभास दूर करा.

पोदार जम्बो किड्सच्या संचालिका

Wednesday, February 23, 2011

सायबर वॉर

सायबर वॉरमुळे हिरोशिमा किंवा नागासकीवर अणुबॉम्ब टाकून केलेली अपरिमित जीवितहानी नक्कीच होणार नाही. परंतु एखाद्या देशाची संपूर्ण ‘इन्फर्मेशन सिस्टिम’ व दळणवळण यंत्रणा कोलमडून टाकण्याची क्षमता नक्कीच आहे व त्याचबरोबर आपल्याकडील महत्त्वपूर्ण माहिती जी कोट्यवधी संगणकावर सध्या स्टोअर केली असेल ती ‘वॉश आऊट’ अर्थात नाहीशी होण्याचा धोका व तिचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अशा अनेक गोष्टी होऊ शकतात.


भविष्यातील युद्ध हे संगणकाचा ‘कीबोर्ड व माऊस’चा वापर करून होईल असे जर कोणी म्हटले तर ते खरे वाटणार नाही, पण जागतिक महासत्तेच्या सारीपाटावर मात्र भविष्यातील सायबर युद्धाच्या सोंगट्यांच्या चालींना केव्हाच सुरुवात झाली आहे. यावर सर्वसामान्य माणसाला विश्‍वासदेखील बसणार नाही.

पण खरंच विचार करा की, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला मोबाईल फोन किंवा इंटरनेट जर अशाप्रकारे अचानक बंद पडला तर किंवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या इतर काही सेवा ज्या मुख्यत्वे दळणवळण अर्थात कम्युनिकेशन सिस्टिमवर चालतात जसे बँकांचे एटीएम किंवा बँक, शेअर खरेदी-विक्री, आजकाल सर्वत्र असणारे क्रेडिट कार्ड मशीन्स, अवकाशात उडणारी विमाने व त्यांचे एअर ट्रॅफिक कंट्रोलशी होणारे कम्युनिकेशन, रेल्वे रिझर्व्हेशन, अगदी आपल्या दूरचित्रवाणीवर चालणारे विविध चॅनेल्स जर क्षणार्धात काही कळायच्या आत जर अचानक बंद पडले तर... कदाचित त्याचे अनेक विध्वंसकारी परिणाम होऊ शकतात. काही क्षणातच आपली अर्थव्यवस्था कोलमडू शकते व सर्वत्र हाहाकार माजू शकतो. अगदी कल्पनेच्या पलीकडे घडणारे असे काहीही होऊ शकते. यालाच ‘सायबर वॉर’ असे म्हटले जाते.

अमेरिकेमध्ये ‘सायबर सिक्युरिटी’ सांभाळण्यासाठी एक वेगळी निष्णात तंत्रज्ञांची मोठी फौज तयार करण्यात येत आहे व हे तंत्रज्ञ अशाप्रकारच्या सायबर युद्धापासून त्यांच्या देशाचे संरक्षण करतील. अशाच प्रकारे जगातील अनेक देशदेखील आपल्याकडे ‘सायबर वॉर’शी लढा करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. दुदैंवाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रभागी असणारा आपला देश ‘सायबर सिक्युरिटी’मध्ये मात्र कमालीचा पिछाडीवर आहे. ण्र्ंिऊ.ग्ह (कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) ही एकमेव सरकारी संस्था काही प्रमाणात या क्षेत्रात काम करीत आहे. तरीही सर्वसामान्य संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणे वापरणार्‍या माणसाला मात्र ‘सायबर सेफ्टी’बद्दल फारशी माहिती नसतेच. त्यामुळेच मग ‘बॉम्ब ब्लास्ट’नंतर देशविघातक शक्ती कुणाचे तरी ‘वाय फाय’ इंटरनेट हॅक करून त्यावरून ईमेल पाठवण्यासारखे प्रकारदेखील सर्रास घडतात.

भविष्यातील सायबर युद्धाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी कंपन्यानादेखील त्यांच्या ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’वर काम करावे लागणार आहे व त्याचबरोबर आपल्या देशातील संगणक व इतर डिजिटल उपकरणे वापरणार्‍या प्रत्येकाला ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’चे ज्ञान माहिती करून घ्यावे लागेल तरच भविष्यातील ‘सायबर युद्धा’त आपला निभाव लागू शकेल.


तुम्हीही बळी ठरू शकता!

* ‘सायबर वॉर’ हे काही एक देश दुसर्‍या देशाशी करेल असेदेखील नाही. सायबर वॉर एकाच देशात त्याच देशातील लोकदेखील करू शकतात.

* एखादी कंपनी आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनीच्या नेटवर्कवर व इन्फर्मेशन सिस्टिमवर डीडीओएससारखे (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस) शस्त्र वापरून त्यांच्या सर्व सेवा जे ग्राहक वापरतात त्या काही काळासाठी बंद पडू शकते. अर्थात त्यामुळे सेवा पुरवठा करणार्‍या कंपनीची बाजारपेठेतील पत कमी होऊन तिला आर्थिक फटका पोहोचवणे हा उद्देश असतो.

* आपली प्रतिस्पर्धी कंपनी कोणते नवीन प्रॉडक्ट (वस्तू) बाजारात आणणार आहे हे जाणून घेण्यासाठीदेखील अशाप्रकारचे ‘सायबर वॉर’ खेळले जाऊ शकते.

* आजच्या बाजारपेठेतील प्रचंड स्पर्धा व त्या स्पर्धेत टिकण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी आजकाल कोणतीही कंपनी काहीही करण्यास तयार असते व ‘सायबर वॉर’ हे साधन या सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते.

* आपण आपल्याकडील ‘माहिती व तंत्रज्ञाना’वर आधारित सर्व गोष्टींची आतापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली नाही तर ‘सायबर वॉर’च्या धोक्याची आपल्यावर सदैव टांगती तलवार राहील.

Tuesday, February 22, 2011

हिंदुस्थानी जेवण जगात पाचवे

वैविधतेने नटलेल्या हिंदुस्थानची खाद्यसंस्कृतीही तितकीच निराळी. डाळ-भात, छोले, दाल मखनी, रोटी इत्यादी पदार्थांवर इथला सामान्य माणूस ताव मारून खातो यात विशेष नाही. पण आता याच डाल-रोटी किंवा हिंदुस्थानी खाद्यपदार्थांची भुरळ अख्ख्या जगाला पडली आहे. म्हणूनच जगभरातल्या आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये हिंदुस्थानने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

हॉटेल्स डॉट कॉम (http://www.hotels.com/) संकेतस्थळाकडून अलीकडेच संपूर्ण जगातील हॉटेल तज्ज्ञांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या आहारशास्त्र सर्वेक्षणातून विविध देशांतील लोकांच्या आहाराबाबतच्या फार उत्सुकतावर्धक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हिंदुस्थानी अन्नपदार्थ जगातील सर्व पर्यटकांना आवडतात. सर्वाधिक आवडीत हिंदुस्थानचे जगात पाचवे स्थान आहे. तर इटलीच्या अन्नपदार्थांनी जगाचे सर्वाधिक आवडते अन्न म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे.

वरील सर्वेक्षण निष्कर्ष जगातील तब्बल ४००० पर्यटकांचे सर्वेक्षण केल्यानंतर काढण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या हिंदुस्थानी खाद्यपदार्थांबाबत काही उत्कंठावर्धक सत्य उघडकीस आले आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा तेथील स्थानिक अन्नपदार्थांची चव चाखण्याची वेळ येते तेव्हा हिंदुस्थानी लोक जगातील १८ देशांच्या मागे पडतात. ते नवे पदार्थ चाखून पाहण्याबाबत खूपच नाखूश असतात. कोरियन लोक मात्र प्रवासाचे ठिकाण निवडताना अन्नपदार्थांना सर्वाधिक महत्त्व देत असतात. ४१.६७ टक्के कोरियन अन्नपदार्थ पाहून प्रवास करतात तर ९८.१९ टक्के कोरियन नव्या ठिकाणचे अन्नपदार्थ चाखून पाहतात.

तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचे पर्यटक जगात जातील त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ चाखण्यात उत्सुकता दाखवतात. जपानी मात्र अन्नपदार्थांबाबत खूपच चोखंदळ असल्याचे आढळले आहे. सुमारे ५० टक्के जपानी पर्यटक अन्नपदार्थ आणि पेये पाहून पर्यटनस्थळाची निवड करीत असतात.

हिंदुस्थानी अन्न आवडीचे असलेले जपानी पर्यटक प्रवासात न्याहारी सोबत घेऊनच प्रवास करतात. तर ब्रिटिश लोक चहा सोबत असल्याविना प्रवास करीत नाहीत. ऑस्ट्रेलियातील लोक याचप्रमाणे व्हेजेमाईट घेऊन प्रवास करीत असतात. तर फ्रेंच लोक कॉफी आणि चॉकलेट आपल्या प्रवासाच्या यादीत आवर्जून जोडत असतात. तर प्रवासात पराठा आणि मसालेदार पदार्थ नसल्याबद्दल खंत करणार्‍या हिंदुस्थानींची संख्या या सर्वेक्षणात ४३ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे.

कुणाला काय आवडतं?

* ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, डच आणि न्यूझीलंडच्या लोकांना हिंदुस्थानी अन्नपदार्थ आवडतात.

* इटलीचा पिझ्झा आणि पास्ता संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.

* फ्रेंच लोक इटालियननंतर हिंदुस्थानी जेवणाला सर्वाधिक पसंती देतात

* आशियातील चिनी, थाय, हिंदुस्थानी जेवणांपैकी आंतरराष्ट्रीय पर्यटक थाय जेवणाची सर्वाधिक मागणी करतात.

* इंग्लंडमध्ये हिंदुस्थानचा चिकन टिक्का लोकप्रिय आहे.

* हिंदुस्थानात मात्र चायनीज जेवण सर्वाधिक लोकप्रिय आहे.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र.

Sunday, February 20, 2011

कोलेस्टेरॉल

आपण सर्वजण जाणतोच की आज उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाघात, स्ट्रोक (मेंदू आघात) या व्याधी अचानकपणे व तरुणांनाही होत आहेत. वरवर पाहता या व्याधी अचानकपणे होत आहेत असे वाटले तरी याची कारणे शरीरात खूप आधीच खोलवर रुजलेली असतात. केवळ त्या व्यक्तीस स्वत:स काहीही त्रास होत नसतो म्हणून त्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाते. यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हे होय.


कोलेस्टेरॉल हे त्याच्या घनतेनुसार उच्च घनतेचे, कमी घनतेचे व अत्यंत कमी घनतेचे असे तीन प्रकारचे असते. यापैकी उच्च घनतेचे कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल समजले जाते. कारण हे आपले हृदयविकाराच्या झटक्यापासून संरक्षण करीत असते. म्हणून याचे रक्तातील प्रमाण वाढवणे आवश्यक असते.

याउलट इतर प्रकारचे कोलेस्टेरॉल हे रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे त्याचे वाढलेले प्रमाण नकळतपणे हृदयविकार उत्पन्न करू शकते. याचे रक्तातील प्रमाण वाढू नये यासाठी यकृत अहोरात्र कार्य करीत असते.

साधारणत: दहा टक्के व्यक्तींतील कोलेस्टेरॉल हे अनुवंशिकतेमुळे वाढलेले असते. तसेच काही व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल हे मधुमेह किंवा हायपोथायरॉईडीझममुळे वाढलेले असते. परंतु बहुतेक व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल हे एक तर आहारातील चुकांमुळे वाढलेले असते किंवा धूम्रपानामुळे वाढलेले असते. यासोबतच उच्च रक्तदाबासाठी वापरली जाणारी काही औषधे, तसेच हार्मोन्सची औषधे यामुळे देखील रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्यास सुरुवात होते.

बहुतांशी शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याची कोणतीही लक्षणे रुग्णास जाणवत नाहीत. तरीही काही रुग्णास चक्कर येणे, चालताना तोल जाणे, बोलताना अडखळणे, अशक्तपणा जाणवणे, हातापायांना मुंग्या येणे, छातीमध्ये दुखणे, काही वेळ अंधूक दिसणे, चालताना पोटर्‍या दुखणे, भोजनानंतर पोटात दुखणे अशी लक्षणे जाणवतात.

रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी धूम्रपानावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. यासोबतच आहारात अक्रोड व जवस यांचा समावेश केल्याने चांगले कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराच्या आघातापासून आपला बचाव होतो. यासोबत आहारातून शरीरात जाणारे कोलेस्टेरॉल थांबविण्यासाठी संपूर्ण आवश्यक कॅलरीजपैकी 30 टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीज या स्निग्ध पदार्थातून घेणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींचे अनुवंशिकतेमुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे, अशा व्यक्तींना केवळ आहारावरील नियंत्रण पुरेसे नसते अशा व्यक्तींनी लसूण, लॉकी व हळद एकत्रितपणे दररोज घेणे हितकर आहे. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल हे 150 एम.जी./ डीएलपेक्षा कमी असणे हितकर असते. ज्या व्यक्ती मद्य सेवन करतात त्यांनी हा नियम अधिक कटाक्षाने पाळणे क्रमप्राप्त आहे.

ज्याप्रमाणे आपण आपला रक्तदाब व रक्तातील साखर यांच्या नियंत्रणाच्या बाबतीत जागरूक असतो, तितकेच आपण कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याविषयी जागरूक असले पाहिजे.

ज्या व्यक्तींनी वयाची चाळीशी ओलांडली आहे अशा प्रत्येकाने व ज्या व्यक्तींना अनुवंशिकतेमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता आहे त्यांनी वयाची 25 वर्षे उलटली असता कोलेस्टेरॉल तपासून ते नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. या छोट्याशा उपचारामुळे भविष्यातील मोठे आजार प्रतिबंधित होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी डॉ. ओंकार शहापूरकर, शिवनेरी सेवा मंडळ, दादासाहेब फाळके रोड, गोल्डमोहर मिल कंपाऊंडसमोर, जुनी शिंदेवाडी, दादर-पूर्व, 9823311375, 9823185552 येथे संपर्क साधावा. आयुर्वेदात अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर आणि रोगांवर प्रभावी उपाय आहेत पण त्याकडे आपण गंभीरपणे बघणे जरुरीचे आहे.

सौजन्य  :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

Saturday, February 19, 2011

अल्कोहोलिक कॅलरीज

डिसक्लेमर : मद्यपान आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक असते. या लेखाचा हेतू - ‘कुठली ड्रिंक घेतलेली चांगली’ हे सांगायचा नसून ‘कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलरीज शरीरात वाढतील?’ हे सांगण्याचा आहे.

कुठल्याही पार्टीपूर्वीचा प्रसंग. ‘अरे, आज मस्त बसू या. उद्या काय हापिसात सुट्टी. उगाच लवकर उठायचे टेन्शन नाही!’ आज आम्ही केपीला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफेला. फुल धमाल.’ ‘आम्ही सगळी मित्रमंडळी नेहमीच त्या बीच रिसॉर्टला जातो.’ बहुतेक लोकांनी अशा पार्ट्या केल्या असतील.

तर मुद्दा ड्रिंक्समधल्या कॅलरीजचा आहे. डाएटवर आहात तर कुठली ड्रिंक घेऊ शकता? कुठलीच नाही. डाएटवर एरवी असतो, आज एक दिवस सूट आहे. तेव्हा जरा ‘लो कॅल लो गिल्ट’ अशी ड्रिंक सांगा ना. लो कॅल लो गिल्ट म्हणजे एक स्मॉल पेग रम/ व्हिस्की/ वोडका/ जीन/ ब्रॅण्डी (‘/’ याचा अर्थ अथवा असा असतो, उगीच गैरसमज नको) आणि पाणी! याहून जास्त काही पण घेतलंत तर ते लो कॅल राहणार नाही! गिल्ट हा खूप वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे त्यावर चर्चा इथे नको, काय?

तरी पण जर कुणाला कॅलरी कॉन्शियस होऊन ड्रिंकची निवड करायची असेल तर ही लिस्ट घ्या. याचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा काय आणि किती घ्यायचं ते...

* ब्रॅण्डी (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज

* जीन (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज

* रम (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज

* वोडका (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज

* व्हिस्की (४० टक्के) ३० मि.ली. ६५ कॅलरीज

* व्हाईट वाईन, ड्राय १ ग्लास (१२० मि.ली.) ७९ कॅलरीज

* रेड वाईन १ ग्लास (१२० मी ली) ८२ कॅलरीज

* व्हाईट वाईन, स्पार्कलिंग १ ग्लास (१२० मि.ली.) ९१ कॅलरीज

* व्हाईट वाईन, स्वीट १ ग्लास (१२० मि.ली.) ११३ कॅलरीज

* बियर, लागर, माईल्ड ३३० मि.ली. १५० कॅलरीज

* बियर, स्ट्रॉंग ३३० मि.ली. २२२ कॅलरीज

* रोझे वाइन १ ग्लास (१२० मि.ली.) २३४ कॅलरीज

- (लेखिका अमिता केळकर डाएट कन्सल्टंट आहेत)

संगणकाची काळजी कशी घ्यावी ?

* मॉनिटर बंद करणे :


जेव्हा संगणक वापरात नसेल तेव्हा त्याचा मॉनिटर बंद करा. हे थ्ण् मॉनिटरसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. कारण ते खूप वापरल्यानंतर जळू शकतात किंवा त्यावरचे काही भाग खराब होऊ शकतात.

* संगणक नेहमीच चालू ठेवा :

बर्‍याच लोकांना हे माहीत नसतं की, सारखा सारखा कमी वेळेपुरता संगणक चालू करणं आणि बंद करणं हे धोकादायक आहे. म्हणूनच संगणक शक्यतो जास्तीत जास्त वेळ चालू ठेवा.

* स्वच्छता महत्त्वाची :

तुमचा संगणक कधी कधी ध्नफू - म्हणजेच खूप गरम - होऊ शकतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे धूळ आणि कचरा. म्हणूनच तुम्ही नेहमी तुमचा संगणक आतून तसंच बाहेरून स्वच्छ ठेवायला हवा. एका स्वच्छ फडक्याने कमीत कमी आठवड्यातून एकदा संगणक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला संगणकाच्या आतील भागांसंबंधी योग्य माहिती असेल, तर तुम्ही केसिंग उघडून त्याच्या आतील भागसुद्धा ६ महिन्यांतून एकदा स्वच्छ करू शकता. हे सर्व करण्यापूर्वी संगणक बंद करायला विसरू नका.

सौजन्य :- एक मराठी वृत्तपत्र  

एक क्षण-एक आयुष्य

‘टाईम इज मनी’ म्हणजेच ‘वेळ हा पैशासारखा’ ही म्हण प्रत्येकालाच पटते. प्रत्येक जण जीव आटवून वेळ आणि पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेही वेळ मोडायला नको म्हणून एक काम संपत नाही तेवढ्यात दुसर्‍या कामाच्या तयारीला आपण लागतो. घड्याळाचे काटे फिरतात तसे आपणही फिरतो. सगळे काही वेळेत झाले तर सर्व काही नीट असे समजून आपण ‘वेळेतच सगळं’ हवे या अट्टहासाचा डोंगर खांद्यावर घेऊन वणवण फिरतो. इथून सुरू होतो वेळ घालवण्याचा प्रवास. वेळ वाचवणे ही इच्छा व सवय म्हणून चांगले. पण ओझे झाले की वेळ जास्त वाया जातो. अनेकदा कुठेतरी पोहचायचे असताना ट्रॅफिक लागला की आपला पारा चढतो. वैताग,चीडचीड आपला ताबा घेते. घाईत चालताना चुकून एखाद्याचा धक्का लागला तरी मानहानी झाल्यासारखे आपण समोरच्या वर तुटून पडतो. या अशा चीडचिडीत अपशब्दांचा गोळीबार करून आपण आपलाच स्तर खाली पाडतो. तसेच बॉसने काहीतरी चूक दाखवली, आईवडिलांनी प्रश्‍न विचारले, सहकार्‍यांनी सल्ला दिला किंवा काहीही मनाला न पटणारे वाटले की आपण शोलेतला गब्बरसिंग होण्यात अजिबात वेळ घालवत नाही. विचार, मन आणि जिभेचे नाते तोडून जे तोंडी येईल ते बोलतो. आपण आपला विचार सोडून देतो या परिस्थितीत. खरं तर बर्‍याचदा ज्यांच्यावर आपण रोषाचा पाऊस पाडत असतो त्यांना त्याची कल्पनाही नसते. प्रचंड त्रासाच्या भट्टीत जळतो फक्त आपणच. चांगले काही घडले की आयुष्य फार वेगात असल्यासारखे वाटते आणि जड प्रसंगात जीवन अगदी कासवपावलांनी सरते असे भासते. या सर्वाचा अर्थ एकच, आयुष्य तेवढेच. ते आपण कसे घालवायचे ते आपणच ठरवतो. येणारा प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा ठरवला तर या जीवनाचे नंदनवनच होईल. छोटे क्षण जेव्हा अनुभवांच्या धाग्यात गुंफले जातात तेव्हा आयुष्याचा हार तयार होतो. प्रत्येक येणार्‍या अनुभवाला चांगल्या नजरेने पहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्ही चीडून घालवलेला एखादा क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीचा, आईवडिलांचा, मुलांचा, कामाचा नक्कीच असेल. प्रत्येक क्षण जगा. जळू नका. रागात, द्वेषात घालवू नका.


‘‘कारण टाईम इज मनी.’’

एक क्षण पुरे मला आयुष्य पाहण्यासाठी

एक क्षण पुरे मला आयुष्य जगण्यासाठी

एक क्षण पुरे मला आयुष्य समजण्यासाठी

पण एक पूर्ण आयुष्य हवे मला ‘‘एका क्षणासाठी’’

‘‘प्रत्येक क्षणात आयुष्य जगा.’’


सौजन्य - लेखक स्वप्ना पाटकर

घरटं - फुकाचा अभिमान

‘अभिमान’ असा नुसता शब्द उच्चारला तरी लगेच अमिताभ आणि जया बच्चन समोर येतात. बायकोला अधिक प्रसिद्धी मिळताना पाहून असूयेने, रागाने बायकोपासून दूर जाणारा नवरा यात अमिताभने उत्तम रंगवला होता. खरं तर बायकोच्या प्रसिद्धीमुळे असूया निर्माण होण्यापेक्षा आपण तिच्याइतके सरस नाही, याचाच राग त्यात जास्त होता. असे अमिताभ आपल्या आसपास खूप असतात.

अशाच एका जया बच्चनने नुकतीच आपली नोकरी सोडली. त्याच निमित्ताने खरंतर हा सिनेमा पुन्हा आठवला. मुलीकडे दुर्लक्ष होतंय, हे एक ठरलेलं कारण तिनेही सांगितलं. तिचा नवरा तुलनेने कमी पगाराच्या, कमी आवाका असलेल्या कंपनीत काम करतो. ही पूर्वीपासूनच तशी एक पाऊल पुढे. कॉलेजमध्ये असताना शिक्षकांना हिचा अभिमान वाटायचा. आपली विद्यार्थिनी खूप पुढे जाणार, असा विश्वासच होता त्यांना. पण, आज परिस्थिती अगदी वेगळी आहे. घरी सासू आहे, नवरा दुपारी कामावर जातो. तरीही मुलीकडे नीट लक्ष दिलं जात नाही म्हणून मग हिने नोकरीच सोडली. नाही म्हणायला, गप्पांच्या ओघात नवर्‍याने मारलेले टोमणे येतातच. सगळं दुःख सांगून झालं की, ‘हे काय चालायचंच. सगळीकडे हीच गत असते,’ अशी सारवासारव करायलाही ती विसरत नाही.


एका मित्रामधला कॉम्प्लेक्स फील तर इतका आहे की, याला खरंच मित्र म्हणावं का, असा प्रश्‍न पडतो. आपण त्याला ‘स’ म्हणूयात. या ‘स’ने सर्वार्थाने वरचढ असणार्‍या मुलीशी लग्न केलं. तिला नोकरीत झपाट्याने बढती मिळत गेली. मात्र तितक्याच झपाट्याने दोघांमधली भांडणंही वाढत गेली. कधीही भेटल्यावर ‘ती काय मजेत आहे. नसायला काय झालं. हल्ली मॅडम झाल्यात ना त्या. त्यामुळे घरात काय, आम्हाला किंमतच नाही,’ अशा अर्थाचं पुराण सुरू करतो. याच स्वभावामुळेच की काय, त्याची मित्रमंडळीही बर्‍यापैकी कमी झालीत. त्याचाही राग स बायकोवरच काढतो. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, फोनवर गप्पा मारणं यासाठी तिच्यावर बरेच निर्बंध आहेत. हे कमीच वाटावं, असेही किस्से आहेत. एक मैत्रीण मुलांना स्वावलंबी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. ऑफिसला गेल्यावर घरी मुलांनी स्वतःची लहानमोठी कामं स्वतःच करावी, असं तिचं आहे. पण, घरातलं कुठलंच काम न येणारा तिचा नवरा मात्र यावर संतापतो. बायकोने मुलांना सूचना केल्या की याचा डायलॉग ठरलेला, ‘आम्ही तुझ्यासारखे पाळणाघरात नाही वाढलो. आमची आई दिवसभर आमच्याबरोबर असायची. सगळं प्रेमाने करायची.’

काय म्हणावं या वृत्तीला?

मनुष्यप्राण्यात नर हा नेहमीच स्वतःला मादीपेक्षा श्रेष्ठ मानत आलाय. सर्व व्यवस्था याच सोयीने तयार केल्या गेल्यात. कामासाठी घराबाहेर पडणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळं आजच्या मुली करतात, हे खरंच. पण, आजही लग्न होऊन मुलगीच सासरी जाते, मुलगा नाही. घरातली कामं स्त्रीनेच पाहायची असतात. पुढारलेल्या देशांमध्येही थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसतं.

याच व्यवस्थेचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. बायको नवर्‍यापेक्षा सरस ठरणं, हे अनेकदा बायकांच्याच पचनी पडत नाही. मग, पुरुषांची काय गत! ज्या बाईला आपण घरात घेऊन आलो तिनेच आपल्याला डोईजड व्हावं? हे पचवणं अनेकांना जमत नाही. बायकोला आपल्यापेक्षा अधिक पगार आहे, ही गोष्ट तर अनेक नवर्‍यांची झोप उडवते. इतकंच नाही, आपल्यापेक्षा अधिक चांगली कंपनी, नीटनेटकेपणा, मनमिळाऊ स्वभाव अशा कोणत्याही गोष्टीवरून नवर्‍याचा अहं दुखावू शकतो. या आणि इतर अनेक बाबतीत बायकोने नवर्‍यापेक्षा जरा कमीच असायला हवं, असा जणू नियमच आहे. नवर्‍यापेक्षा उंच बायको असं दृश्य कितीवेळा दिसतं?

आपण दुसर्‍यापेक्षा सरस आहोत, हे दाखवण्याच्या नादात आपण स्वतःमध्ये कमीपणाची भावना निर्माण करत आहोत, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. आपल्याच जोडीदाराच्या गुणांचं कौतुक करण्याइतकाही चांगुलपणा अशा कद्रू स्वभावाच्या माणसांमध्ये नसतो. बायकोमध्ये अमुक गुण आहे, याबद्दल राग येतो. मात्र, हा राग खरं तर आपल्यात तो गुण नाही याचा असतो. त्यामुळे या नवर्‍यांमध्ये कॉम्प्लेक्स फील येतो. त्यातूनच पुढे वाद, भांडणतंटे सुरू होतात. काही जणी या घुसमटीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारतात. तर, काही जणी वर उल्लेखलेल्या कुणा एकीसारखा तडजोडीचा निर्णय घेतात.

पण म्हणतात ना, अपवादाने नियम सिद्ध होतो. या विषयावर चर्चा करताना एका सहकार्‍याने त्याचा अनुभव सांगितला. ‘लग्नाला आता आठ वर्षं झाली. तिला सुरुवातीपासूनच माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. तिचा वावरही बर्‍याच वेगळ्या वर्तुळात असतो. पण, तिच्याकडे पाहूनच मला अधिक चांगलं काम करण्याची, पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. तिच्यात काही गुण आहेत तसे माझ्यातही आहेत. मी माझ्यातल्या गुणांना अधिक वाव दिला तरच यशस्वी होऊ शकेन, हे समजावून सांगण्यातही बायकोचा वाटा आहे.’ हे सगळं सांगताना सुरुवातीला वादही झाले आमच्यात हे सांगायलाही तो कचरत नाही.

एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी एकमेकांच्या संगतीने, कॉम्पिट न करता कॉम्प्लिमेण्ट करत जगणं, हे अधिक छान आहे, नाही का?

गार्हण्याचे अभंग

पुन्हा ये आषाढी| पुन्हा आलो भेटी|
नम्र जगजेठी| तुझ्या पायी||१

पुन्हा याही वर्षी| गार्हाण्यांची यादी|
दारी हा फिर्यादी| पुन्हा उभा| |२

तुझिया कृपेने| लाभे आम्हा अन्न|
पिकविता खिन्न| शेतकरी| |३

फास विष जया| झालाहे आसरा|
लाज न रे जरा| मंत्रालय| | ४

चेक द्यावा त्यांनी| बोउंस हो तोही|
का रे पत नाही| शासनाची| |५

दरोडे मायान्दल| चोर सोकावले|
जन धास्तावले| अहोरात्र| | ६

पाऊस रे तैसा| समृद्धीचा दाता|
परी करी घाता| जागोजाग| |७

शासकांत पाणी| काहीच नुरले|
शहर तुंबले| पर्वा कुणा| |८

जळाची संकटे| नित्यनेमे येती|
उपायही जाती| पाण्यामध्ये| |९

पोरांनी आमुच्या| शिकावे का सांगा|
अडमिशनचा वांधा| कोण सोडी| |१०

कश्तून खर्चून| टक्के मिळवावे|
टोणपे का खावे| त्यांनी उगा| | ११

शिक्षणाचे खाते| अडाण्याचा गाडा|
आम्ही का तो ओढा| सांग बापा| |१२

वाढले ते डबे| गाड्याही लांबल्या|
तरीही मागल्या| ये रे माझ्या| | १३

वाढत्या गर्दीला| पुरते न काही|
दूरदृष्टी नाही| कोण लेका| |१४

विकार बळावे| रोग हो मुजोर|
डॉक्टरही चोर| कुठे कुठे| |१५

ज्यांनी वाचवावे| त्यांनीच मारावे|
पैसे प्राण घ्यावे| काय न्याय| |१६

विनोदही एक| जाता जाता ऐका|
दुजा कुणा नका| सांगू कधी| | १७

हिंदुस्थान देश| गरीबांचा म्हणे|
श्रीमंतीचे नाणे| खन्न वाजे| |१८

दिसामासामाजी| वाढते संपत्ती|
लक्ष लक्ष कोटी| अब्जावधी| |१९

चाळी सपाटती| टोवर ठाकले
फ्लाट भाव गेले| आकाशाला| |२०

मोल मल्टीप्लेक्स| रिसोर्ट मौजेचे|
मुक्तपणे नाचे| चैन-बाला| |२१

जरी घरी दारी| जेमतेम स्थिती|
चाले खादी-पिदी| मनः पुत| |२२

धनाध्यांचा छंद| सामान्यांना मोही|
डुंबत त्या डोही| उडा उडी| | २३

माउस इवला| गरुड त्या केला|
जो तो झेपावला| फोरेनी| |२४

जेथे माया मोठी| तेथे घेती धाव|
स्वदेशीचा भाव| बारा आणे| | २५

प्रश्न भोळ्या मना| लक्षणे हि कैंची|
होईल का गोची| माणसाची| | २६

ऐशी किती दुखे| सांगू ब विठला|
ठाउकी तुलाही| नक्कीच ना| |२७

तरी का पाहशी| अंत बा भक्तांचा|
सुचे का न साचा| मार्ग तुला| | २८

आयता आषाढीला| जीव शिव भेटे|
म्हणून साकडे| दयावंत| | २९

बघ तुला काही| दिसतो का मार्ग|
अन्यथा हे भोग| साहेन बा| |३०

जरी तुला भारी इतुके हे ओझे|
वाहेन मी माझे| सोपा म्हणे| | ३१

सौजन्य :- लेखक (व)संत सोपारकर.  मार्मिक अंक ४६, वर्ष ५१.

गोपाल कृष्ण गोखले पुण्यतिथी


Born: May 9, 1866


Died: February 19, 1915

Achievements: Political guru of Mahatma Gandhi; one of the pioneers of the Indian national movement; founder of the Servants of India Society.

Gopal Krishna Gokhale was one of the pioneers of the Indian national movement. He was a senior leader of the Indian National Congress. Gokhale gave voice to the aspirations of millions of Indians who were looking for freedom from the British rule. Gandhiji considered him as his political guru. Apart from being a political leader, Gopalkrishna Gokhale, was also a social reformer. He founded the "Servants of India Society"-an organization dedicated to the cause of common people. Gopal Krishna Gokhale's contribution to the making of Indian nation is invaluable.

Gopal Krishna Gokhale was born on May 9, 1866 in Kothapur, Maharashtra. His father Krishna Rao was a farmer who was forced to work as clerk, as the soil of the region was not conducive for agriculture. His mother Valubai was a simple woman. Gokhale received his early education at the Rajaram High School in Kothapur with the help of financial assistance from his elder brother. Later on he moved on to Bombay and graduated from Elphinstone College, Bombay in 1884 at the age of 18.

Gopal Krishna Gokhale was one of the first generations of Indians to receive college education. He was respected widely in the nascent Indian intellectual community and across India. Education influenced Gokhale greatly. His understanding of the English language allowed him to express himself without hesitation and with utmost clarity. His appreciation and knowledge of history instilled in him a respect for liberty, democracy, and the parliamentary system. After graduation, he moved on to teaching, and took a position as an Assistant Master in the New English School in Pune. In 1885, Gokhale moved on to Pune and became one of the founding members of Fergusson College, along with his colleagues in Deccan Education Society. Gopal Krishna Gokhale gave nearly two decades of his life to Fergusson College and rose to become principal of the college. During this time, Gokhale came in contact with Mahadev Govind Ranade. Ranade was a judge, scholar, and social reformer, whom Gokhale called his guru. Gokhale worked with Ranade in Poona Sarvajanik Sabha of which Gokhale became the Secretary.

Gopal Krishna Gokhale entered public life in 1886 at the age of 20. He delivered a public address on "India under the British Rule", which was highly appreciated. Gokhale regularly contributed articles to Bal Gangadhar Tilak's weekly "Mahratta". Through his articles he tried to awaken the latent patriotism of Indian people. Soon, Gokhale was promoted as Secretary of the Deccan Education Society. When the Indian National Congress held its session in Poona in 1895, he was the secretary of the Reception Committee. From this session, Gokhale became a prominent member of the Indian National Congress. Gokhale was twice elected as president of Pune Municipality. For a while Gokhale was also a member of the Bombay Legislative Council where he spoke strongly against the then Government.

In 1902, Gokhale left the Fergusson College. He became a Member of the Imperial Legislative Council in Delhi. There he spoke for the people of the country in an able manner. Gokhale had an excellent grasp of the economic problems of our country which he ably presented during the debates. In 1905, Gokhale started a new society called "Servants of India Society". This society trained workers for the service of the country. In the same year, Gokhale went to England to voice his concerns relating to the unfair treatment of the Indian people by the British government. In a span of 49 days, he spoke in front of 47 different audiences, captivating every one of them. Gokhale pleaded for gradual reforms to ultimately attain Swaraj, or self-government, in India. He was instrumental in the introduction of the Morley- Minto Reforms of 1909, which eventually became law. Though the reforms sowed the seeds of communal division in India, nevertheless, they gave Indian access to the seats of the highest authority within the government, and their voices were more audible in matters of public interest.

Gopal Krishna Gokhale was a diabetic and asthmatic. Excessive assertion took its toll on Gokhale's health and ultimately he died on February 19, 1915.

सौजन्य : - iloveindia.com

Friday, February 18, 2011

भ्रष्टाचार म्हणजे काय रे भाऊ?

तर भ्रष्टाचार म्हणजे काय ? कुणी सांगू शकेल याचा अर्थ ! सध्या आपण २जी स्पेक्ट्रम, आदर्श सोसायटी, राष्ट्रकुल स्पर्धा अश्या घोटाळ्यांच्या बद्दल भरपूर एकतोय. तर घोटाळे म्हणजे तरी काय. तर घोटाळे हे सुद्धा भ्रष्टाचाराचेच रूप आहे. काय तुम्ही नाही सांगू शकत "भ्रष्टाचार" म्हणजे काय ते. चला आपण भ्रष्टाचारावर चर्चा करू. माझ्या मते भ्रष्टाचार हा दोन प्रकारांचा असतो.


१. भ्रष्ट + आचार

२. भ्रष्टांचा + आचार

पूर्वी भ्रष्टाचार हा शब्द स्पृश्य लोक अस्पृश्यांचा भेदभाव करताना वापरत असत. पण आता याच शब्दाला आर्थिक रूप मिळाले आहे.


तर वरील १ प्रमाणे भ्रष्ट + आचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेला चुकीचा आर्थिक आचार (वर्तणूक). आता एखाद्या व्यक्तीने भ्रष्ट + आचार करण्यासाठी वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे कि, व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, अतिरिक्त आर्थिक गरज, आर्थिक उधळणीची सवय वगैरे.

उदा : २ जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धा.


तर वरील २ प्रमाणे भ्रष्टांचा + आचार म्हणजे अश्या भ्रष्ट व्यक्तींनी एकत्र येऊन केलेले चुकीचे आर्थिक आचार (वर्तणूक). याचे मात्र एकाच कारण असू शकते. जर सर्व खात आहेत तर आपण तरी मागे का राहावे.

उदा : आदर्श सोसायटी.

तर अश्या या भ्रष्टाचाराचा अनुभव आपण पदोपदी घेत असतो. आता आपण पण या भ्रष्टाचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आहोत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.



मला एक छोटेसे उदाहरण द्यावेसे वाटते.

आपण काम करत असलेल्या संस्थेसाठी आपल्याला कधी ना कधी तरी संस्थेच्या कामा निमित्त प्रवास करावा लागतो. समजा, आपण बसने प्रवास केला असेल तर आपण बस भाडे जास्त लावतो, किंवा रिक्षा भाडे लावतो. म्हणजे समजा बस भाडे रु. ६ असेल आणि आपण रु. ८ लावत असू तर? अर्थात काही जण चालत जातात (मुंबई सारख्या ठिकाणी) व बस भाडे लावतात, तर मी म्हणेन चालत जाऊन योग्य बस भाडे रु. ६ लावणे हा भ्रष्टाचार नसून, चालत किंवा बसने जाऊन रु. ८ भाडे लावणे हा भ्रष्टाचार आहे.

कामाच्या रगाड्यातून वेळ मिळेल तेव्हा विचार करून पहा, आपण १ किंवा २ यापैकी कोणत्या कक्षेत बसतो, कि दोन्ही कक्षांमध्ये बसतो.

एकाग्रतेची गुरुकिल्ली त्राटक

योगाभ्यास करीत असताना मनाची एकाग्रता आवश्यक असते अन्यथा योगासने म्हणजे शारीरिक कसरत होते.


मनाची एकाग्रता ही जीवनात कित्येक वेळी आवश्यक ठरते. विशेषकरून विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता म्हणजे अभ्यासाचा प्राण.

अभ्यासात लक्ष लागत नाही अशी तक्रार कित्येक पालक आणि विद्यार्थी करीत असतात. एकाग्रतेसाठी पहाटे लवकर उठणे, रात्री उशिरा जागरण करणे असे विविध प्रयोग केले जातात. विशेषत: परीक्षेच्या काळात तर अशा प्रयोगांना आणि संबंधित उपचारांना उधाण येते.

योगाभ्यासातील ‘त्राटक’ म्हणजे मानसिक एकाग्रतेसाठी एक गुरुकिल्लीच आहे. ‘पी हळद नि हो गोरी’ अशा म्हणीप्रमाणे गोळी खाल्ल्यावर लगेच परिणाम होत नसला तरी नियमित त्राटक केल्यास खालील फायदे निश्‍चित मिळतात -

१) मानसिक एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते २) डोळ्यांचे दोष दूर होऊन दृष्टी सुधारते
३) आत्मविश्‍वास वाढतो, मनोधैर्य वाढते ४) निर्णयक्षमता वाढते, मनोबल उंचावते
५) ताण-तणावाचे व्यवस्थापन करून समतोल, आरोग्यपूर्ण जीवन जगता येते
६) स्वयंस्फूर्ती जागृत होऊन कार्यक्षमता वाढते ७) निद्रानाशाच्या तक्रारी दूर होतात.

आसन स्थिती : पद्मासन, वज्रासन किंवा सुखासनात बसावे. हे शक्य नसेल तर खुर्चीवर पाठीचा कणा सरळ राहील अशा अवस्थेमध्ये बसावे.


* साधारण एक मीटर अंतरावर डोळ्यांच्या रेषेत दिव्याची ज्योत येईल असा दिवा ठेवावा किंवा भिंतीवर बिंदू/टिकली लावावी. हल्ली ॐच्या भोवताली वर्तुळे असलेले चित्रसुद्धा वापरतात.

* प्रथम दीर्घ श्‍वास-प्रश्‍वासाची पाच आवर्तने करावीत. नंतर डोळ्यांच्या पापण्या न मिटता एकटक ज्योत/बिंदूकडे पाहत राहावे. बुब्बुळांचीसुद्धा हालचाल करू नये. दिवा लावल्यास हवेने ज्योत हलणार नाही याची काळजी घ्यावी.

* काही वेळाने डोळ्यांवर ताण येऊन पापण्या आपोआप मिटू लागल्यावर हळुवारपणे डोळे मिटून काही वेळ तसेच ठेवावेत. डोळे चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा तक्रारी सुरुवातीला जाणवतात, परंतु सरावामुळे त्या कमी होतात.


* सर्वसाधारणपणे त्राटकाचा तीन ते पाच मिनिटे नियमित सराव केल्यास पुरेसे असते.

* सभोवतालचे वातावरण प्रसन्न असावे, कोंदट नसावे.

* मध्य त्राटक हे कोणाही व्यक्तीला करता येते.

* बाह्य त्राटक सूर्याकडे पाहून करावयाचे असल्यास सकाळच्या कोवळ्या किरणातच करावे. भरदुपारी करू नये.

* सुरुवातीला त्राटक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

* त्राटकांचा सराव विद्यार्थ्यांसाठी परीक्षापूर्व काळात भीती, दडपण अशा मानसिक तक्रारींसाठी निश्‍चित आशेचा किरण ठरू शकतो.

* त्राटकांचे प्रकार

पुरातन ग्रंथांमध्ये त्राटकांचे तीन प्रकार सांगितले आहेत -

आंतर त्राटक : यामध्ये साधक डोळे बंद करून नाभी, हृदय किंवा भुवयांमधील मध्यबिंदू यापैकी एका ठिकाणी अंतर्मुख होऊन पाहत राहतो.

बाह्य त्राटक : यामध्ये डोळे उघडे ठेवून चंद्र, सूर्य किंवा तारे या दूरवरच्या वस्तूंवर साधक एकटक पाहत राहतो.

मध्य त्राटक : या प्रकारात बिंदू, दिव्याची ज्योत यांसारख्या वस्तूंकडे साधक एकटक पाहत राहतो.

सौजन्य :- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक.

खा बरे हरभरे!

हरभरे वायुकारक असले तरी ते पित्त, कफनाशक, थंड व रक्तविकार नाहीसे करणारे आहेत. म्हणूनच नेहमीच्या आहारात हरभर्‍याचा वापर भाजी-आमटीसाठी आवर्जून केला जातो. हरभर्‍यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.


* मोड आलेल्या हरभर्‍यापासून जीवनसत्त्व ‘ब’ मिळते तर कोवळ्या हरभर्‍याच्या पानापासून जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘क’ मिळते.

* हरभर्‍याची पानं चवीला आंबट, तुरट असून या पानांची भाजी खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. पोट कमी होतं. हिरड्यांची सूज नाहीशी होते.

* हरभर्‍याच्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पित्तज्वर कमी होतो.

* हरभर्‍यापासून बनवलेले गरम फुटाणे खाल्ल्याने मूळव्याधीपासून स्रवणारं रक्त कमी होतं.

* ओले चणे आणि गूळ खाल्ल्याने आवाज सुरेल होतो.

* रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन वर गरम पाणी प्यायल्याने बसलेला आवाज मोकळा होतो.

* हरभर्‍याच्या डाळीच्या पिठात थोडं पाणी आणि थोडं तूप घालून शरीराला मालीश केल्याने शरीराचा वर्ण सुधारतो. या पिठाने तोंडावर मालीश केल्याने तोंडाचा फिकटपणा नाहीसा होतो. त्वचा मऊ आणि कोमल बनते.

* कसल्याही गाठीवर बेसनाच्या पिठाचा फायदा होतो. बेसनपिठात थोडं गुग्गळ, हळद घालून ते पाण्यात कालवून गरम करून कसल्याही गाठीवर बांधल्याने गाठ बसते. परत येत नाही.

* गुळाच्या थोड्या गरम पाकात हरभर्‍याची टरफलं टाकून तो लेप हातापायात भरलेल्या लचकेवर लावल्यास लचक बरी होते.

टीप : मूतखड्याचा त्रास असणार्‍यांनी चणे वर्ज्य करावेत. अतिसेवनाने मलावरोधाचा त्रास होऊ शकतो. कच्चे हरभरे खाताना सोबत खोबरे-गूळ खावे.

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

ऍनिमल थेरपी


मला तर हा लेख पटतो. कारण माझ्या कॉलेज लाइफ आमच्या कडे मांजर पाळली होती. तुम्ही कधी प्राण्यांना आपला 'मित्र'  बनवून पाहिलेत का ?   


प्राणी पाळणे ही केवळ ‘हौसे’ची गोष्ट असे आपल्याकडे अजूनही मानले जाते, पण या प्राण्यांचा उपयोग आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठीही होऊ शकतो हे मानसशास्त्रज्ञांनी व संशोधकांनी सिद्ध करून दाखवले आहे. यालाच प्राणी चिकित्सा किंवा ऍनिमल असिस्टेड थेरपी असे म्हणतात.


वास्तविक पाळीव पशू-पक्ष्यांनाही आपल्यासारखेच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. माणसाच्या सहवासामुळे त्यांना आपली बोली कळते, आपले हसणे-रडणे कळते. इतकेच काय तर आपल्या मनातली गोष्टही ते समजून घेऊ शकतात. हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर तुमचा कुत्रा किंवा कुत्री तुमच्या पलंगाशेजारीच ठाण मांडून बसेल. तुम्ही रडत असाल तर तो जिभेने तुमचे पाय गोंजारेल किंवा अश्रू पुसेल. फक्त कुत्राच नव्हे तर कोणताही पाळीव प्राणी मनुष्याचा चांगला मित्र बनू शकतो. या मैत्रीचा उपयोग आपण आपले आरोग्य सुधारण्यासाठीही करू शकतो.

व्याधी आणि प्राणी

* उच्च रक्तदाब, हृदयरोग असणार्‍या व्यक्तींनी काचेच्या टँकमध्ये ठेवलेल्या माशांच्या मनमोहक हालचाली पहाव्यात किंवा कुत्रा-मांजराच्या सान्निध्यात २०-२५ मिनिटे राहावे. मनावरचा ताण आपोआप कमी होऊ लागतो. उत्साह वाढतो.

* मुलांचे बौद्धिक कौशल्य वाढविण्यासाठी त्यांना लॅब्रेडॉर, गोल्डन, रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल यांसारख्या शांत स्वभावाच्या कुत्र्यांसोबत खेळायला द्यावे.

* मांजर, ससा यांसारखे प्राणीही मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देतात.

* भावनिक समस्येच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तींना जीवनाची नवी दिशा शोधायची असेल तर त्यांनी कबुतर, लव्ह बर्डस्, फुलपाखरे यांच्या सान्निध्यात वेळ घालवावा.

* उच्चार दोष असलेल्या व्यक्तींनी पोपट, काकाकुवा यांसारख्या पक्ष्यांशी संवाद साधावा.


* ऍनिमल एंजल

प्राण्यांच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत जगात सर्वत्र अवलंबिली जात आहे. यासाठी खास प्रशिक्षित प्राण्यांचा वापर केला जातो. पण हिंदुस्थानात अजूनही अशा संस्था फारच कमी आहेत. मात्र रोहिणी फर्नांडीस यांनी ऍनिमल एंजल फाऊंडेशन ही संस्था मुंबईत सुरू करून ऍनिमल थेरपीची मुंबईकरांना नव्याने ओळख करून दिली. ज्यांना घरी प्राणी पाळणे शक्य नाही त्यांना या संस्थेचा आधार मिळत आहे. ही संस्था त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या प्राण्यांमार्फत रुग्णांवर उपचार करते. अधिक माहितीसाठी www.animalangelsfoundation.com या वेबसाईटवर भेट द्या.

सौजन्य :- एक मराठी दैनिक वृत्तपत्र.

Thursday, February 17, 2011

वासुदेव बळवंत फडके पुण्यदिन

 Vasudeo Balwant Phadke (Marathi: वासुदेव बळवंत फडके) was an Indian revolutionary and is widely regarded as the father of the armed struggle for India's independence. Phadke was moved by the plight of the farmer community during British Raj. Phadke believed that 'Swaraj' was the only remedy for their ills. With the help of Ramoshis, Kolis, Bhils and Dhangars communities in Maharastra, Vasudev formed a revolutionary group called as Ramoshi. The group started an armed struggle to overthrow the British Raj. The group launched raids on rich English businessmen to obtain funds for their liberation struggle. Phadke came into limelight when he got control of the city of Pune for a few days when he caught the British soldiers off guard during one of his surprise attacks.


Early Age

Vasudev was born on 1845-11-04 in Shirdhon village of Panvel taluka based in Raigad district in Maharashtra state in a Marathi Chitpavan Brahmin family. As a child Vasudev preferred learning skills like wrestling, riding over high school education and dropped out of school. Eventually he moved to Pune and took the job as a clerk with military accounts department in Pune for 15 years. Krantiveer Lahuji Vastad Salve a then prominent social figure based in Pune was the mentor of Vasudev. Lahuji Salve, an expert wrestler operated a gymnasium. Lahuji preached the importance of independence from British Raj. Lahuji belonged to Mang community an untouchable community, taught Vasudev the importance of getting backward castes into mainstream freedom movement. It was during this period that Vasudev began attending lectures by Govind Ranade which mainly focused on how the British Raj policies hurt the Indian economy. Vasudev was deeply hurt by how this was leading to widespread suffering in the society. In 1870, he joined a public agitation in Pune that was aimed at addressing people's grievances. Vasudev founded an institution, the Aikya Vardhini Sabha, to educate the youth. While working as clerk, Vasudev was not able to see his dying mother due to the delay in approval of his leave. This incident enraged Vasudev and happened to be the turning point in his life.

Revolt with the help of the Ramoshi's

In 1875, after the then Gaikwad ruler of Baroda was deposed by the British, Phadke launched protest speeches against the government. Severe famine coupled with the evident apathy of the British administration propelled him to tour the Deccan region, urging people to strive for a free republic. Unable to get support from the educated classes, he gathered a band of people from the Ramoshi caste. People from the Kolis, Bhils and Dhangars were also included later. He taught himself to shoot, ride and fence. He organised around 300 men into an insurgent group that aimed at liberating India from British rule. Vasudev intended to build an army of own but lacking funds they decided to break into government treasuries. The first raid was done in a village called Dhamari in Shirur taluka in Pune district. The income tax which was collected for British Raj was kept in the house of local business man Mr. Balchand Fojmal Sankla. They attacked the house and took the money for the benefit of famine stricken villagers. There they collected about four hundred rupees but this led to his being branded as a dacoit. To save himself Vasudev had to flee from village to village, sheltered by his sympathisers and well-wishers, mostly the lower class of the society. Impressed by his zeal and determination, the villagers of Nanagaum offered him protection and cover in the local forest. The general plot would be to cut off all the communications of British forces and then raid the treasury. The main purpose of these raids was to feed famine-affected farmer communities. Vasudev performed many such raids in areas near Shirur and Khed talukas in Pune.

Meanwhile, Vasudev continued his raids and increased his follower-base. The monetary situation of the movement improved. But then Vasudev had a realization the people around him were more interested in his loot, or wealth, than in the ideals that he wanted to fight for. Vasudev decided it was time for him to find a new place. He decided to move to south, and headed for Shri Shaila Mallikarjun shrine. After overcoming the moral defeat, Vasudev again recruited about 500 Rohilas to form strong army to start a fresh fight against the British Raj.

Capture and death

Vasudev's plans to organize several simultaneously attacks against the British Raj nation wide were met with very limited success. He once had a direct engagement with the British army in the village of Ghanur, whereafter the government offered a bounty for his capture. Not to be outdone, Phadke in turned offered a bounty for the capture of the Governor of Bombay, announced a reward for the killing of each European, and issued other threats to the government. He then fled to Hyderabad State to recruit Rohilla and Arabs into his organisation. A British Major, Henry William Daniell and Abdul Haque, Police Commissioner to the Nizam of Hyderabad, pursued the fleeing Vasudev day and night. The British move to offer a bounty for his capture met with success: someone betrayed Phadke, and he was captured in a temple after a fierce fight at the district of Kaladgi on 20 July 1879 while he was on his way to Pandharpur. From here he was taken to Pune for trial. Vasudev and his comrades were housed in the district session court jail building, near Sangam bridge, which now happens to be the state C.I.D. building. His own diary provided evidence to have him sentenced for life. Vasudev was transported to jail at Aden, but escaped from the prison by taking the door off from its hinges on 13 February 1883. But his escape was too short lived: he was recaptured and put back in prison. Vasudev then went on a hunger strike to death. On 17 February 1883 Vasudev breathed his last breath as a result of his protest hunger strike.

Inspirational figure

One of the reasons for Vasudev to known as the father of the Indian armed rebellion was the fact that he was the source of inspiration for couple of fellow freedom fighters. Bankim Chandra Chatterjee's famous patriotic novel Anand Math incorporated various contemporary acts of patriotism performed by Vasudev during his freedom struggle. As the British government didnt like this, Bankim had to print upto 5 editions of the book to tone down these stories.

(सौजन्य :- हिन्दू जागृति . ओर्ग )

Wednesday, February 16, 2011

ओठांची मोहोळ खोल ना!

एक सुंदरसं हसू तुमचा दिवस आनंदी बनवत असतं हे हसू चेहर्‍यावर पसरवतात ते ओठ! आकर्षक ओठ आणि प्रसन्न हसू सगळ्यांनाच मिळत नाही, ती दैवी देणगी आहे. पण वैद्यक शास्त्राने इतकी कमाल केली आहे की शस्त्रक्रिया करून (पाऊट सर्जरी) ओठांचा आकारही आजकाल बदलता येतो. शस्त्रक्रिया न करताही फिलर्स वापरून ओठ भरीव करण्याचीही आधुनिक पद्धत आजकाल वापरली जाते. सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ओठांची शस्त्रक्रिया करण्याचा ट्रेण्ड आहे. बारीक ओठांना भरीव करून ओठांची मोहोळ प्रत्यक्षात खोलणार्‍या या शस्त्रक्रियांविषयी माहिती देत आहेत इवॉल्व मेड स्पाचे कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट डॉ अभिजित देसाई


पाऊट सर्जरी म्हणजे काय?

ओठांचा आकार बदलण्यासाठी केली जाणारी ही एक उपचार पद्धती आहे स्त्रियांच्या सौदर्यामध्ये ओठांना खूप महत्त्व आहे. ओठ उठावदार दिसण्यासाठीच स्त्रिया लिपस्टिक लावतात. परंतु, हा झाला वरवरचा उपाय. परंतु ओठांचा आकार कायमचा रुंद करण्यासाठी ओठ किंचित बाहेर काढण्यासाठी एक कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करता येते. तिलाच पाऊट सर्जरी म्हणतात.

ही शस्त्रक्रिया कशी करतात?

जसे वय वाढते तसे आपले ओठ बारीक होत जातात शिवाय काहींचे ओठ जन्मत: पातळ असतात. अशावेळी काही महिला ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात या सर्जरीसाठी किमान दीड तास लागतो सर्जरी झाल्यावर रूग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो शस्त्रक्रिया केल्यानंतर ओठांना थोडी सूज येते पण ही सूज काही दिवसांत निघून जाते

शस्त्रक्रियेव्यतिरिक्त दुसरी एखादी पद्धत आहे का?

ओठांवरील दुसरी उपचार पद्धती म्हणजे डर्मल फिलर्स ही एक विनाशस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे यात ओठांच्या बॉर्डरवर इंजेक्शनने एक द्रव्य सोडले जाते या उपचार पद्धतीने ओठांना सूज येत नाही केवळ दहा मिनीटात हा उपचार होतो तसेच फिलर्स भरल्यानंतर वेदनादेखिल अत्यंत कमी होतात

कोणत्या वयोगटातील महिला या उपचार पद्धती करू शकतात?

साधारण २५ ते ४५ या वयोगटातील महिला असा उपचार करून घेऊ शकतात.

कोणत्या उपचार पद्धतीला अधिक प्राधान्य दिले जाते?

फिलर्स उपचार करून घेण्याकडे महिलांचा कल अधिक असतो डर्मल फिलर्सच्या सहाय्याने त्या आपले ओठ जाडजूड करून घेतात कारण याद्वारे लवकर अपेक्षित रिझल्ट मिळतो पाऊट शस्त्रक्रियेपेक्षा फिलर्स वापरणे अधिक सोयीस्कर आहे.

या पद्धतीने ओठांचा आकार बदल्यानंतर तो तसाच राहतो का?

पाऊट सर्जरीने ओठांचा आकार तसाच राहतो याने ओठ कायम भरलेले दिसतात तर फिलर्सचा परिणाम जवळजवळ वर्षभर राहतो आणि वर्षभरानंतर पुन्हा एकदा ओठांचा आकार हवा तसा करून घेता येतो

यासाठी किती खर्च येतो?

फीलर्ससाठी सुमारे तीस हजार रुपये खर्च येतो तर पाऊट सर्जरीसाठी सुमारे ७० हजार रूपये खर्च होऊ शकतो
सौजन्य  :- bandra@evolvemedspa.org

Tuesday, February 15, 2011

इंटरनेट स्टोअरेज

घरातलं महत्त्वाचं सामान साठवून ठेवण्यासाठी आपण फ्रीज, कपाट यांचा वापर करतो. दागदागिने, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचे लॉकर वापरतो. आपल्या कौटुंबिक कार्यक्रमांचे व्हिडीओ क्लिप्स, संपर्क क्रमांक, फोटोज्, गाणी इत्यादी आपण सीडी, पेनड्राइव्हमध्ये सेव्ह करतो, पण हा डेटा उडाला की मात्र पंचाईत होते. म्हणून हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आजकाल इंटरनेटवर स्टोअर करता येतो. आधुनिक काळातील या ई-स्टोअरेजविषयी...

संगणक, मोबाईल किंवा कोणत्याही डिजिटल उपकरणातील ‘डेटा’ अर्थात ‘माहिती’ साठवून ठेवण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटमधली कार्यालयीन माहिती असो, गाणी, व्हिडीओ क्लिप्स असो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग असो ही माहिती साठवण्यासाठी आपण संगणकातील हार्ड डिस्क, सीडी किंवा डीव्हीडी, मेमरी कार्ड, पेनड्राइव्ह याचा वापर करतो. यासाठी आपल्याला पैसेही खर्च करावे लागतात.


त्याचबरोबर पारंपरिक डेटा स्टोअरेज पद्धतीमध्ये अनेक तोटेदेखील आहेत, जसे जर आपला संगणक किंवा मोबाईल अचानक क्रॅश झाला तर आपली सर्व महत्त्वपूर्ण माहिती ‘वॉश आऊट’ अर्थात नाहीशी होण्याची शक्यता असते व ही माहिती काहीही असू शकते. ती तुमचे महत्त्वाची कागदपत्रेदेखील असू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत सहलीला गेलेल्या सुंदर ठिकाणाचे फोटो, अगदी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आपल्या आवडीच्या गाण्यांच्या कलेक्शनचा केलेला संच...एकदा का ही माहिती नाहीशी झाली की मात्र ती परत मिळण्याची सुतराम शक्यता नसते. अशा सर्व अनेक अडचणींवर ‘ई-स्टोअरेज्’ हा सर्वोत्तम पर्याय आहे.

क्षणात डेटा स्टोअर


१) ई-स्टोअरेज म्हणजे आपली महत्त्वपूर्ण माहिती मग ती कोणत्याही स्वरूपातील असो, ती इंटरनेटचा वापर करून ई-स्टोअरेज पुरवणार्‍या कोणत्याही संकेतस्थळावर साठवून ठेवणे ई-स्टोअरेज पुरवणारी शंभराहूनही अधिक अतिशय चांगली संकेतस्थळे सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जिथे आपण अगदी क्षणार्धात आपला डेटा स्टोअर करू शकतो व त्यासाठी काहीही पैसे खर्च करायची गरज पडत नाही.

२) ई-स्टोअरेजचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण कोणत्याही संकेतस्थळावर साठवून ठेवलेली माहिती कधीही व कुठेही म्हणजेच जगातील कोणत्याही ठिकाणी वापरू शकतो व त्यासाठी आपणास फक्त इंटरनेटची गरज असते. म्हणजेच जर आपण सुट्टीसाठी बाहेरगावी गेला आहात व आपणास आपल्या घरातील संगणकावरील एखादी फाईल हवी असेल व ती फाईल आपण ई-स्टोअर केली असेल तर फक्त इंटरनेटवरून ती फाईल डाऊनलोड करून आपण ती वापरू शकतो.

३) ई-स्टोअरेजमधील अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे आपण आपला डेटा बॅकअप, डिलीट, दुसरीकडे मूव्ह, कॉपी आणि महत्त्वाचे म्हणजे शेअर अर्थात दुसर्‍यालादेखील देऊ शकतो. त्याचबराबेर ऍक्सेस कंट्रोल अर्थात आपली माहिती फक्त आपणाव्यतिरिक्त दुसरे कोणीही वापरू शकत नाही. अशा प्रकारची सुरक्षिततादेखील देऊ शकतो.

४) इन्क्रिप्शन/डिक्रिप्शन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अगदी प्रत्येक फाईल किंवा फोल्डरला सुरक्षित असा पासवर्डदेखील देऊ शकतो. त्यामुळे आपणाव्यतिरिक्त आपला डेटा कोणीही वापरू शकत नाही. त्याचबरोबर ‘मॅनेज बडी’ नावाच्या प्रकारात आपण आपल्याच ओळखीच्या लोकांना आपला डेटा वापरण्यास परवानगी देऊ शकतो.

५) ई-स्टोअरेजमुळे आपणास आपल्या माहितीची काळजी करावयाची गरज पडत नाही. कारण ई-स्टोअरेज सेवा पुरवणार्‍या सर्व संकेतस्थळाकडे परिपूर्ण अशी बॅकअप सुविधा असते व आपली माहिती अनेक ठिकाणी स्टोअर केली जाते. म्हणजेच जरी संकेतस्थळामधील एखाद्या ठिकाणावरील डेटा खराब किंवा ‘वॉश आऊट’ झाला तरी त्याचा व्यवस्थित बॅकअप असल्यामुळे आपला डेटा सुरक्षित असतो. बहुतांशी संकेतस्थळे अगदी १0०GB ँ पर्यंत आपल्याकडील डेटा स्टोअर करण्याची सुविधा देतात.

महत्त्वपूर्ण संकेतस्थळे


१) मायक्रोसॉफ्ट स्काय ड्राईव्ह - मायक्रोसॉफ्ट स्काय ड्राईव्हवर आपण 25GB डेटा स्टोअर करू शकतो व तो शेअरदेखील करू शकतो. जर आपणाकडे hotmail किंवा live.com ई-मेल ऍड्रेस असेल तर आपण तत्काळ ही सुविधा वापरू शकतो. अन्यथा आपणास http://skydrive.live.com या मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.


२) Rapidshare.com - डेटा शेअरिंगमधील सर्वात जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ म्हणजे रॅपिड शेअर.

३) www.driveway.com या संकेतस्थळावर आपण 5GB पर्यंत डेटा स्टोअर करू शकतो.

४) http://picasa.google.com - गुगलचे पिकासा फोटो तसेच व्हिडीओ शेअरिंगमधील अग्रणीय संकेतस्थळ आहे.

५) http://www.flickr.com व http://photobucket.com हीदेखील फोटो स्टोअर व शेअर करणारी लोकप्रिय संकेतस्थळे आहेत.

६) http://myotherdrive.com या संकेतस्थळावर आपण फोटो, गाणी तसेच व्हिडीओ स्टोअर व शेअर करू शकतो.

७) http://b2.crashplan.com आपल्या संगणकातील संपूर्ण डेटा ऑनलाईन बॅकअप करण्यासाठी इंटरनेटवरील (हे एक सर्वोत्तम संकेतस्थळ आहे.)

८) www.mp3tunes.com आपल्याकडील MP3 गाणी इंटरनेटवर स्टोअर व शेअर करणारे हे संकेतस्थळ आपणास आपली स्टोअर केलेली गाणी कोणत्याही डिजिटल उपकरणावर डाऊनलोड करण्याचे अनोखे वैशिष्ट्यदेखील पुरवते.

सौजन्य :- mailto:Techno.sarxy@live.com          हा लेख माझ्या मते खुपच "उपयुक्त" आहे.

Monday, February 14, 2011

शिरढोणचा ढाण्या वाघ

इ. स. 1800 चं शेवटचं पर्व सुरू झालं. ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. भारतमाता ब्रिटिशांच्या आणि पारतंत्र्याच्या जोखडात जखडू लागली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि 1857 मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. या स्वातंत्र्ययुद्धात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, दिल्लीचा बादशहा असे अनेकजण सामील झाले. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी 4 नोव्हेंबर 1845 रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके!


प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण व नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तिपत्रक नको म्हणून त्यांनी फायनल परीक्षेपासून दूर राहणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्‍या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. यावेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असताना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले. पण ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. 1876 ते 78 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत करीत नाही हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले.


 
वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याची व भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता व शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले, पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना व ठाणी लुटली. इ.स. 1879 मध्ये त्यांच्या बंडांनी पुणे व रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने 5000 रुपयांचे इनामही लावले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी व आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले. पण देवरनावडगी या ठिकाणी अखेर ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटल्याचा फार्स करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी एडनला करण्यात आली. निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा व क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आजारपण व अन्नत्यागामुळे 17 फेब्रुवारी 1883 रोजी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला! 17 फेब्रुवारी रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला आद्यक्रांतिवीराला मानाचा मुजरा!


पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडक्यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर कै. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतिमंदिर आहे. या स्मृतिमंदिरात वासुदेवरावांचे फोटो, माहिती, पुतळे आणि ते लहानपणी वापरत असलेली बोकडाची गाडी ठेवण्यात आली आहे. 17 फेब्रुवारीला स्मृतिमंदिरात वासुदेवरावांच्या पुण्यदिनाचा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी शिरढोण येथील क्रांतिवीरांचे चरित्र अभ्यासक माधव जोग-9323025167 यांच्याशी संपर्क साधावा. कर्नाळा किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि मुंबईजवळ असलेल्या शिरढोण येथील वासुदेवरावांच्या जन्मभूमीस आणि वाड्यास आवर्जून भेट द्या. ज्या क्रांतिवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली त्या सशस्त्र क्रांतींचे प्रवर्तक आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर नतमस्तक सारेजण होतात.

अस्तित्वाला या देशाच्या जाग आणली खरी ।

म्हणोनी तुजला संबोधन हे आद्यक्रांतिकारी ॥

सौजन्य :-  संदीप शशिकांत विचारे