सासू-सुनेचं नातं असं नुस्तं म्हटलं तरी भांडणाचे आवाज कानात घुमू लागतात. पण ’मॉडर्न डेज सासू-सून’ असलेल्या घरांमध्ये जरा डोकावून पाहिलं की लक्षात येतं, ‘अरेच्या! वादविवाद कायम असले तरी बोलण्यातले विषय बरेच बदललेत. हे नातंच बदलतंय का हळूहळू!’

घरं म्हटलं की, त्यात अनेक नाती आणि त्यातले वाद असणारच...वाद म्हटलं की, हमखास आठवणारं एकच नातं, सासू-सुनेचं!
मनुष्य या प्राण्यामध्ये तीन प्रकार असतात- सासू, सून आणि इतर! सासवांमध्येही प्रकार आहेत. सुनेशी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणार्या, सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवणार्या आणि इतर!
या इतर सासवा पहिल्या प्रकाराच्या जरा अलीकडे आणि दुसर्या प्रकारच्या बर्याच पलीकडे असतात. त्या उगीच काहीबाही करत असतात. सुनेला लहानसहान गोष्टींमध्ये डिवचणं हा त्यांचा छंद असतो.
सुनांचेही प्रकार आहेत. सासूला स्वतःची आई समजणार्या, सासूला श्वास घेणं मुश्कील करणार्या आणि इतर! इतर वर्गातल्या सुना सासूला सतत डिवचण्याचं काम करत असतात.
आधीचे दोन प्रकार तसे ‘नॉट सो मच इन फॅशन’ असल्यामुळे फक्त ‘इतर’ वर्गाबद्दलच बोलूया.
या नात्याइतकं अजब रसायन दुसरं नाही. ‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हणच या नात्यासाठी बनवली गेली असावी. सनातन काळापासून या नात्याला वादाचा शापच आहे. बदलत्या काळात वादाचे विषय बदलले इतकंच. हो पण, आपला मुलगा/नवरा कसा दुसरीच्या मुठीत आहे यावर आजही सासवा-सुनांचं एकमत असतं. असो.
अतिशयोक्ती वाटेल, पण एक गमतीशीर किस्सा हल्लीच ऐकायला मिळाला. नवीन घराचं काम करताना सासूच्या बेडरूमला लाल रंगाचं फर्निचर चांगलं दिसणार नाही हे सुनेने सर्वांना (सासू सोडून) पटवून दिलं. काम पूर्ण झाल्यानंतर सासूने रंगारी, ग्रिलवाला, सुतारांसकट सगळ्या कामगारांना एका रविवारी घरी मटणाच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या रविवारी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.
दरवेळी सासूच अशी वागते असंही नाही. ओळखीतल्या एक सासूबाई इतक्या हौशी आहेत की, दिवसभर घरकामांमध्ये रेंगाळणार्या सूनबाईला त्यांचा राग येतो. या सासूबाई प्रवचन, भजनी मंडळ, पिकनिक असं सगळं करतात. तरीही त्यांच्याकडे केसांना मेंदी लावणं, फेशिअल करणं, शॉपिंग यासाठी वेळ असतो. इतकं कमी की काय, म्हणून त्या दिवाळीचा फराळ, उन्हाळ्यात पापड, कुरड्या हे सगळंही करतात. यंदाच्या दिवाळीत सुनेला फेशियल केल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांनी चकल्या तळायला बोलावलं म्हणून राग आला होता.
ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली, पण या प्रसंगांवरून एक लक्षात आलं की, सासू-सून हे नातंही आता बदलतंय. सासूबाईंसाठी वेगळी रूम आणि त्यातली रंगसंगती ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचवेळी सुनेलाही त्यात हस्तक्षेप करण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळतोय. एकाच घरात सासू-सून मिळून पार्लरच्या अपॉइंटमेंट घेताहेत, एकमेकींच्या डिझायनर साड्या एक्सचेंज करताहेत. अनेक सासवांनी स्मार्ट सूनबाईंकडून शिकवणी घेत स्वतःमध्ये सकारात्मक बदल केलेले दिसतात. आपणही नीटनेटकं राहायला हवं, बदल म्हणून तरी घराबाहेर पडायला हवं हे स्वतःला समजावून दिलंय.
शिकलेल्या, नोकरी करणार्या सुना, बायकोला समजून घेणारे-सन्मानाने वागवणारे नवरे, बदलत्या जगाचं भान येत असलेल्या सासवा असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. मागच्या पिढीतल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अनेक जणी आज सासूच्या भूमिकेत आहेत. त्यांना बदलणारं, विस्तारणारं जग माहितीचं आहे. या सगळ्याचा परिणाम एका अत्यंत नाजूक नात्यावरही होतोय.
ओळखीतल्या एक सासूबाई पार्टटाइम नोकरी करतात. त्यांची सून मात्र काही कारणांनी घरीच असते. या सासूबाई रात्री उशिरा, कामाच्या ठिकाणी जेवूनच घरी परततात. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या सीरियल्स पाहत जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. घराबाहेर पडल्यानंतर सून काय करते, काय जेवण बनवते असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो. इतकंच नाही, अनेक छोट्या-मोठ्या समारंभांनाही त्या सुनेलाच सांगतात, ‘तू जाऊन ये. तेवढाच तुझा टाइमपास.’ त्यामुळे, भिशी मंडळ, किटी पार्टी, सोसायटीच्या पूजा वगैरेंमध्ये सूनबाईंचीच हजेरी असते. यात सुनेला चिडवण्याचा हेतू नसतो. उलट सुनेनं घराबाहेर पडावं यासाठी त्या प्रयत्न करत असतात. आणखी एक सासूबाई तर सुनेसाठी शॉपिंगही करतात. हळदीकुंकवाच्या भेटवस्तूंपासून तिच्या कपड्यांपर्यंत सगळं काही. लग्नानंतर चांगला टेलर, पार्लर, वडापावची गाडी या सगळ्यांशी सुनेची ओळख सासूबाईंनीच करून दिली.
हे नातं बदलण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक हा टीव्ही असावा. अगदी जवळच्या नात्यातल्या एका सुनेने सीरियल्स पाहण्याचं कारण सांगितलं होतं,‘ ही माझ्या आयुष्याची फँटसी आहे. या बायकांसारखं आयुष्य असलेलं मला आवडलं असतं, पण ते तसं नाही. मग बघण्याची तरी मजा घ्यायची.’
काहीही असलं तरी या कार्यक्रमांनी सासू-सुनेला किमान काही तास एकत्र ठेवण्याची किमया केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यातल्या प्रत्येकीची साडी, मंगळसूत्राचं डिझाईन, एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स अशा अनेक विषयांवर चहाच्या घोटासोबत हल्ली गप्पा रंगतात.
हा बदल नेमका काय आहे? याची प्रचिती काही दिवसांपूर्वीच आली. एका इंग्रजी वृत्तपत्राची गुळगुळीत पुरवणी हाताळत सासूबाईंनी विचारलं, ‘या विद्या बालनचा कोणी बॉयफ्रेंड नाही अजून?’

घरं म्हटलं की, त्यात अनेक नाती आणि त्यातले वाद असणारच...वाद म्हटलं की, हमखास आठवणारं एकच नातं, सासू-सुनेचं!
मनुष्य या प्राण्यामध्ये तीन प्रकार असतात- सासू, सून आणि इतर! सासवांमध्येही प्रकार आहेत. सुनेशी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणार्या, सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवणार्या आणि इतर!
या इतर सासवा पहिल्या प्रकाराच्या जरा अलीकडे आणि दुसर्या प्रकारच्या बर्याच पलीकडे असतात. त्या उगीच काहीबाही करत असतात. सुनेला लहानसहान गोष्टींमध्ये डिवचणं हा त्यांचा छंद असतो.
सुनांचेही प्रकार आहेत. सासूला स्वतःची आई समजणार्या, सासूला श्वास घेणं मुश्कील करणार्या आणि इतर! इतर वर्गातल्या सुना सासूला सतत डिवचण्याचं काम करत असतात.
आधीचे दोन प्रकार तसे ‘नॉट सो मच इन फॅशन’ असल्यामुळे फक्त ‘इतर’ वर्गाबद्दलच बोलूया.
या नात्याइतकं अजब रसायन दुसरं नाही. ‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हणच या नात्यासाठी बनवली गेली असावी. सनातन काळापासून या नात्याला वादाचा शापच आहे. बदलत्या काळात वादाचे विषय बदलले इतकंच. हो पण, आपला मुलगा/नवरा कसा दुसरीच्या मुठीत आहे यावर आजही सासवा-सुनांचं एकमत असतं. असो.
अतिशयोक्ती वाटेल, पण एक गमतीशीर किस्सा हल्लीच ऐकायला मिळाला. नवीन घराचं काम करताना सासूच्या बेडरूमला लाल रंगाचं फर्निचर चांगलं दिसणार नाही हे सुनेने सर्वांना (सासू सोडून) पटवून दिलं. काम पूर्ण झाल्यानंतर सासूने रंगारी, ग्रिलवाला, सुतारांसकट सगळ्या कामगारांना एका रविवारी घरी मटणाच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या रविवारी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.
दरवेळी सासूच अशी वागते असंही नाही. ओळखीतल्या एक सासूबाई इतक्या हौशी आहेत की, दिवसभर घरकामांमध्ये रेंगाळणार्या सूनबाईला त्यांचा राग येतो. या सासूबाई प्रवचन, भजनी मंडळ, पिकनिक असं सगळं करतात. तरीही त्यांच्याकडे केसांना मेंदी लावणं, फेशिअल करणं, शॉपिंग यासाठी वेळ असतो. इतकं कमी की काय, म्हणून त्या दिवाळीचा फराळ, उन्हाळ्यात पापड, कुरड्या हे सगळंही करतात. यंदाच्या दिवाळीत सुनेला फेशियल केल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांनी चकल्या तळायला बोलावलं म्हणून राग आला होता.
ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली, पण या प्रसंगांवरून एक लक्षात आलं की, सासू-सून हे नातंही आता बदलतंय. सासूबाईंसाठी वेगळी रूम आणि त्यातली रंगसंगती ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचवेळी सुनेलाही त्यात हस्तक्षेप करण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळतोय. एकाच घरात सासू-सून मिळून पार्लरच्या अपॉइंटमेंट घेताहेत, एकमेकींच्या डिझायनर साड्या एक्सचेंज करताहेत. अनेक सासवांनी स्मार्ट सूनबाईंकडून शिकवणी घेत स्वतःमध्ये सकारात्मक बदल केलेले दिसतात. आपणही नीटनेटकं राहायला हवं, बदल म्हणून तरी घराबाहेर पडायला हवं हे स्वतःला समजावून दिलंय.
शिकलेल्या, नोकरी करणार्या सुना, बायकोला समजून घेणारे-सन्मानाने वागवणारे नवरे, बदलत्या जगाचं भान येत असलेल्या सासवा असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. मागच्या पिढीतल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अनेक जणी आज सासूच्या भूमिकेत आहेत. त्यांना बदलणारं, विस्तारणारं जग माहितीचं आहे. या सगळ्याचा परिणाम एका अत्यंत नाजूक नात्यावरही होतोय.
ओळखीतल्या एक सासूबाई पार्टटाइम नोकरी करतात. त्यांची सून मात्र काही कारणांनी घरीच असते. या सासूबाई रात्री उशिरा, कामाच्या ठिकाणी जेवूनच घरी परततात. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या सीरियल्स पाहत जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. घराबाहेर पडल्यानंतर सून काय करते, काय जेवण बनवते असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो. इतकंच नाही, अनेक छोट्या-मोठ्या समारंभांनाही त्या सुनेलाच सांगतात, ‘तू जाऊन ये. तेवढाच तुझा टाइमपास.’ त्यामुळे, भिशी मंडळ, किटी पार्टी, सोसायटीच्या पूजा वगैरेंमध्ये सूनबाईंचीच हजेरी असते. यात सुनेला चिडवण्याचा हेतू नसतो. उलट सुनेनं घराबाहेर पडावं यासाठी त्या प्रयत्न करत असतात. आणखी एक सासूबाई तर सुनेसाठी शॉपिंगही करतात. हळदीकुंकवाच्या भेटवस्तूंपासून तिच्या कपड्यांपर्यंत सगळं काही. लग्नानंतर चांगला टेलर, पार्लर, वडापावची गाडी या सगळ्यांशी सुनेची ओळख सासूबाईंनीच करून दिली.
हे नातं बदलण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक हा टीव्ही असावा. अगदी जवळच्या नात्यातल्या एका सुनेने सीरियल्स पाहण्याचं कारण सांगितलं होतं,‘ ही माझ्या आयुष्याची फँटसी आहे. या बायकांसारखं आयुष्य असलेलं मला आवडलं असतं, पण ते तसं नाही. मग बघण्याची तरी मजा घ्यायची.’
काहीही असलं तरी या कार्यक्रमांनी सासू-सुनेला किमान काही तास एकत्र ठेवण्याची किमया केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यातल्या प्रत्येकीची साडी, मंगळसूत्राचं डिझाईन, एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स अशा अनेक विषयांवर चहाच्या घोटासोबत हल्ली गप्पा रंगतात.
हा बदल नेमका काय आहे? याची प्रचिती काही दिवसांपूर्वीच आली. एका इंग्रजी वृत्तपत्राची गुळगुळीत पुरवणी हाताळत सासूबाईंनी विचारलं, ‘या विद्या बालनचा कोणी बॉयफ्रेंड नाही अजून?’
मी हा शब्द फार छोटा आहे, पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. अनेक मोठ्या शब्दांचा, विचारांचा, भावनांचा बाप म्हणजे ‘मी’. या शब्दाचा अर्थही परिस्थिती आणि काळानुसार बदलत राहतो. तो कधी स्वाभिमान असतो, कधी त्याग असतो, तर कधी अहंकार. आपण कुणाशी व कुणाबद्दल बोलत आहोत यावरही हा अर्थ वेगळे वळण घेतो. आयुष्यात येणार्या प्रत्येक क्षणात ‘मी’ असतोच. तो असावाही, पण तो हवा तेवढाच असावा. आपण आपल्यात गुरफटून राहिलो तर त्या ‘मी’ला काहीच अर्थ राहत नाही. स्वार्थ आणि त्याग हे खरेच, पण दुसर्यांसाठी ठेवलेल्या स्वार्थाची रंगत वेगळीच असते. तसेच दुसर्यांसाठी ‘मी’ जोपासला तर त्या ‘मी’चे नकळत ‘आपण’ होते. ज्या लोकांसोबत ‘मी’ म्हणजे ‘आपण’ असे वाटते त्यालाच नाती म्हणतात. बाकी सगळे वरवरचे बुडबुडे. स्वत:वर प्रेम करा, आपल्या असण्याचा स्वाभिमान बाळगा, पण त्या स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात होता कामा नये. आपण आपल्या मोठेपणाचे पोस्टर जगभर लावणे याला स्वाभिमान म्हणत नाहीत. मोठ्या माणसाला ‘मी मोठा आहे’ असे सांगावे लागत नाही. आचारांनी आणि विचारांनी मोठे व्हा. अहंकाराच्या सागरात सर्वच बुडून मरतात. त्यात वाचणे कठीण असते. त्यामुळे या सागरात उडी टाकण्याचा विचार सोडा. स्वाभिमानाच्या संथ नदीचा अनुभव घ्या. त्यात ‘मी’ असतो. आपल्या जगाबाहेर थोडेसे डोकावा आणि आपल्या जगातही आपल्यांना जागा द्या. ऑफिसमध्ये, घरी, समाजात वावरताना स्वत:तला मी जिवंत ठेवून सर्वांसोबत आपण व्हा! स्वत: बदलू नका, दुसर्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. ‘आपण’ झालात तर बदल आपोआप घडतील. तुम्हाला कळणारही नाहीत आणि ते सुखदही वाटतील. आता तुम्हीच पहा, या लेखात ‘मी’ किती वेळा आला, पण मी या ‘मी’त तुम्हाला पाहिले. हा लेख संपता संपता माझ्या ‘मी’चा ‘आपण’ झाला तर माझे ‘मी’ सार्थकी लागेल. आजकालचा ‘मी’ म्हणजे ‘इगो’ सोडून द्या. आपलेपणा आणि समजूतदारपणा त्याहून लाखमोलाचा आहे. कुणाला तरी म्हणा, ‘मी आहे’ तेव्हा त्या ‘मी’ला खरा अर्थ येईल.
वॉशिंग्टनमधील वृत्त स्मोकिंग करणार्यांसाठी धक्कादायकच आहे. तेथे भाड्याच्या घरात धूम्रपान करण्यास घरमालकांनी पायबंदी घातली आहे. अमेरिकेत रेस्टॉरंट, कार्यालय, सार्वजनिक स्थळे, क्लब व बीयर बारमध्ये स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातले आहे. भविष्यात धूम्रपान करणार्यांची मोठी गोची होणार आहे. त्यांना धूम्रपान करण्यासाठी वारंवार दंड भरावा लागेल किंवा सिगारेट ओढणे तरी बंद करावे लागणार आहे.
केवळ इंग्रजी बोलता आले म्हणजे प्रगती होते या एकमेव (गैर)समजुतीने जे पालक मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतात. त्यांना एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे ‘इंग्रजी शिकणे व इंग्रजीतून शिकणे’ या दोन भिन्न बाबी आहेत. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की विद्यार्थ्यांचा बौद्धिक, आत्मिक विकास साधायचा असेल तर मेंदूला मातृभाषेतूनच सूचना देणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 27 फेबु्रवारी रोजी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने केलेले हे एक मुक्तचिंतन...
चांगल्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला जीवसत्त्वांचा ‘डोस’ मिळणे गरजेचे आहे. औषधं, इंजेक्शनमधून अनेकजण ही व्हिटॅमिन्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण रोजच्या आहारातही आपण पुरेसी जीवनसत्त्वे मिळवू शकतो. एकंदरीतच कुठल्या अन्नपदार्थातून कुठले जीवनसत्त्व मिळू शकते, प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य, अभावाने उद्भवणारे आजार याची माहिती देणारे हे ‘जीवनसत्त्वाची बाराखडी’ हे नवीन सदर...
ऑफिसात हल्ली संगणकाचा वापर वाढला आहे. सतत बैठे काम, बसण्याची चुकीची पद्धत व कामाचा ताण या सर्वांचा अप्रत्यक्षपणे भार मानेवर येतो व सुरू होते मानदुखी. या मानदुखीकडे जर वेळीच लक्ष नाही दिले तर सर्व्हायकल स्पॉंडिलायसिससारखा आजारही होऊ शकतो.
बोर्डेटेला पेर्तुसिस नावाच्या विषाणूमुळे डांग्या खोकला होतो. हा संसर्गजन्य आजार असून दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
* टोमॅटो नरम झाले असतील तर त्यांना मिठाच्या पाण्यात ठेवावेत ते कडक होतील
सायबर वॉरमुळे हिरोशिमा किंवा नागासकीवर अणुबॉम्ब टाकून केलेली अपरिमित जीवितहानी नक्कीच होणार नाही. परंतु एखाद्या देशाची संपूर्ण ‘इन्फर्मेशन सिस्टिम’ व दळणवळण यंत्रणा कोलमडून टाकण्याची क्षमता नक्कीच आहे व त्याचबरोबर आपल्याकडील महत्त्वपूर्ण माहिती जी कोट्यवधी संगणकावर सध्या स्टोअर केली असेल ती ‘वॉश आऊट’ अर्थात नाहीशी होण्याचा धोका व तिचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अशा अनेक गोष्टी होऊ शकतात.
वैविधतेने नटलेल्या हिंदुस्थानची खाद्यसंस्कृतीही तितकीच निराळी. डाळ-भात, छोले, दाल मखनी, रोटी इत्यादी पदार्थांवर इथला सामान्य माणूस ताव मारून खातो यात विशेष नाही. पण आता याच डाल-रोटी किंवा हिंदुस्थानी खाद्यपदार्थांची भुरळ अख्ख्या जगाला पडली आहे. म्हणूनच जगभरातल्या आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये हिंदुस्थानने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
‘टाईम इज मनी’ म्हणजेच ‘वेळ हा पैशासारखा’ ही म्हण प्रत्येकालाच पटते. प्रत्येक जण जीव आटवून वेळ आणि पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेही वेळ मोडायला नको म्हणून एक काम संपत नाही तेवढ्यात दुसर्या कामाच्या तयारीला आपण लागतो. घड्याळाचे काटे फिरतात तसे आपणही फिरतो. सगळे काही वेळेत झाले तर सर्व काही नीट असे समजून आपण ‘वेळेतच सगळं’ हवे या अट्टहासाचा डोंगर खांद्यावर घेऊन वणवण फिरतो. इथून सुरू होतो वेळ घालवण्याचा प्रवास. वेळ वाचवणे ही इच्छा व सवय म्हणून चांगले. पण ओझे झाले की वेळ जास्त वाया जातो. अनेकदा कुठेतरी पोहचायचे असताना ट्रॅफिक लागला की आपला पारा चढतो. वैताग,चीडचीड आपला ताबा घेते. घाईत चालताना चुकून एखाद्याचा धक्का लागला तरी मानहानी झाल्यासारखे आपण समोरच्या वर तुटून पडतो. या अशा चीडचिडीत अपशब्दांचा गोळीबार करून आपण आपलाच स्तर खाली पाडतो. तसेच बॉसने काहीतरी चूक दाखवली, आईवडिलांनी प्रश्न विचारले, सहकार्यांनी सल्ला दिला किंवा काहीही मनाला न पटणारे वाटले की आपण शोलेतला गब्बरसिंग होण्यात अजिबात वेळ घालवत नाही. विचार, मन आणि जिभेचे नाते तोडून जे तोंडी येईल ते बोलतो. आपण आपला विचार सोडून देतो या परिस्थितीत. खरं तर बर्याचदा ज्यांच्यावर आपण रोषाचा पाऊस पाडत असतो त्यांना त्याची कल्पनाही नसते. प्रचंड त्रासाच्या भट्टीत जळतो फक्त आपणच. चांगले काही घडले की आयुष्य फार वेगात असल्यासारखे वाटते आणि जड प्रसंगात जीवन अगदी कासवपावलांनी सरते असे भासते. या सर्वाचा अर्थ एकच, आयुष्य तेवढेच. ते आपण कसे घालवायचे ते आपणच ठरवतो. येणारा प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा ठरवला तर या जीवनाचे नंदनवनच होईल. छोटे क्षण जेव्हा अनुभवांच्या धाग्यात गुंफले जातात तेव्हा आयुष्याचा हार तयार होतो. प्रत्येक येणार्या अनुभवाला चांगल्या नजरेने पहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्ही चीडून घालवलेला एखादा क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीचा, आईवडिलांचा, मुलांचा, कामाचा नक्कीच असेल. प्रत्येक क्षण जगा. जळू नका. रागात, द्वेषात घालवू नका.
अशाच एका जया बच्चनने नुकतीच आपली नोकरी सोडली. त्याच निमित्ताने खरंतर हा सिनेमा पुन्हा आठवला. मुलीकडे दुर्लक्ष होतंय, हे एक ठरलेलं कारण तिनेही सांगितलं. तिचा नवरा तुलनेने कमी पगाराच्या, कमी आवाका असलेल्या कंपनीत काम करतो. ही पूर्वीपासूनच तशी एक पाऊल पुढे. कॉलेजमध्ये असताना शिक्षकांना हिचा अभिमान वाटायचा. आपली विद्यार्थिनी खूप पुढे जाणार, असा विश्वासच होता त्यांना. पण, आज परिस्थिती अगदी वेगळी आहे. घरी सासू आहे, नवरा दुपारी कामावर जातो. तरीही मुलीकडे नीट लक्ष दिलं जात नाही म्हणून मग हिने नोकरीच सोडली. नाही म्हणायला, गप्पांच्या ओघात नवर्याने मारलेले टोमणे येतातच. सगळं दुःख सांगून झालं की, ‘हे काय चालायचंच. सगळीकडे हीच गत असते,’ अशी सारवासारव करायलाही ती विसरत नाही.
योगाभ्यास करीत असताना मनाची एकाग्रता आवश्यक असते अन्यथा योगासने म्हणजे शारीरिक कसरत होते.
आसन स्थिती : पद्मासन, वज्रासन किंवा सुखासनात बसावे. हे शक्य नसेल तर खुर्चीवर पाठीचा कणा सरळ राहील अशा अवस्थेमध्ये बसावे.
* काही वेळाने डोळ्यांवर ताण येऊन पापण्या आपोआप मिटू लागल्यावर हळुवारपणे डोळे मिटून काही वेळ तसेच ठेवावेत. डोळे चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा तक्रारी सुरुवातीला जाणवतात, परंतु सरावामुळे त्या कमी होतात.
हरभरे वायुकारक असले तरी ते पित्त, कफनाशक, थंड व रक्तविकार नाहीसे करणारे आहेत. म्हणूनच नेहमीच्या आहारात हरभर्याचा वापर भाजी-आमटीसाठी आवर्जून केला जातो. हरभर्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.
प्राणी पाळणे ही केवळ ‘हौसे’ची गोष्ट असे आपल्याकडे अजूनही मानले जाते, पण या प्राण्यांचा उपयोग आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठीही होऊ शकतो हे मानसशास्त्रज्ञांनी व संशोधकांनी सिद्ध करून दाखवले आहे. यालाच प्राणी चिकित्सा किंवा ऍनिमल असिस्टेड थेरपी असे म्हणतात.
एक सुंदरसं हसू तुमचा दिवस आनंदी बनवत असतं हे हसू चेहर्यावर पसरवतात ते ओठ! आकर्षक ओठ आणि प्रसन्न हसू सगळ्यांनाच मिळत नाही, ती दैवी देणगी आहे. पण वैद्यक शास्त्राने इतकी कमाल केली आहे की शस्त्रक्रिया करून (पाऊट सर्जरी) ओठांचा आकारही आजकाल बदलता येतो. शस्त्रक्रिया न करताही फिलर्स वापरून ओठ भरीव करण्याचीही आधुनिक पद्धत आजकाल वापरली जाते. सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ओठांची शस्त्रक्रिया करण्याचा ट्रेण्ड आहे. बारीक ओठांना भरीव करून ओठांची मोहोळ प्रत्यक्षात खोलणार्या या शस्त्रक्रियांविषयी माहिती देत आहेत इवॉल्व मेड स्पाचे कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजिस्ट डॉ अभिजित देसाई
इ. स. 1800 चं शेवटचं पर्व सुरू झालं. ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. भारतमाता ब्रिटिशांच्या आणि पारतंत्र्याच्या जोखडात जखडू लागली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि 1857 मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. या स्वातंत्र्ययुद्धात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, दिल्लीचा बादशहा असे अनेकजण सामील झाले. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी 4 नोव्हेंबर 1845 रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके!