Tuesday, June 28, 2011

पावसाळ्यातली खबरदारी कॉम्प्युटर-लॅपटॉपची

संगणक व लॅपटॉप बिघाडाच्या सर्वात जास्त तक्रारी पावसाळ्यात उद्भवतात व फक्त पावसाचे पाणी जाऊन नव्हे तर इतर अनेक गोष्टींमुळे संगणक व लॅपटॉप बिघाडाचे प्रमाण पावसाळ्यात खूपच वाढते. तुमच्या संगणक व लॅपटॉपला पावसाळ्यातील विविध बिघाडांपासून दूर ठेवण्यासाठी खालील काही टीप्स-

- घरात व्यवस्थित इलेक्ट्रिकल आथिर्ंंग नसेल तर तुमच्या संगणकाचा व लॅपटॉपचा एश्झ्ए (स्वीच मोड पॉवर सप्लाय) खराब होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. बहुतांशी वेळेस पावसाळ्यात एश्झ्ए जळण्याच्या सर्वात जास्त घटना घडतात. त्यामुळे तुम्ही तुमचा संगणक/ लॅपटॉप ज्या इलेक्ट्रिकल पॉइंटला लावत असाल त्याला व्यवस्थित आर्थिंग असल्याची खात्री करून घ्या.


- आजकाल बर्‍याच ठिकाणी केबल इंटरनेटचा वापर केला जातो. केबल इंटरनेट म्हणजेच ज्या केबल टीव्हीवरून आपण टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्याच केबलवरून संगणकावरील इंटरनेटदेखील चालते. बर्‍याचदा केबल्समधून विशेषत: पावसाळ्यात मोठ्या स्पाइकच्या विद्युतलहरी इतर ठिकाणांवरून येतात. त्यामुळे तुमचा संगणक जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषत: विजा कडकडत असताना संगणक सुरू करू नका.

- पावसाळ्यातली सर्वात जास्त आढळणारी आणखी एक तक्रार म्हणजे संगणकाच्या आतील मेमरी कार्ड खराब होणे. बर्‍याचदा आपला संगणक/ लॅपटॉप सुरुवातीला ३बीपची वॉर्निंग देऊन चालू होत नाही. संगणकातील मेमरी (RAM) दमटपणामुळे मॉइचराईज्ड झालेली असल्यामुळे हा त्रास उद्भवतो. अशावेळेस संगणकातील श् काढून तिला खोडरबर अथवा इतर कोणत्याही रबरी पदार्थाचा वापर करून पुसल्यास तुमचा संगणक लगेच चालू होऊ शकतो.

- पावसाळ्यात दमट हवामानामुळे आपल्या संगणकाचा CD ROM जाम होण्याचीदेखील शक्यता असते व जर तुम्ही संगणकाचा CD ROM अनेक दिवस वापरत नसाल तर हा बिघाड नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात आपल्या संगणकाच्या ण् CD ROM चा वरचेवर वापर करीत रहा किंवा त्यात कोणतीही CD टाकून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस संगणक सुरू होताना CD ROM देखील चालू राहील.

- संगणकाबरोबरच पावसाळ्यामध्ये दमटपणामुळे प्रिंटर जॅम होण्याचीदेखील शक्यता वाढते. बर्‍याचदा प्रिंटर जॅम झाल्यानंतरही आपणास माहीत नसल्यामुळे आपण तो वापरत राहतो. त्यामुळे त्यातील मेकॅनिकल पार्ट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपला प्रिंटर एकदा सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते.

- पावसाळ्यामध्ये पॉवर फ्लक्चुएशनमुळे संगणकाचा मदरबोर्ड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संगणकाला स्पाइक गार्ड लावावा. त्यामुळे जरी पावसाळ्यात पॉवर फ्लक्चुएशन झाले तरी तुमच्या संगणकाचा मदरबोर्ड सुरक्षित राहू शकतो.

- लॅपटॉपमध्ये पाणी गेले असल्याची शक्यता वाटली तर त्वरित लॅपटॉपची बॅटरी काढून टाका व लॅपटॉप स्वीच ऑफ करा. जर तुमच्याकडे लॅपटॉपचे मॅन्युअल बुक असेल तर त्याचा वापर करून लॅपटॉपची केस (बाहेरील आवरण) काढण्याचा प्रयत्न करा व घरातील हेअर ड्रायरचा वापर करून लॅपटॉप ड्राय करायचा प्रयत्न करा व पुढील २४ ते ४८ तास लॅपटॉप ऑन करू नये. हवेतील दमटपणामुळे तुमचा लॅपटॉप हँग होत असेल तर लॅपटॉप बॅगमधील इन्सुलेशन तपासून घ्यावे. ते खराब झाले असल्यास नवीन इन्सुलेशन टाकून घ्यावे.

- त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्या संगणक तसेच लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा बॅकअप घेऊन ठेवा. त्यामुळे जरी तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागली तरी तुमचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहू शकेल.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना २८०६२०११.

Monday, June 27, 2011

गर्भावस्थेतील महत्तवपूर्ण तपासण्या

वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्‍या प्रगतीमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत; पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांपुढे नवीन आव्हानंदेखील उभी राहू लागली आहेत. सध्याचा जमाना ‘हम दो हमारा एक’चा आहे. मात्र हे मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असावं असा प्रत्येक मातापित्याचा आग्रह असतो आणि तो साहजिक आहे

बाळ गर्भावस्थेत असतानाच अनेक तपासण्या करून आपल्याला बाळाच्या वाढीची योग्य कल्पना येते.या तपासण्या बाळाच्या जन्मापूर्वीच केल्या जातात. होणार्‍या बाळाला गर्भावस्थेतच काही शारीरिक विकृती, बौद्धिक दोष, आनुवंशिक आजार आहेत का याची शक्यता या तपासण्यांनी पडताळता येते.


या तपासण्या गर्भधारणेपासून 10 ते 16 व्या आठवड्यात केल्या जातात . सगळ्या गर्भवती स्त्रियांना या सर्वच तपासण्यांतून जाणे आवश्यक नाही. यातील काही तपासण्या सर्वसाधारणपणे सर्व गर्भवती स्त्रियांना सुचविल्या जातात. मात्र ज्यांच्या बाळात आनुवंशिक दोष असण्याची शक्यता जास्त आहे अशा आई-वडिलांना, ज्या स्त्रियांना वयाच्या 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा झाली असेल आणि ज्यांच्या आधीच्या गर्भधारणेतून झालेल्या मुलामध्ये काही विकृती असेल अशांसाठी या तपासण्या करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने गर्भधारणा झाल्यावर लगेच प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पूर्ण तपास केल्यावर तुम्हाला आवश्यक असलेल्या तपासणीबद्दल त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

गर्भावस्थेत करण्याच्या या तपासण्यांमध्ये सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड टेस्ट्स ), ट्रिपल मार्कर टेस्ट, ऍम्नियोसेंटेसिस (Amniocentesis), कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग (chorionic villous sampling ) यांचा समावेश होतो .

गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे 10 ते 11 व्या आठवड्यात सोनोग्राफीमध्ये न्युकल थिकनेसची (NT - SCAN) तपासणी केली जाते. त्याचबरोबर पॅप-ए आणि बिटा - एचसीजी या हार्मोन्ससाठी रक्ततपासणीही केली जाते. दुसर्‍या तिमाहीमध्ये 16 ते 20 आठवड्यांत एनॉमली स्कॅन म्हणून सोनोग्राफी केली जाते. त्याचबरोबर रक्तातील बिटा - एचसीजी , इस्ट्राडिऑल आणि अल्फा फिटोप्रोटिन या हार्मोन्सची तपासणी केली जाते. रक्ततपासणीचे निष्कर्ष, सोनोग्राफीमधील बाळाची तपासणी या सर्वांचा आईचे वय, शारीरिक स्वास्थ्य, गर्भकाळ यांच्याशी निकष लावून डाऊन सिंड्रोम, ट्रायसोमी-18, ट्रायसोमी-13 या विकृतींची शक्यता दर्शवता येते.

14-18 व्या आठवड्यात ऍम्नियोसेंटेसिस ही तपासणी केली जाते. त्यामुळे बाळाच्या शरीरातील दोषांची माहिती होते. ऍम्नियोसेंटेसिस, कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग या तपासण्या करण्यापूर्वी गर्भवती महिलांना जेनेटिक काऊन्सिलर यांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून या तपासण्यांचे फायदे - तोटे व्यवस्थित समजून घेऊन निर्णय घेण्यास मदत होते .

अशा तपासण्यांमुळे जन्म होण्याआधी गर्भावस्थेतच किंवा जन्मानंतर लगेच काही दोषांवर उपचार करून घेता येतात. जर विकृती गंभीर स्वरूपाची असेल, त्यावर उपचार करणे कठीण असेल किंवा उपचार उपलब्ध नसतील तर अशा परिस्थितीत मातापित्यांना ठोस निर्णय घ्यायला मदत होते. काही वेळा माता - पिता असा दोषी गर्भ न वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा सदोष बालकाला जन्म दिल्यानंतर ते वाढवताना आई - वडिलांना होणारा मानसिक त्रास, अपत्याला समाजाकडून मिळणारी वागणूक, बाळाच्या उपचाराला लागणारा वेळ व तयारी, बाळाच्या भवितव्याचे नियोजन, त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद यांचा पूर्णपणे सखोल विचार करून माता - पित्यांना हा निर्णय घ्यायचा असतो.

या तपासण्यांमुळे निदान होणार्‍या काही समस्या बाळाच्या जन्माआधी सोडविता येतात; तर काहींवर बाळ जन्मल्यावर उपचार करणे शक्य असते, पण त्याच्यामुळे पूर्ण नियोजन करून उपचार करणे साध्य होते.

अशा प्रकारे या तपासण्यांमुळे निरोगी मूल जन्माला घालण्याचं प्रत्येक माता - पित्याचं जे स्वप्नं असतं ते पूर्ण करण्यास बर्‍याच अंशी मदत होते.

- डॉ . प्राजक्ता देऊळकर drprajaktadeulkar@gmail.com
सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११.

Sunday, June 26, 2011

धूमकेतू

आकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्‍याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो. आपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाऊड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हलल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे-येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. धूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. या घन भागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला ‘डर्टी स्नो बॉल’ या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतूविषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.


सौजन्य :- फुलोरा, सामना २५०६२०११.

Saturday, June 25, 2011

खगोलीय नवलाई...

- सूर्यमालेमध्ये फक्त शनीलाच नाही तर गुरू, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांनादेखील स्वत:भोवती कडी आहे.


- सात बहिणी नावाने ओळखल्या जाणार्‍या कृत्तिका तारकागुच्छामध्ये प्रत्यक्षात 130 तारे आहेत. त्यातील 7 प्रखर तार्‍यांमुळे त्याला सात बहिणी असे म्हणतात.
- प्लॅनेट (Planets) म्हणजेच ग्रह या शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये ‘भटक्या’ असा होतो.


- जेव्हा आपण देवयानी आकाशगंगेकडे (Andromeda Galaxy) पाहत असतो (जी आपल्यापासून 22 लाख प्रकाशवर्षे दूर आहे) तेव्हा आपण 22 लाख वर्षांपूर्वीची देवयानी आकाशगंगा पाहत असतो कारण तिच्यापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 22 लाख वर्षे लागतात.


- बुध ग्रह जरी सूर्याच्या जवळ असला तरी प्रत्यक्षात शुक्र ग्रहाचे तापमान बुधापेक्षा अधिक आहे. शुक्रावरील दाट वातावरणामुळे सूर्याची उष्णता त्याच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात जमा होते.


- मृग तारकासमूहातील ‘काक्षी’ (Betelgeuse) हा तारा आकाराने इतका मोठा आहे की त्याला जर आपल्या सूर्याच्या जागी ठेवलं तर तो गुरू ग्रहाएवढी जागा व्यापेल.

- बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. ताशी 1,07,000 वेगाने तो पुढे सरकतो. (म्हणजेच प्रति सेकंद 29.75 मैल किंवा प्रती सेकंद 47.87 कि.मी.)

सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११

गवती चहा

दिसायला एखाद्या गवतासारखे दिसणारे गवत, पण या गवतामध्ये असणार्‍या औैैषधी गुणधर्मांमुळे त्याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. बहुतेकजण मात्र चहाला फक्त चव यावी यासाठी या गवताचा वापर करतात. म्हणूनच याचे नाव गवती चहा असे पडले असावे. गवती चहाला इंग्रजीमध्ये लेमन ग्रास असे म्हणतात. गवतासारखी वाढणारी ही वनस्पती बहुवर्षीय व बहुगुणी औषध आहे.


पावसात उपयोगी पडणारी वनस्पती म्हणजे गवती चहा. घरातल्या कुंडीत सहज वाढणार्‍या किंवा बाजारात नेहमी मिळणार्‍या या गवताच्या पातीचे तुकडे चहात घातल्यामुळे चहा स्वादिष्ट बनतो.

- गवती चहा, सुंठ, आलं, खडीसाखर, धने, जिरे, लवंग, तुळस, बेल, पुदीना वगैरे पदार्थ घालून काढा करून प्यायल्यास सर्दी, खोकला बरा होतो.

- ताप आल्यास पारिजातकाची पाने या काढ्यात टाका. घसा दुखणे, ताप या तक्रारी नाहीशा होतात. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे.

- गवती चहाचा काढा घेतल्यामुळे लघवी साफ होते.

- आलं, पुदीना, गवती चहा यांच्यापासून बनवलेला हर्बल चहा घेतल्याने पचन व्यवस्थित होते. पावसाळ्यात काहीतरी गरम पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी हा हर्बल चहा घेणे उत्तम.

- गवती चहा, आलं, तुळसी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

- उर्ध्वपातन पद्धतीने गवती चहाच्या पानांतील तेल काढले जाते. हे तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, त्वचाविकार, कुष्टरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.

- वात विकारात याचे तेल अंगास चोळल्याने ठणका कमी होतो.

- साठवण्याच्या धान्यामध्ये कीटकनाशक म्हणून या गवती चहाच्या पानांचा वापर करतात.
सौजन्य:- चिरायू, सामना

राजमाता जिजाऊ भोसले

The shape, durability and quality of a pot are entirely dependent on the skill and the creativity of the potter.
Rajmata Jijabai with Chhatrapati Shivaji MaharajLikewise Chatrapati Shivaji Raje was entirely nurtured to fight the enemies who were obstructing the Establishment of Hindavi Swarajya.

Jijau was born to Mhakasabai and Lakhoji Jadhav in Sindkhed territory. As she grew up, the sufferings of Hindus under the Mughal rule was perceived by her.

At the tiny age when girls play with dolls Jijau immersed in learning sword fighting. Her mother nurtured Jijau's courage by telling the tales of valor.

The situation in the country was to provide services to Mughal Rulers, to become local commanding officers under Mughals the actual enemy, praise them and loot own people for them.

Hindu women were being assaulted by Muslims and auctioned. Society had become a mute spectator. Farmers were working on empty stomachs, only for Mughals. Jijau was searching for a person who could fight this injustice.

Jijau was married to Sahaji Raje Bhosale in the year 1605. She finally found recourse in prayers, by appealing to Goddess Bhavani to give her a son who would be bright, accomplished and immensely capable of establishing “Swarajya”.

After marrying Shahaji Raje, Jijau could sense her husband being undervalued by rulers like Mughals, Adilshah, and Nijamshah etc. She realised that even though her husband was powerful but had no recognition, security and was not beneficial to the community.

Jijau may be the only woman in the history of mankind who decided the purpose of her child even before he was born.

Goddess Bhavani fulfilled Jijau's appeal as she shared Jijau's sorrows in terms of assaults on her land, drowning of her religion and her temples, idols being broken by the Yavan enemies like Mughals, Adilshah, Nijamshah etc. Jijau and Goddess Bhavani shared the same dream of Hindu Swarajya.

Jijau told Shivaji the tales of King Ram, Krishna, Bheem etc. fighting the injustice and freeing of people from tyranny. These stories made Shivaji Raje that freedom was the only path and that is the only purpose of his life.

Jijau also taught politics to her son Shivaji Raje and prepared his mindset for justice of equality, courage, valor and hardest punishments to unjust people doing wrong things. She personally supervised his training with various weapons. Due to such guidance from his own mother Jijau, Shivaji Raje was able to get himself out safely and miraculously from incidents like Shahaji Raje's captivity, Afzalkhan's defeat, and escape from Agra etc.
Jijau carried out both the roles of an affectionate mother as well as giving aptitude for accomplishments as a father in his absence.

Only due to training from Jijau, Shivaji Raje could vanquish the centuries of Muslim rule and establish Hindavi Swarajya.

Jijau survived till the Coronation of her son Shivaji Raje as Chatrapati even in the absence of her husband, lovingly encouraging & guiding her son for the growth and longevity of Hindavi Swarajya. She left for heavenly abode just after 12 days of coronation on 17 June 1674. Her Samadhi is at Village “Pachad” at the foothills of Fort Rajgad.

Thursday, June 23, 2011

फास्ट इंटरनेटसाठी

इंटरनेट हा आजच्या ई-युगातील परवलीचा शब्द झाला आहे व नेटीझन्सला इंटरनेट वापरताना जरा काही अडचण आली तर मात्र आयुष्य क्षणभर थांबल्यासारखे होते. इंटरनेट वापरताना येणार्‍या काही छोट्या छोट्या अडचणींवरचे काही रामबाण इलाज जे आपले इंटरनेटचे प्रश्‍न चुटकीसरशी सोडवू शकतात. स्लो इंटरनेट : इंटरनेट जर स्लो चालत असेल किंवा अधूनमधून डिस्कनेक्ट होत असेल तर खालील गोष्टींची खातरजमा करून घ्या.



ब्रॉडबॅण्ड राऊटर सेटिंग्ज - जर तुम्ही ब्रॉडबॅण्ड राऊटरचा वापर करून इंटरनेट वापरत असाल तर तुमच्या ब्रॉडबॅण्ड राऊटरमधील MTU सेटिंग्ज बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्या. MTU सेटिंग्जमध्ये जर कमी किंवा जास्त MTU सेट झाला असेल तर तुमच्या इंटरनेटच्या वेगावर परिणाम होतो व बर्‍याचदा इंटरनेट कनेक्शन घेतल्यावर हे सेटिंग ‘जैसे थे’ अशाच स्थितीत असतात त्यामुळे इंटरनेट कनेक्शन घेतल्यावर तुमच्या इंटरनेट सेवा पुरवणार्‍या कंपनीकडून राऊटरचे MTU सेटिंग करून घ्यायचे विसरू नका.


वायफाय स्लो इंटरनेट : जर तुमचे वायफाय इंटरनेट स्लो चालत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तपासावी ती म्हणजे तुमचे ‘वायफाय’ इंटरनेट तुमच्याव्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूचे किंवा शेजारी तर वापरत नाहीत ना? ‘वायफाय’ इंटरनेट अनेक व्यक्ती एकाच कनेक्शनवरून जर वापरत असतील तर ते स्लो चालते. त्यामुळे तुमच्या वायफाय इंटरनेटला तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही ‘नो ऍक्सेस’ स्थितीत सेट करा.


बॅकग्राऊंड ऍप्लिकेशन्स : जर तुमच्या संगणकातील संगणक प्रणाली किंवा इतर सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स जसे ऍक्रोबॅट रिडर किंवा फ्लॅश प्लेयर इ. त्यांचे वेळोवेळी येणारे नवनवीन अपडेटस् तुमच्या माहितीव्यतिरिक्त तुमच्या संगणकावर थेट ‘बॅकग्राऊंड’ डाऊनलोड करीत असतील तरीदेखील तुमच्या ‘इंटरनेट’चा वेग कमालीचा मंदावतो. त्यामुळे ऍटोमेटिक डाऊनलोड या पर्यायाऐवजी ‘नोटीफाय मी’ हा पर्याय सिलेक्ट करावा. त्यामुळे वेळोवेळी येणारे अपडेटस् तुम्ही तुमचे इंटरनेटवरील काम संपल्यावर डाऊनलोड करू शकता व त्यामुळे इंटरनेटचा वेगदेखील वाढतो.


इंटरनेट केबल्स : तुम्ही टेलिफोनद्वारे इंटरनेट वापरत असाल व तुमच्या टेलिफोनमध्ये जर काही डिस्टर्बन्स असेल तरीदेखील तुमचे इंटरनेट स्लो चालू शकते. त्वरित अशा केबल्स बदलून टाकणे गरजेचे असते. त्याचबरोबर जर तुम्ही USB केबलचा वापर करून इंटरनेटचा वापर करीत असाल तर USB3.0 या नवीन तंत्रज्ञानावर चालणार्‍या केबलचा वापर करा. त्यामुळे इंटरनेटच्या स्पीडमध्ये कमालीची सुधारणा झाल्याचे तुम्हाला आढळेल.


इतर कारणे : जर तुम्ही एकाच वेळेस इंटरनेटवर चालणार्‍या अनेक ऍप्लिकेशन्स वापरत’ असाल तरीदेखील तुमच्या इंटरनेटचा वेग मंदावतो. त्यामुळे शक्यतो दोनपेक्षा अधिक इंटरनेट ऍप्लिकेशन्स चालू ठेवू नयेत. अनेकदा अनेक ऍप्लिकेशन्स इंटरनेटवर चालू असल्यास तुमच्या संगणकाचा वेगदेखील मंदावतो. त्यामुळे ज्या ऍप्लिकेशनचा तुम्ही ऍक्टिव्हली वापर करीत असाल त्याच ऍप्लिकेशन्स चालू ठेवा. जर तुम्ही ‘नेट बंँकिंग’ किंवा कोणतीही ऑनलाईन सेवा जिथे तुमच्या बंँक किंवा क्रेडिट कार्डचा वापर होणार असेल तेव्हा शक्यतो इंटरनेटवरील इतर सर्व संकेतस्थळे बंद करावीत. कारण अशा सेवा अनेकदा ‘मल्टीपल गेटवेजचा’ वापर करतात व त्यावेळी इंटरनेटचा वेग खूप महत्त्वाचा ठरतो.


फास्ट डाऊनलोडसाठी - जर तुम्ही इंटरनेटचा वापर गाणे, चित्रपट किंवा इतर कोणत्याही गोष्टी डाऊनलोड करण्यासाठी करीत असाल तर ‘डाऊनलोड ऍक्सलेटर प्लस (DAP) हे मॅजिक सॉफ्टवेयर तुमच्या संगणकावर इन्स्टॉल करून घ्या. त्यामुळे इंटरनेटवरून डाऊनलोडिंगचा वेग कमालीचा वाढतो. DAP मल्टी चॅनल तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटवरील व्यस्त ट्रॅफिक असणार्‍या रस्त्यापेक्षा ज्या चॅनलवरून तुमचा डेटा लवकरात लवकर व जवळच्या चॅनलवरून डाऊनलोड करून देतो. झ् फ्री सर्व्हिस व पेड सर्व्हिस अशा दोन्ही प्रकारांत मिळू शकतो. अधिक माहितीसाठी http://www.speedbit.com/  या संकेतस्थळाला भेट द्यावी.


इंटरनेटचा वेग कसा तपासाल? - तुम्ही वापरत असणार्‍या इंटरनेटचा वेग किती आहे हे तपासणे खूप सोपे आहे. त्यासाठी http://www.speedtest.net/  या संकेतस्थळावर भेट द्यावी व त्यानंतर या संकेतस्थळावरील ‘बिगीन टेस्ट’वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा वेग, डाऊनलोडचा वेग व अपलोडचा वेग काही क्षणातच तुमच्यासमोर हजर होतो. हा रिझल्ट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन शेयरदेखील करू शकता. जर तुम्हाला वारंवार ‘स्लो इंटरनेट’चा अनुभव येत असेल तर तुमच्या इंटरनेट सर्व्हिस देणार्‍या कंपनीला http://www.speedtest.net/  वरील रिझल्टस् जरूर दाखवावा.


मॅजिक फास्ट - http://www.irctc.co.in/  ही रेल्वे रिझर्व्हेशनसाठी वापरले जाणारे संकेतस्थळ आहे व या संकेतस्थळावर अक्षरश: लाखो लोक रेल्वे तिकीट बुक करीत असतात. अशा अनेक संकेतस्थळावर कित्येकदा आपणास वारंवार डिस्कनेक्शनचा अनुभव येतो, जर तुम्ही कधी अशा अडचणीत सापडला तर फक्त एकच गोष्ट करा. तुमच्या संगणकाच्या कमांड प्रॉम्प्टवर जाऊन tracertirctc.co.in  असे किंवा इतर संकेतस्थळाचे नाव टाइप करा. क्षणार्धात तुमच्या संगणकावरील स्लो चालणारी संकेतस्थळे ‘मॅजिक फास्ट’ चालू लागतील.


Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना

Saturday, June 18, 2011

पर्सनलाईज्ड इंटरनेट रेडिओ

काही वेळा बातम्या वाचण्याचा देखील कंटाळा येतो. मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर लहानशा फॉन्टमध्ये वाचून डोळे दुखतात. अशा वेळी कोणी बातम्या ऐकवल्या किंवा आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती वाचून दाखवली तरी किती बरे होईल ना? तुम्ही म्हणाल, मग सरळ रेडिओ ऐका. पण रेडिओवर आपल्याला चॉइस नसतो. जो कार्यक्रम लागला असेल तो ऐकावा लागतो. अशावेळी कोणी तुमच्या आवडी-निवडीप्रमाणे रेडिओवरील कार्यक्रम देऊ केले तर? स्टिचर ही अशीच एक सेवा. स्टिचर म्हणजे पर्सनलाईज्ड इंटरनेट रेडिओ. सेलेब्रिटीज, अमेरिकन इलेक्शन कॅम्पेनिंग, लोकल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, टेक्नॉलॉजी आदी विविध विषयांवरील कार्यक्रम तुम्हाला स्टिचरच्या माध्यमातून ऐकता येतात. हे कार्यक्रम तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर ऐकू शकता.


स्टिचरने आयफोनसाठी विशेष ऍप्लिकेशनही तयार केले आहे. स्टिचरवर तुम्ही केवळ काही सेकंदात रजिस्टर होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हवा तो विषय निवडून ऐकू शकता. स्टिचरचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे विविध स्रोतांमधून जमवलेली माहिती प्रत्यक्षात वाचून रेकॉर्ड केली जाते. याचसारख्या इतर सेवांमध्ये कॉम्प्युटर जनरेटेड व्हॉईसचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात कृत्रिमपणा जाणवतो. स्टिचरवरील कार्यक्रम ऐकावेसे वाटतात.

http://stitcher.com/home.php
सौजन्य:- फुलोरा, सामना १८०६२०११.

कॉर्पोरेट मंत्र - आय ऍॅम अ डिस्को डान्सर...

सगळं काही नीट होत असताना मध्येच राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीडचीड होते. का? कशासाठी? कशामुळे? काहीच कळत नाही, पण असं होतं. ऑफिसचे काम लवकर संपते. नेहमी लवकर घरी पोहोचावे असे वाटत असून पोहोचता न येणार्‍याला घरी जावेसे वाटत नाही. इथे तिथे वेळ घालवूनही वेळ जात नाही. कारण काही नसते, पण असं होतं. खूप वर्षे वाट पाहिलेली संधी दारात चालून येते. मनासारखे होते, पण आनंदाचा एक अंशही जाणवत नाही. खरं तर अर्थच नाही याला, पण असं होतं. आपले प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीवर क्रोधाचा वर्षाव केला जातो. तसे करायचे नसते, पण नकळत घडून जाते. प्रेम अमाप असते तरी असं होतं. तरतरीत सुरू झालेल्या सकाळचा शेवट एक वैफल्यपूर्ण संध्याकाळ करते. बिघडलेले काहीच नसते. दिवसही नेहमीप्रमाणेच सरलेला असतो, पण असं होते. आपली क्षमता, कुवत माहीत असूनही कधीतरी लाचारीचे पांघरुण ओढून झोपावेसे वाटते. आपण काहीच करू शकत नाही. आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच मानावेसे वाटते. तोच आत्मविश्‍वास, तीच जिद्द, तीच स्वप्नं असतात मनात, पण असं होतं. एकटेपणाची खूप भीती वाटते. कुणीतरी सोबत असावे असे वाटते. मुद्दाम सर्वांपासून दूर राहायचा, अबोला धरायचा निर्णय आपण घेतो. गरज असते संवादाची आणि आपण तोंड लपवून पळत राहतो. करायचे असते काहीतरी, करतो वेगळेच. असेही होते. अरे पण का होते याचे उत्तर कुणालाच सापडत नाही. कदाचित ते उत्तर न सापडण्यातच जगण्याची मजा आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन फुलपाखरासारखे असते. रंगीबेरंगी. कधी या फुलावर तर कधी त्या. मध्येच खूश होते. आनंदात रडवते, दु:खात हसवते. प्रगतीचा ध्यास लावते. ती मिळाली की, त्याचे महत्त्व संपवते. फुलपाखराप्रमाणे उडत राहते. पाऊस नाही पडला की, मन म्हणते ‘कसे होणार जगाचे? पावसाला काही काळजीच नाही.’ धो धो पडला की, तेच मन म्हणते, ‘अरे, काही सीमा आहे की नाही? किती पडायचे पावसाने!’ आणि अगदीच काही नाही तर म्हणते ‘पावसाचे काहीच खरं नाही, कधीही येतो आणि कधीही जातो.’ मन हे असेच. छोट्या पोरांची मनं सांभाळण्यासाठी आपण जी मेहनत घेतो, तेवढेच श्रम आपण स्वत:चे मन सांभाळण्यासाठी घ्यायला हवे. मनाशी संवाद साधा. स्वत:च्या मनाला समजवा. ‘मूड’च्या नावाखाली काम न होणे हे योग्य नाही. मन बदलत राहते, उडत राहते, भावनांचे मंथन करते, विचारांचे पत्ते पिसते, मूड नावाच्या गुंत्यात गुंतवते. मन अक्षरश: आपल्याला नाचवते आणि आपण नाचत राहतो. काही कळतच नाही, कधी कधी बेसूर रडगाण्याचे खड्डे खणून त्याभोवती बेताल ठेके देत नाचतो. खड्ड्यात पडू या भीतीने कुढतो, पण नाचत राहतो. हा नाच नाचण्यापेक्षा मनाचे हे खेळ समजून घ्या. आपल्या बाळांचे जेवण सांडणे, धडपडणे, रडणे, हसणे, अगदी काहीही जसे ‘गोड’ किंवा ‘किऊट’ वाटते तसेच स्वत:च्या मनाच्या नाचालाही गोड मानून हसत रहा. त्या बेताल नृत्याला छान समजूतदारीचा ठेका द्या. मनाच्या खेळांची मजा घ्या. त्यात व्यापून जाऊ नका. आनंदाचा ताल धरून मनासोबत नाचा. रोज नाचा. आनंद घ्या जगण्याचा. मनाच्या उड्यांचा. उत्तरे शोधू नका. अनुभव घ्या. मनासोबत आनंदाने नाचताना खुशाल म्हणा ‘‘आय ऍम अ डिस्को डान्सर.’’


- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना १८०६२०११.

अतिगुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ बाळ?

वयोमानाप्रमाणे वजन जास्त असलेल्या मुलाला ‘काय, बघूनच कळतं ना की, चांगल्या खात्यापित्या घरचा आहे ते?’ असं म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. पुढे जाऊन त्याच मुलाला शाळेत ‘लठ्ठपणा’च्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं.

तुम्हाला काही वर्षांपूर्वी ‘बेबी फूड्स’च्या सारख्या दाखवल्या जाणार्‍या जाहिराती आठवतात? त्यातली सगळी बाळं अगदी गोबरी आणि गुटगुटीत असायची. नशीब आता त्या जाहिराती दाखवत नाहीत! पण त्यावरून एक लक्षात यायला हरकत नाही की, मुळात आपल्या देशात गुटगुटीत म्हणजे सुदृढ असे समजले जात होते आणि आजही आपले बाळ ‘चबी’ नसलं तर बर्‍याच बायकांना वाईट वाटतं. कुठलंही साधारण बारीक वाटेल असं लहान मूल किंवा बाळ बघितलं की, आधी विचारला जाणारा प्रश्‍न म्हणजे ‘तुमचं बाळ नीट खात नाही का?’ या प्रश्‍नाचं जर उत्तर ‘व्यवस्थित सगळं खातं’ असं दिलं तर लगेच पुढचा उद्गार ‘अरेच्या, बघून तरी असं वाटत नाही!’ असं ऐकल्यावर उगीच त्या आईवडिलांच्या मनात शंकेचा किडा वळवळून जातो.


तसेच वयोमानाप्रमाणे वजन जास्त असलेल्या मुलाला ‘काय, बघूनच कळतं ना की, चांगल्या खात्यापित्या घरचा आहे ते?’ असं म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. पुढे जाऊन त्याच मुलाला शाळेत ‘लठ्ठपणा’च्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आपला मुलगा/ मुलगी कुठल्याही खेळात भाग घेत नाही, दिवसभरात त्याचा काहीच व्यायाम होत नाही ही गोष्ट लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. लहानपणी ज्या गोबरेपणाचे कौतुक होत होते त्यालाच आता लठ्ठपणाचे लेबल लागल्यामुळे मुलं पण गोंधळात पडतात. प्रौढांमध्ये वाढणार्‍या लठ्ठपणाप्रमाणेच आज आपल्या देशात लहान मुलांमध्ये वाढत्या जाडीचा गंभीर प्रश्‍न आढळतोय. माझ्या मतानुसार ही समस्या जास्त निकडीची आहे. कारण बालपणी अतिलठ्ठ असलेले बहुतांश लोक मोठेपणी पण स्वत:चे वजन आटोक्यात ठेवायला धडपडत असतात.

या सगळ्याची सुरुवात गर्भारपणात होते. गर्भवतीने जर गरजेपेक्षा जास्त आणि अती तळलेले, तूपकट, गोड किंवा जंक फूड खाऊन तिचे वजन १५-२० किलो किंवा त्याहून अधिक वाढले तर गर्भातल्या शिशूच्या पण चरबीच्या पेशी अतिरिक्त प्रमाणात वाढतात. तसेच बाळाला स्तनपान न करता जर फॉर्म्युला फूड किंवा बेबी फूड दिले तर त्यात पण बाळाच्या पोटात आवश्यकतेपेक्षा अधिक कॅलरी जाण्याचा धोका असतो. यामागचे कारण म्हणजे सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पावडर घालून बेबी फूड तयार करणे किंवा लहान बाळाची भूक खूप असते आणि ते जेवढं खाईल तेवढं सुदृढ होईल या धोरणाखाली त्याला अती खायला प्रोत्साहित करणे. गुटगुटीत बाळाला अधिक प्रमाणात गोड खिरी, गूळ घातलेले गोड पदार्थ, साखर घालून म्हशीचे दूध इ. पदार्थ जास्त खायला घालून त्याच्या वाढत्या वयात शरीरातल्या फॅट साठवून ठेवणार्‍या पेशींचा आकडा खूप वाढतो आणि नंतर याच पेशी जास्त प्रमाणात शरीरात चरबी साठवतात.

‘माझ्या नातीला प्रचंड गोड आवडतं’ म्हणून वरचेवर लाडू, पेढे, शिरा खायला देणं किंवा आई-बाबा हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे मुलाला फ्रेंच फ्राईज, चीझ, चिप्स, आईस्क्रीम खायला देणं... दोन्ही सवयी लहान मुलासाठी तितक्याच हानीकारक असतात. तीन-सात वर्षांच्या वयोगटातली मुलं आईवडिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचे अनुकरण करतात आणि त्याच सवयी त्यांना कायमस्वरूपी अवगत होतात. दर रविवारी सकाळी इन्स्टन्ट नूडल्स, दुपारी गोडधोड आणि रात्री हॉटेलमध्ये जेवायची सवय जर आई-बाबांना असेल आणि ती सवय घरात लहान मूल आल्यावर त्यांनी बदलली नसेल तर मुलाची पण ‘रविवारी असंच खायचं असतं’ अशी समजूत होणार आणि तो पण कायम तसंच खात राहणार. असे न होऊ देता अगदी बालपणापासूनच तुमच्या मुलाला (किंवा मुलीला) आरोग्यपूर्ण आणि प्रमाणात खायची सवय लावा आणि त्याचे ‘लठ्ठपणा’ नामक राक्षसापासून संरक्षण करा.

amitagadre@gmail.com
(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
सौजन्य:- फुलोरा, सामना १८०६२०११.

Friday, June 17, 2011

जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं


आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं

जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं

यातला फरक समजू लागतो

नाही नाही म्हणता आपणही

प्रेमात पडू लागतो







कधी हसणं विसरून गेलो तर

ते हसायला शिकवतात

जीवन हे खऱ्या अर्थाने

जगायला शिकवतात



पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....



आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं

त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं



कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,

प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी

त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी



म्हणूनच ........

असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ

जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर

एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा

" I LOVE YOU "



........................ इमेल फौरवर्ड
सौजन्य:- MARATHIKAVITA.COM

Thursday, June 16, 2011

मोबाईल

मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूला रेडिएशनचा धोका असतो. पण त्यामुळे मोबाईल वापरणे बंद करता येणार नाही. म्हणूनच मोबाईल वापरणार्‍यांनी ही काळजी जरूर घ्यावी. मोबाईलमधील कमीत कमी रेडिएशन मेंदूपर्यंत पोहोचावे यासाठी या काही साध्या साध्या गोष्टी जरूर करा.


- हॅण्ड्स फ्री वापरा :


मोबाईल हॅण्डसेट तुमच्या शरीरापासून जितका लांब असेल तितकाच रेडिएशनचा धोका कमी असतो. त्यामुळे फोन आला तरी हॅण्ड्स फ्री (हेडफोन) लावून त्याद्वारेच बोलावे.

- थेट मोबाईल कानाला लावत असाल तर मोबाईल हॅण्डसेटला कमीतकमी भाग हाताने व्यापला जाईल याची काळजी घ्या. संपूर्ण हाताने मोबाईल झाकला की मोबाईलमधून सिग्नल पाठवण्याची आणि स्वीकाराण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे फोन आपली क्षमता एकवटून जास्तीचे रेडिएशन निर्माण करतो. म्हणून फोन धरताना हाताने नुसता आधार द्या.

- फुल नेटवर्कमध्ये बोला :


जिथे नेटवर्क कमी आहे अशा ठिकाणी फोनवर बोलत राहण्याचा अट्टहास नको. नेटवर्क पूर्ण असेल तर फोनचे रेडिएशन कमी असते आणि नेटवर्क कमी असेल तर हेच रेडिएशन जास्त असते.

- कमी बोला :

मोबाईलवर शक्यतो खूप वेळ बोलणे टाळा. जितके जास्त वेळ तुम्ही फोनवर बोलाल तितकाच जास्त तुमचा रेडिएशनशी संबंध येतो.

- लॅण्डलाइन वापरा.

मोबाईलच्या स्वस्त सर्व्हिसमुळे आजकाल अनेकांनी आपल्या लॅण्डलाईन काढून टाकलेल्या आहेत. परंतु रेडिएशनच्या वाढत्या धोक्यामुळे आता मोबाईलचा अतिवापर टाळणे आवश्यक बनले आहे. कार्यालयात किंवा घरी असताना शक्यतो लॅण्डलाईनचा वापर करणे सुरक्षित आहे.

- ज्या वास्तूमध्ये खूप इलेक्ट्रिकल साधने आहेत अशा ठिकाणी मोबाईल वापरू नका. हॉस्पिटल किंवा एअरक्राफ्ट अशा ठिकाणी मोबाईल वापरणे टाळावे.

सौजन्य:- इंद्रधनू, सामना १४०६२०११

Wednesday, June 15, 2011

तू जेव्हा ऑनलाइन नसतेस .......

नसतेस ऑनलाइन तू जेव्हा


जीव तुटका तुटका होतो

जी-टॉक चे विरति धागे

ऑरकुट फाटका होतो

ध्रु


डिस्क फाटून क्रशाच व्हावी

कल्लोल तसा ओढ़ वतो

चट्टिंग दिशाहीन होते

अन लान पोरका होतो




येतात ईमेल दाराशी

हिरमुसून जाती मागे

विन्डोशी थबकून कर्सर

तव मेसेज वाचून जातो




लघु लिपित खेलव नार्या

त्या स्माइली स्मरति सगळ्या

प्रोक्सी-विन नेट अदावे

मी तसाच अगतिक होतो





तू सांग सखे मज काय

मी सांगू या स्टेटस लाईन्सना

माउसचा जीव उदास

माझ्यासह क्लीक क्लीक करतो





ना अजुन झालो एलोकेट

ना बिलेबल अजुनी झालो

तुजवाचुन पिन्गिंग राहते

तुजवाचुन मेस्सेंजर अडतो




सौजन्य :- AUTHOR UNKNOWN

Tuesday, June 14, 2011

ऍडवेअर आगाऊ जाहिराती

इंटरनेट वापरताना अनेकदा अचानक मधेच एखाद्या अनाहूत पाहुण्याप्रमाणे जाहिरातीचा किंवा एखाद्या चांगल्या ऑफरचा पॉपअप आपल्यासमोर प्रकट होतो. आपण काहीएक विचार न करता थेट अशा पॉपअपवर क्लिक करतो व त्यानंतर त्यांच्या जाहिरातवजा संकेतस्थळावर आपल्या माहितीची नोंद करून जाहिरातदाराच्या फोन किंवा ई-मेलची वाट बघत बसतो. इंटरनेटवरील अशा पॉपअपरूपी प्रकटणार्‍या जाहिरातींना ऍडवेअर असे म्हणतात. अशा जाहिरातींचा बहुतांशी उद्देश हा तुमची ‘आयडेंटी थेफ्ट’ अर्थात तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे असा असतो.


- आयडेंटी थेफ्ट : आपला मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल ऍड्रेस, बँक अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक ही आपली गोपनीय माहिती असते. सराईत हॅकर्स ऍडवेयरचा वापर करून सहजपणे या माहितीची चोरी करू शकतात. यालाच ‘आयडेंटी थेफ्ट’ असे म्हणतात. पुढे या माहितीचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे दुरुपयोग केला जाऊ शकतो. अगदी तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाऊंटचा गैरवापर करून तुम्हाला आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागू शकतो. तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल ऍड्रेसचा वापर करून ‘स्पॅम’ ई-मेल किंवा ‘स्पूक एश्ए’ पाठवण्यासारखे प्रकारही केले जाऊ शकतात. त्यामुळे इंटरनेटवरील ‘ऍडवेयर’वर आपली वैयक्तिक माहिती शक्यतो शेयर करण्याचे टाळावे. अगदी जर खरच चांगली वेबसाईट किंवा खात्रीवजा प्रॉडक्ट असेल तर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला फोन करून अशा जाहिरातीची प्रथम खातरजमा करूनच मग अशा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- मॅन इन द मिडल : ऍडवेयरचा वापर करून सराईतपणे तुमचा ई-मेल किंवा ऑनलाईन बँक अकाऊंट किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सेवेमधे तुम्हाला माहीत नसताना बेमालूमपणे हॅक करण्याचा हा नवीन प्रकार आहे. ‘मॅन इन द मिडल’ म्हणजेच जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही ऍडवेयरवर क्लिक करता तेव्हा तुमच्या संगणकातील इंटरनेट ब्राऊसमधील सर्व माहिती ‘ऍडवेअर वरील’ मुख्य संगणकावर नोंद होते व इंटरनेट ब्राऊसरमधील ‘कुकीज’चा वापर करून हॅकर्स थेट तुमच्या ऑनलाईन सेवेचा ताबा घेतात. गेल्या वर्षभरात ‘मॅन इन द मिडल’चा वापर करून अक्षरश: लाखो लोकांना फसवण्यात आले आहे.
- स्पायवेअर/मालवेअर : अनेकदा इंटरनेट वापरताना आपल्यासमोर ‘मोस्ट गुड स्क्रीन सेव्हर्स’ किंवा ‘अमेझिंग वॉलपेपर्स’सारख्या सुंदर चित्रे असणार्‍या जाहिराती झळकतात व आपण चांगले स्क्रीन सेव्हर्स किंवा वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करतो. हे स्क्रीनसेव्हर किंवा वॉलपेपर्स स्पायवेयर किंवा मालवेयर असतात. एकदा का हे स्क्रीनसेव्हर किंवा मालवेयर आपल्या संगणकावर इन्स्टॉल झाले की मग आपल्या संगणकात ते एक ठरावीक प्रोग्राम इन्स्टॉल करतात. हा प्रोग्राम दर ठरावीक वेळेला आपल्या संगणकात होत असलेल्या सर्व नोंदी ‘ऍडवेयरच्या’ मुख्य संगणकापर्यंत इंटरनेटवरून पाठवत राहतो मग या माहितीचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे इंटरनेटवर जाहिरातीमधून आलेल्या स्क्रीनसेव्हर वॉलपेपर्सपासून दोन हात दूरच राहणे केव्हाही चांगले.
बचाव कसा करावा?
- ऍडवेयरपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या इंटरनेट एक्सप्लोररमधील ‘पॉपअप ब्लॉकरचा’ वापर करणे. त्यासाठी इंटरनेट एक्सप्लोर - प्रॉपरटीस - प्रायव्हसी - टर्न ऑफ पॉपअप ब्लॉकरवरील टीक काढून टाकणे. यामुळे तुमच्या संगणकातून कोणत्याही संकेतस्थळावरील पॉपअप कायमच्या बंद होतील. जर तुम्हाला काही विशिष्ट संकेतस्थळावरील पॉपअप बघायच्या असतील तर तुम्ही याच ऑप्शनमधील ‘आलाऊ वेबसाईट’चा वापर करून त्या संकेतस्थळावरील पॉपअप बघू शकता.



- कुठल्याही संकेतस्थळावरील ‘पॉपअप’वर आपल्या वैयक्तिक माहितीची नोंद करू नये.


-इंटरनेट एक्सप्लोररमधील स्मार्टस्क्रीन फिल्टर व क्रॉस साईट स्क्रिप्ंिटग फिल्टरचा वेळोवेळी वापर करीत रहा.


-इंटरनेट एक्सप्लोरर तसेच विंडोज संगणक प्रणालीचे लेटेस्ट पॅचेस वेळोवेळी अपडेट करीत रहा.


-ऍण्टिवायरस इन्स्टॉल करताना शक्यतो ऍण्टिस्पायवेयर व ऍण्टिमाल वेयरसारखी वैशिष्टे असणार्‍या ऍण्टिव्हायरचा वापर करा. त्यामुळे ऍडवेयरपासून बचाव होऊ शकतो. इंटरनेटचा वापर सतर्कतेने केला तर ‘ऍडवेयर’पासून सहजपणे बचाव करता येऊ शकतो.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना १४०६२०११.

Sunday, June 12, 2011

कॉर्पोरेट मंत्र - गेट आयडिया!

आयुष्यात विविध प्रकारचे प्रसंग आणि विविध प्रकारची माणसं भेटतात. चांगले बूट नाही म्हणून रडणारेही भेटतात, तसेच कुबड्यांवर चालत हसणारेही भेटतात. शिक्षणाचा कंटाळा करून थकलेलेही सापडतील आणि शाळेच्या वर्गाबाहेर लपून शिकणारेही दिसतील. ‘प्रॉब्लेम’ या शब्दाने सर्वांचा ताबाच घेतला आहे. संकट म्हणजे खूप मोठे तुफान आणि प्रॉब्लेम म्हणजे छोटे-मोठे वादळ असा समज करून जगणारे नियमितपणे आपल्या बिचारेपणाचे पालन-पोषण करीत असतात. अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाणे प्रत्येकाला फार छान जमते. काहीजण तर घाबरण्याकरिता असली नसलेली सगळी ताकत लावतात. प्रॉब्लेम काय, तो कसा सोडवावा याकडे दुर्लक्ष होते. राहते काय तर घाबरणे. बुडणार्‍याचा मृत्यू होतो ५०ज्ञ् पाण्याच्या प्रभावाने आणि ५०ज्ञ् भीतीने. भीतीने शस्त्र टाकले तर ‘विजय’ शत्रूला भेट म्हणून दिल्यासारखेच नाही का? बर्‍याचदा आपणच आपले शत्रू बनतो. नकारार्थी गणिते मांडून आपणच आपल्या जीवनाची उत्तरे चुकवितो. भय सर्वात मोठा राक्षस आहे. या राक्षसाला मारायला देवाने पाठवलेले दूत म्हणजे संयम आणि युक्ती. भय आपल्या मेंदूला व्यापून काही सुचू देत नाही. या भयाला मनात शिरू देऊ नका. भय आणि भैया एकदा का शिरले की, निघता निघत नाहीत. लॅन्स आर्मस्ट्रँग नावाचा एक खेळाडू होता. सायकल रेसिंगचा बादशहा. सायकलिंगच्या सर्व रेस जिंकण्याची सवय असलेला लॅन्स कधीच घाबरला नाही. ‘हरण्याला’ही नाही आणि ‘कॅन्सर’लाही नाही. तो लढत राहिला, कॅन्सरशी नाही तर त्याच्या मनातील ‘भयाशी.’ तो सांगतो, ‘‘मी रोज सकाळी उठून एक युक्ती करायचो. आरशात पाहून स्वत:ला सांगायचो की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम दिवस आहे. मला हवे ते आणि हवे तसे मिळणार. मी आजारी नाही. आजाराला मी झालोय. त्यामुळे आजाराची मला दया येते.’’ जगण्याची तीव्र इच्छा, जगण्याची ४०ज्ञ् संभावना आणि लढण्याची १००ज्ञ् तयारी असल्यामुळे अशा परिस्थितीतही लॅन्स जिंकतच राहिला. कॅन्सरनी त्रासलेल्यांना आत्मविश्‍वास कसा मिळवावा व उपाय करण्यासाठी एक संस्थादेखील काढली. कधी कधी शक्ती संपली वाटले की, युक्तीचा वापर करा. संकट म्हणजे शेवट नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग ‘भय पळवणे, युक्ती लढवणे.’


अनेकदा आनंदाचे, भाग्याचे, प्रगतीचे नेटवर्क गेल्यासारखे वाटते. अस्वस्थपणा वाढतो. मोबाईलचे नेटवर्क गेल्यावर आयुष्य थांबल्यासारखे वाटते. तसेच भयाने कोलमडून पडणारे नेटवर्क सोडा. नवे नेटवर्क घ्या, जे कुठेही तुटणार नाही. घाबरू नका, युक्ती शोधा.

‘‘गेट आयडिया!’’
dr.swapnapatkar@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ११०६२०११.

गुगल क्रोम बुक लॅपटॉप नेक्स्ट जनरेशन

सॅमसंग व एसर या जगविख्यात कंपन्या गुगलचे नवीन क्रोम बुक आणणार आहेत. १२ इंची थ्ण् स्क्रीन व ८.५ तासांचा बॅटरी बॅकअप अशा सॉलीड वैशिष्ट्ये असणार्‍या क्रोम बुकसाठी आपणास १५ जूनपर्यंत वाट बघावी लागणार आहे व त्यानंतर इंटरनेटवरून ऑनलाईन पद्धतीने आपण तो विकत घेऊ शकतो.
‘१५ जूनला गुगल आपला महत्त्वाकांक्षी ‘लॅपटॉप गुगल क्रोम बुक’ जगासमोर आणणार आहे. गुगल क्रोम बुक गेल्या दोन दशकांच्या मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणालीला थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. गुगलच्या ‘ऍण्ड्रॉईड’ या मोबाईल प्रणालीने नोकियाच्या ‘सिंबियन’ या मोबाईल प्रणालीला अक्षरश: वर्षभरातच मागे टाकले व मोबाईल विश्‍वात स्वत:चा दबदबा निर्माण केला. असेच काहीसे गुगल त्यांच्या ‘क्रोम बुक’ या लॅपटॉपद्वारे करेल असे त्यांचे वैशिष्ट्य बघून वाटते. सध्या तरी सोशल नेटवर्किंग ब्लॉग्ज व इंटरनेटच्या जगात फक्त चर्चा आहे ती गुगल क्रोम बुकची व त्यांच्या वैशिष्ट्यांची.


- डेटा ऑन क्लाऊड, वेब ऍप्लिकेशन्स : ‘डेटा ऑन क्लाऊड’ या अनोखी सेवेमुळे तुमच्या सर्व फाईल्स, ऍप्लिकेशन्स तसेच तुमचा सर्व डेटा ‘क्लाऊड’ अर्थात गुगलच्या इंटरनेट स्टोरेजवर थेट सिंक अर्थात जमा होत राहील व हा डेटा तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतरांना शेअरदेखील करू शकाल. इंटरनेट स्टोरेजमुळे तुमचा डेटा नष्ट होण्याची किंवा हरवण्याची शक्यता कमी होईल. गुगल क्रोम बुक आपणास आपल्याला हवी ती ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर थेट त्यांच्या ‘क्रोम वेब स्टोअर’च्या माध्यमातून पुरवते. म्हणजेच जगातील हवे ते सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन आपण आपल्या लॅपटॉपवर इन्स्टॉल करू शकता.

- फ्रेन्डस् लॉगीन : क्रोम बुकमधील फ्रेन्डस् लॉगीनमुळे आपले सर्व सेटिंग्ज तसेच माहिती आपल्यापुरती मर्यादित ठेवली जाते व आपणाव्यतिरिक्त जरी तुमचा लॅपटॉप कोणीही वापरला तरी त्यात कोणालाही काहीही बदल करता येत नाही.

- ऑलवेज कनेक्टेड : पारंपरिक इंटरनेट पर्यायाबरोबरच क्रोम बुकवर तुम्ही ३उ तसेच ैग्-र्ंिग् चा वापर करून कधीही व कुठेही इंटरनेट वापरू शकता. त्यामुळे लॅपटॉप सुरू झाल्यावर लगेच तुम्ही इंटरनेटशी जोडले जाऊ शकता. ३उ ची सोय असल्यामुळे लॅपटॉपवरच तुम्ही ‘व्हीडिओ कॉलिंग’ मल्टीप्लेयर गेमिंग, लाईव्ह टी.व्ही. ही मोबाईलवर चालणारी वैशिष्ट्ये तुमच्या लॅपटॉपवरदेखील वापरू शकता.’

- इन्स्टंट वेब : तुमचा संगणक किंवा लॅपटॉप बुट अर्थात चालू होण्यासाठी कमीत कमी १ ते २ मिनिटे लावतो. पण नवीन ‘क्रोम बुक’ फक्त ८ सेकंदांत चालू होईल व क्रोम बुक सुरू झाल्यावर तुम्ही क्षणार्धात इंटरनेट किंवा कोणतीही ऍप्लिकेशन सुरू करू शकाल. इन्स्टंट वेब हे नवीन वैशिष्ट्य सध्या अस्तित्वात असणार्‍या सर्व लॅपटॉपपेक्षा अधिक वेगवान असणार आहे.

- सायबर सेफ्टी : गुगल ‘क्रोम बुक’ सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील आपणास अनेक बिल्ट इन असे पर्याय देतो. त्यामुळे इंटरनेट वापरताना होणार्‍या अनेक सायबर हल्ल्यापासून क्रोम बुक आपले संरक्षण करतो. क्रोम बुक सॅण्डबॉस्ंिकग, व्हेरीफाईड बूट, डेटा इनक्रिप्सन, रिकव्हरी तसेच डिफेन्स इन डेफ्थ अशा नव्या जगातील सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या सर्व निकषाची पूर्तता करतो. त्यामुळे ‘इंटरनेट’ वापरताना आपणास कोणतीही काळजी करायची गरज नाही.

क्रोम बुक संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण गुगलला भेट देऊ शकता. www.google.com/chromebook
Techno.savvy@live.com
सौजन्य :- इंद्रधनू, सामना

Thursday, June 09, 2011

नेत्रदान समज-गैरसमज

कायमचे डोळे मिटून हे जग सोडून जाताना दोन अंध व्यक्तिंना हे जग पाहण्याची संधी तुम्ही केलेल्या नेत्रदानामुळे मिळते. म्हणूनच नेत्रदान हे श्रेष्ठदानापैकी एक मानले जाते. पण आजही नेत्रदानाविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजचा अंधार दूर करण्यासाठी आणि नेत्रदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० जूनला जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...


- एक वर्षापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करू शकते.

- मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.

- अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाही तसेच रॅबिज, सिफिल्स, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्स अशासारख्या रोगाने बाधित असणार्‍यांना आपले डोळे दान करता येत नाहीत.

- हिंदुस्थानात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टिहीन आहेत.

- अंध लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण ६ ते १२ वर्षांखालील मुलांचे आहे.

- दरवर्षी नेत्रहीनांच्या संख्येत तीस हजारांची भर पडते.

- श्रीलंकेत नेत्रदान झाल्याशिवाय अंत्यसंस्कारच होत नाहीत. म्हणूनच कॉर्नियल अंधत्वाची एकही व्यक्ती तेथे नाही व हा देश शेजारच्या ६० लहान- मोठ्या देशांत कॉर्निया नियात करतो.

- कॉर्निया म्हणजे केवळ बुब्बुळावरील जो काळा भाग त्यावरील टिकलीच्या आकाराचा पारदर्शक पडदा.

- आपण मृत झाल्यावर इतर सर्वच अवयव मृत होतात. फक्त डोळा (कॉर्निया) हा एकच भाग ६ ते ८ तास खराब होत नाही.

- कुठल्याही वयाची, चष्मा लावणारी, मधुमेहाने पीडित अथवा मानसिक तणावाने ग्रस्त व्यक्तीही नेत्रदान करू शकते.

- नेत्रदानानंतर चेहरा विदुप होत नाही.

- एका व्यक्तीच्या नेत्रदानातून दोन व्यक्तींना दृष्टीलाभ होतो.

सौजन्य:- चिरायू, सामना ०९०६२०११.

Wednesday, June 08, 2011

Rani Lakshmibai - झाशीची राणी


Rani of jhansi.jpgबालपणमहाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी! हे मोरोपंत तांबे मूळचे (जळगाव जिल्ह्यातील) पारोळ्याचे. महाराष्ट्रीय माता-पित्यांच्या (वडील-मोरोपंत; आई- भागीरथी बाई) पोटी काशी येथे जन्मलेल्या मनुने, पुढे शूरवीर झाशीची राणी बनून ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून अढळ स्थान प्राप्त केले.
दुसर्‍या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्‍या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या ३-४ थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. मोठे, पाणीदार डोळे असणारी ही मोहक कन्या दुसर्‍या बाजीरावांचीच नव्हे तर सर्वांचीच लाडकी होती. बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले.
[संपादन] व्यक्तिमत्वधोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व झाशीची राणी या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी ‘मल्लखांब’ नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.

[संपादन] वैवाहिक जीवनराणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांची ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली. ‘राणी’ पदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणाने उतरल्या. झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.
दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु ,अवघ्या तीन महिन्यातच काळाने त्याच्यावर झळप घालून त्यांच्यापासून ते हिरावून नेले. परिणामी मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दु:खी झाले दत्तकपुत्र वारसा हक्कासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन ‘दामोदर’ असे नाव ठेवण्यात आले. पण दुर्दैवाने थोड्याच अवधीत गंगाधर रावांचे निधन झाले. (१८५३)

[संपादन] झाशी संस्थान खालसापूर्वीपासून झांशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत: इस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात-झांशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानात लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्र्वास वाटेल का, अशी शंका व्यक्त करून-ब्रिटिश सरकारला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार, अनैतिक कृत्यांना, कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणार्‍या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या. हे धारिष्ट दाखविल्यामुळेच त्यांना स्वातंत्र्यदेवता म्हटले गेले.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झांशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, १८५४ रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने ‘मेरी झांसी नही दूँगी’ असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झांशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पद्च्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.

[संपादन] १८५७ चा उठाव१८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मण रावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मण रावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वत:बरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वत:ही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वत:च्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या,आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.

लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’ या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जूनला (१८५८) सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरीत हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु, उपचार न करण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी वीरमरण स्वीकारले, आणि एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

[संपादन] विशेषब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क' असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या. ``रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।। ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।

टोपणनाव: मनु


जन्म: १९ नोव्हेंबर, इ.स.१८३५

काशी, भारत



मृत्यू:१७ जून, इ.स. १८५८
मृत्यू:१७ जून, इ.स. १८५८


सौजन्य:- wikipedia.org

Saturday, June 04, 2011

Valour personified : Mewar’s Lion Maharana Pratap

Introduction


Maharana Pratap Singh, is a name worth remembering to begin one’s day with. His name is engraved with gold among the list of valiant kings who protected the Nation, Dharma, Culture and Freedom of this country by sacrificing his life ! This is a holy remembrance of his valour !

Who does not know the name of the great king of Mewar, Maharana Pratap Singh? In the history of India, this name has always proved to be motivating for qualities like valour, bravery, sacrifice and martyrdom. Many brave warriors like Bappa Rawal, Rana Hamir, Rana Sang were born unto the Sisodiya family of Mewar and were given the title of ‘Rana’ but the title of ‘Maharana’ was only bestowed on Pratap Singh.

Childhood

Maharana Pratap was born in 1540. Rana Uday Singh, the Second, of Mewar had 33 children. Among them, the eldest was Pratap Singh. Self-respect and virtuous behaviour were the main qualities of Pratap Singh. He was bold and brave right from his childhood and everyone was sure that he was going to be a very valiant person as he grew up. He was more interested in sports and learning to wield weapons rather than general education.

Coronation

During Maharana Pratap Singh’s time, Akbar was the Mughal Ruler in Delhi. His policy was to make use of the strength of Hindu kings to bring other Hindu Kings under his control. Many Rajput kings, abandoning their glorious traditions and fighting spirit, sent their daughters and daughters-in-law to the harem of Akbar with the purpose of gaining rewards and honour from Akbar. Uday Singh appointed before his death, Jagammal, the son of his youngest wife as his heir although Pratap Singh was elder to Jagammal but he was ready to give up his rights like Prabhu Ramchandra and go away from Mewar but the chieftains did not at all agree with their king’s decision. Besides they were of the opinion that Jagammal did not possess qualities like courage and self-respect which were essential in a leader and king. Hence it was collectively decided that Jagammal would have to sacrifice the throne. Maharana Pratap Singh too gave due respect to the wish of the chieftains and the people and accepted the responsibility of leading the people of Mewar.
Unbreakable Oath to free the ‘Motherland’
The enemy had surrounded Mewar at all its’ boundaries. Shakti Singh and Jagammal, the two brothers of Maharana Pratap had joined Akbar. The first problem was to gather enough soldiers to fight a face-to-face war which would have required vast money but Maharana Pratap’s coffers were empty whereas Akbar had a large army, a lot of wealth and a lot more at his disposal. Maharana Pratap, however, did not get distracted or lose heart nor did he ever say that he was weak as compared to Akbar. His only concern was to immediately free his motherland from the clutches of the Mughals. One day, he called a meeting of his trusted chieftains and made an appeal to them in his serious and lustrous speech. He said, “My brave warrior brothers, our Motherland, this holy land of Mewar, is still under the clutches of the Mughals. Today, I take an oath in front of all of you that till Chittod is freed, I will not have food in gold and silver plates, will not sleep on a soft bed and will not stay in the palace; instead I will eat food on a leaf-platter, sleep on the floor and stay in a hut. I will also not shave till Chittod is freed. My brave warriors, I am sure that you will support me in every way sacrificing your mind, body and wealth till this oath is fulfilled.” All the chieftains were inspired with the oath of their king and they too promised him that till their last drop of blood, they would help Rana Pratap Singh to free Chittod and join him in fighting the Mughals; they would not retreat from their goal. They assured him, “Rana, be sure that we all are with you; waiting only for your signal and we are ready to sacrifice our life.”

Battle of Haldighat

Akbar tried his best to bring Rana Pratap under his clutches; but all in vain. Akbar got angry as no compromise could be arrived at with Rana Pratap and he declared a war. Rana Pratap also started preparations. He shifted his capital to Kumbhalgad in the Aravalli range of mountains which was difficult to access. He recruited tribal people and people dwelling in forests in his army. These people had no experience of fighting any war; but he trained them. He appealed to all Rajput chieftains to come under one flag for Mewar’s independence.

Rana Pratap’s army of 22,000 soldiers met 2,00,000 soldiers of Akbar at Haldighat. Rana Pratap and his soldiers exhibited great valour in this battle although he had to retreat but Akbar’s army was not successful in completely defeating Rana Pratap.

Along with Rana Pratap, his faithful horse named ‘Chetak’ also became immortal in this battle. ‘Chetak’ was seriously injured in the battle of Haldighat but to save his master’s life, it jumped over a big canal. As soon as the canal was crossed, ‘Chetak’ fell down and died thus it saved Rana Pratap, risking its own life. The strong Maharana cried like a child over the death of his faithful horse. Later he constructed a beautiful garden at the place where Chetak had breathed its last. Then Akbar himself attacked Rana Pratap but even after 6 months of fighting the battle, Akbar could not defeat Rana Pratap and went back to Delhi. As a last resort, Akbar sent another great warrior General Jagannath in the year 1584 with a huge army to Mewar but after trying relentlessly for 2 years, even he could not catch Rana Pratap.

Severe destiny

Wandering in the jungles and valleys of the mountains, Maharana Pratap used to take even his family with him. There always used to be the danger of the enemy attacking at anytime from anywhere. Getting proper food to eat was an ordeal in the forests. Many times, they had to go without food; they had to wander from one place to another without food and sleep in the mountains and forests. They had to leave the food and immediately proceed to another place on receiving information about the enemy’s arrival. They were constantly trapped in some catastrophe or the other. Once the Maharani was roasting ‘bhakris (Indian bread)’ in the forest; after eating their share, she asked her daughter to keep the left over ‘bhakri’ for dinner but at that time, a wild cat attacked and took away the piece of ‘bhakri’ from her hand leaving the princess crying helplessly. That piece of ‘bhakri’ was also not in her destiny. Rana Pratap felt sorry to see the daughter in such state; he got angry with his valour, bravery and self-respect and started thinking whether all his fighting and bravery was worth it. In such a wavering state of mind, he agreed to call a truce with Akbar. A poet named Pruthviraj from Akbar’s court, who was an admirer of Maharana Pratap, wrote a long letter in the form of a poem to him in Rajasthani language boosting his morale and dissuading him from calling a truce with Akbar. With that letter, Rana Pratap felt as if he had acquired the strength of 10,000 soldiers. His mind became calm and stable. He gave up the thought of surrendering to Akbar, on the contrary, he started strengthening his army with more intensity and once again immersed himself in accomplishing his goal.

Devotion of Bhamashah

There was a Rajput chieftain serving as a minister in the regime of forefathers of Maharana Pratap. He was very much disturbed with the thought that his king had to wander in forests and was going through such hardships. He felt sorry to know about the difficult times Rana Pratap was going through. He offered a lot of wealth to Maharana Pratap that would allow him to maintain 25,000 soldiers for 12 years. Rana Pratap was very happy and felt very grateful. Initially, he refused to accept the wealth offered by Bhamashah but at his constant insistence, he accepted the offering. After receiving wealth from Bhamashah, Rana Pratap started receiving money from other sources. He used all the money to expand his army and freed Mewar except Chittod which was still under the control of the Mughals.

Last wish

Maharana Pratap was lying on the bed made of grass even when he was dying as his oath of freeing Chittod was not still fulfilled. At the last moment, he took his son Amar Singh’s hand and handed over the responsibility of freeing Chittod to his son and died in peace. There is no comparison in history to his fight with a cruel emperor like Akbar. When almost the whole of Rajasthan was under the control of the Mughal Emperor Akbar, Maharana Pratap fought for 12 years to save Mewar. Akbar tried various means to defeat Maharana but he remained unbeatable till the end. Besides, he also freed a large portion of land in Rajasthan from the Mughals. He underwent so much of hardship but he preserved the name of his family and his Motherland from facing defeat. His life was so bright that the other name for freedom could have been ‘Maharana Pratap’. We pay tribute in his valiant memory !

Thursday, June 02, 2011

जांभूळ आख्यान

- जांभळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे.


- जांभळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.

- जांभळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निघून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.

- पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोनतीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.

- पिकलेली जांभळे खाल्याने पित्तामुळे होणारे जुलाब बंद होतात.

- हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा. आराम मिळतो.

- शरीराला जखम झाल्यास वा खरचटल्यास जांभळााची पाने लावावीत. त्यामुळे रक्त थांबते.

- जांभळाची बी पाण्यात उगाळून घामोळ्यावर लावले असता घामोळे कमी होते.

- जांभळ्याच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.

- जांभळ्याच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते. दात बळकट होतात. तसेच घशाची सूज कमी होते.

- दातांतून रक्त येत असल्यास जांभळाची सालं बारीक करून त्याचे मंजन करावे. त्यामुळे दातदुखीला आराम मिळतो.

- मधुमेही रुग्णांना जांभूळ हे अमृतफळ समान आहे. जांभळाच्या नियमित सेवनाने मधुमेह आटोक्यात येण्यास मदत होते. जांभळातल्या तुरटपणाचा गुण मधुमेहामध्ये फायदेशीर ठरतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण रोज खावे. तसेच पिकलेली जांभळे वाळवून त्याची पूड करावी. ही पूड एक ते दीड चमचा रोज पाण्यासोबत घ्यावी. असे रोज केल्याने काही दिवसांतच लघवीतून साखर जाणे बंद होते.

सौजन्य :- मानिनी, सामना, ०२०६२०११.