
पावसात उपयोगी पडणारी वनस्पती म्हणजे गवती चहा. घरातल्या कुंडीत सहज वाढणार्या किंवा बाजारात नेहमी मिळणार्या या गवताच्या पातीचे तुकडे चहात घातल्यामुळे चहा स्वादिष्ट बनतो.
- गवती चहा, सुंठ, आलं, खडीसाखर, धने, जिरे, लवंग, तुळस, बेल, पुदीना वगैरे पदार्थ घालून काढा करून प्यायल्यास सर्दी, खोकला बरा होतो.
- ताप आल्यास पारिजातकाची पाने या काढ्यात टाका. घसा दुखणे, ताप या तक्रारी नाहीशा होतात. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे.
- गवती चहाचा काढा घेतल्यामुळे लघवी साफ होते.
- आलं, पुदीना, गवती चहा यांच्यापासून बनवलेला हर्बल चहा घेतल्याने पचन व्यवस्थित होते. पावसाळ्यात काहीतरी गरम पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी हा हर्बल चहा घेणे उत्तम.
- गवती चहा, आलं, तुळसी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
- उर्ध्वपातन पद्धतीने गवती चहाच्या पानांतील तेल काढले जाते. हे तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, त्वचाविकार, कुष्टरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.
- वात विकारात याचे तेल अंगास चोळल्याने ठणका कमी होतो.
- साठवण्याच्या धान्यामध्ये कीटकनाशक म्हणून या गवती चहाच्या पानांचा वापर करतात.
सौजन्य:- चिरायू, सामना
No comments:
Post a Comment