संगणक व लॅपटॉप बिघाडाच्या सर्वात जास्त तक्रारी पावसाळ्यात उद्भवतात व फक्त पावसाचे पाणी जाऊन नव्हे तर इतर अनेक गोष्टींमुळे संगणक व लॅपटॉप बिघाडाचे प्रमाण पावसाळ्यात खूपच वाढते. तुमच्या संगणक व लॅपटॉपला पावसाळ्यातील विविध बिघाडांपासून दूर ठेवण्यासाठी खालील काही टीप्स-

- घरात व्यवस्थित इलेक्ट्रिकल आथिर्ंंग नसेल तर तुमच्या संगणकाचा व लॅपटॉपचा एश्झ्ए (स्वीच मोड पॉवर सप्लाय) खराब होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. बहुतांशी वेळेस पावसाळ्यात एश्झ्ए जळण्याच्या सर्वात जास्त घटना घडतात. त्यामुळे तुम्ही तुमचा संगणक/ लॅपटॉप ज्या इलेक्ट्रिकल पॉइंटला लावत असाल त्याला व्यवस्थित आर्थिंग असल्याची खात्री करून घ्या.
- आजकाल बर्याच ठिकाणी केबल इंटरनेटचा वापर केला जातो. केबल इंटरनेट म्हणजेच ज्या केबल टीव्हीवरून आपण टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्याच केबलवरून संगणकावरील इंटरनेटदेखील चालते. बर्याचदा केबल्समधून विशेषत: पावसाळ्यात मोठ्या स्पाइकच्या विद्युतलहरी इतर ठिकाणांवरून येतात. त्यामुळे तुमचा संगणक जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषत: विजा कडकडत असताना संगणक सुरू करू नका.
- पावसाळ्यातली सर्वात जास्त आढळणारी आणखी एक तक्रार म्हणजे संगणकाच्या आतील मेमरी कार्ड खराब होणे. बर्याचदा आपला संगणक/ लॅपटॉप सुरुवातीला ३बीपची वॉर्निंग देऊन चालू होत नाही. संगणकातील मेमरी (RAM) दमटपणामुळे मॉइचराईज्ड झालेली असल्यामुळे हा त्रास उद्भवतो. अशावेळेस संगणकातील श् काढून तिला खोडरबर अथवा इतर कोणत्याही रबरी पदार्थाचा वापर करून पुसल्यास तुमचा संगणक लगेच चालू होऊ शकतो.
- पावसाळ्यात दमट हवामानामुळे आपल्या संगणकाचा CD ROM जाम होण्याचीदेखील शक्यता असते व जर तुम्ही संगणकाचा CD ROM अनेक दिवस वापरत नसाल तर हा बिघाड नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात आपल्या संगणकाच्या ण् CD ROM चा वरचेवर वापर करीत रहा किंवा त्यात कोणतीही CD टाकून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस संगणक सुरू होताना CD ROM देखील चालू राहील.
- संगणकाबरोबरच पावसाळ्यामध्ये दमटपणामुळे प्रिंटर जॅम होण्याचीदेखील शक्यता वाढते. बर्याचदा प्रिंटर जॅम झाल्यानंतरही आपणास माहीत नसल्यामुळे आपण तो वापरत राहतो. त्यामुळे त्यातील मेकॅनिकल पार्ट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपला प्रिंटर एकदा सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते.
- पावसाळ्यामध्ये पॉवर फ्लक्चुएशनमुळे संगणकाचा मदरबोर्ड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संगणकाला स्पाइक गार्ड लावावा. त्यामुळे जरी पावसाळ्यात पॉवर फ्लक्चुएशन झाले तरी तुमच्या संगणकाचा मदरबोर्ड सुरक्षित राहू शकतो.
- लॅपटॉपमध्ये पाणी गेले असल्याची शक्यता वाटली तर त्वरित लॅपटॉपची बॅटरी काढून टाका व लॅपटॉप स्वीच ऑफ करा. जर तुमच्याकडे लॅपटॉपचे मॅन्युअल बुक असेल तर त्याचा वापर करून लॅपटॉपची केस (बाहेरील आवरण) काढण्याचा प्रयत्न करा व घरातील हेअर ड्रायरचा वापर करून लॅपटॉप ड्राय करायचा प्रयत्न करा व पुढील २४ ते ४८ तास लॅपटॉप ऑन करू नये. हवेतील दमटपणामुळे तुमचा लॅपटॉप हँग होत असेल तर लॅपटॉप बॅगमधील इन्सुलेशन तपासून घ्यावे. ते खराब झाले असल्यास नवीन इन्सुलेशन टाकून घ्यावे.
- त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्या संगणक तसेच लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा बॅकअप घेऊन ठेवा. त्यामुळे जरी तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागली तरी तुमचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहू शकेल.
Techno.savvy@live.com

- घरात व्यवस्थित इलेक्ट्रिकल आथिर्ंंग नसेल तर तुमच्या संगणकाचा व लॅपटॉपचा एश्झ्ए (स्वीच मोड पॉवर सप्लाय) खराब होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. बहुतांशी वेळेस पावसाळ्यात एश्झ्ए जळण्याच्या सर्वात जास्त घटना घडतात. त्यामुळे तुम्ही तुमचा संगणक/ लॅपटॉप ज्या इलेक्ट्रिकल पॉइंटला लावत असाल त्याला व्यवस्थित आर्थिंग असल्याची खात्री करून घ्या.
- आजकाल बर्याच ठिकाणी केबल इंटरनेटचा वापर केला जातो. केबल इंटरनेट म्हणजेच ज्या केबल टीव्हीवरून आपण टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्याच केबलवरून संगणकावरील इंटरनेटदेखील चालते. बर्याचदा केबल्समधून विशेषत: पावसाळ्यात मोठ्या स्पाइकच्या विद्युतलहरी इतर ठिकाणांवरून येतात. त्यामुळे तुमचा संगणक जळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषत: विजा कडकडत असताना संगणक सुरू करू नका.
- पावसाळ्यातली सर्वात जास्त आढळणारी आणखी एक तक्रार म्हणजे संगणकाच्या आतील मेमरी कार्ड खराब होणे. बर्याचदा आपला संगणक/ लॅपटॉप सुरुवातीला ३बीपची वॉर्निंग देऊन चालू होत नाही. संगणकातील मेमरी (RAM) दमटपणामुळे मॉइचराईज्ड झालेली असल्यामुळे हा त्रास उद्भवतो. अशावेळेस संगणकातील श् काढून तिला खोडरबर अथवा इतर कोणत्याही रबरी पदार्थाचा वापर करून पुसल्यास तुमचा संगणक लगेच चालू होऊ शकतो.
- पावसाळ्यात दमट हवामानामुळे आपल्या संगणकाचा CD ROM जाम होण्याचीदेखील शक्यता असते व जर तुम्ही संगणकाचा CD ROM अनेक दिवस वापरत नसाल तर हा बिघाड नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात आपल्या संगणकाच्या ण् CD ROM चा वरचेवर वापर करीत रहा किंवा त्यात कोणतीही CD टाकून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेस संगणक सुरू होताना CD ROM देखील चालू राहील.
- संगणकाबरोबरच पावसाळ्यामध्ये दमटपणामुळे प्रिंटर जॅम होण्याचीदेखील शक्यता वाढते. बर्याचदा प्रिंटर जॅम झाल्यानंतरही आपणास माहीत नसल्यामुळे आपण तो वापरत राहतो. त्यामुळे त्यातील मेकॅनिकल पार्ट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपला प्रिंटर एकदा सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते.
- पावसाळ्यामध्ये पॉवर फ्लक्चुएशनमुळे संगणकाचा मदरबोर्ड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या संगणकाला स्पाइक गार्ड लावावा. त्यामुळे जरी पावसाळ्यात पॉवर फ्लक्चुएशन झाले तरी तुमच्या संगणकाचा मदरबोर्ड सुरक्षित राहू शकतो.
- लॅपटॉपमध्ये पाणी गेले असल्याची शक्यता वाटली तर त्वरित लॅपटॉपची बॅटरी काढून टाका व लॅपटॉप स्वीच ऑफ करा. जर तुमच्याकडे लॅपटॉपचे मॅन्युअल बुक असेल तर त्याचा वापर करून लॅपटॉपची केस (बाहेरील आवरण) काढण्याचा प्रयत्न करा व घरातील हेअर ड्रायरचा वापर करून लॅपटॉप ड्राय करायचा प्रयत्न करा व पुढील २४ ते ४८ तास लॅपटॉप ऑन करू नये. हवेतील दमटपणामुळे तुमचा लॅपटॉप हँग होत असेल तर लॅपटॉप बॅगमधील इन्सुलेशन तपासून घ्यावे. ते खराब झाले असल्यास नवीन इन्सुलेशन टाकून घ्यावे.
- त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्या संगणक तसेच लॅपटॉपमधील सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा बॅकअप घेऊन ठेवा. त्यामुळे जरी तुमच्या संगणकाची हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागली तरी तुमचा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहू शकेल.
Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना २८०६२०११.

आकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो. आपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाऊड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हलल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे-येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. धूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. या घन भागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला ‘डर्टी स्नो बॉल’ या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतूविषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.
- सूर्यमालेमध्ये फक्त शनीलाच नाही तर गुरू, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांनादेखील स्वत:भोवती कडी आहे.

दिसायला एखाद्या गवतासारखे दिसणारे गवत, पण या गवतामध्ये असणार्या औैैषधी गुणधर्मांमुळे त्याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. बहुतेकजण मात्र चहाला फक्त चव यावी यासाठी या गवताचा वापर करतात. म्हणूनच याचे नाव गवती चहा असे पडले असावे. गवती चहाला इंग्रजीमध्ये लेमन ग्रास असे म्हणतात. गवतासारखी वाढणारी ही वनस्पती बहुवर्षीय व बहुगुणी औषध आहे. 
सगळं काही नीट होत असताना मध्येच राग येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चीडचीड होते. का? कशासाठी? कशामुळे? काहीच कळत नाही, पण असं होतं. ऑफिसचे काम लवकर संपते. नेहमी लवकर घरी पोहोचावे असे वाटत असून पोहोचता न येणार्याला घरी जावेसे वाटत नाही. इथे तिथे वेळ घालवूनही वेळ जात नाही. कारण काही नसते, पण असं होतं. खूप वर्षे वाट पाहिलेली संधी दारात चालून येते. मनासारखे होते, पण आनंदाचा एक अंशही जाणवत नाही. खरं तर अर्थच नाही याला, पण असं होतं. आपले प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीवर क्रोधाचा वर्षाव केला जातो. तसे करायचे नसते, पण नकळत घडून जाते. प्रेम अमाप असते तरी असं होतं. तरतरीत सुरू झालेल्या सकाळचा शेवट एक वैफल्यपूर्ण संध्याकाळ करते. बिघडलेले काहीच नसते. दिवसही नेहमीप्रमाणेच सरलेला असतो, पण असं होते. आपली क्षमता, कुवत माहीत असूनही कधीतरी लाचारीचे पांघरुण ओढून झोपावेसे वाटते. आपण काहीच करू शकत नाही. आपले आयुष्य व्यर्थ आहे असेच मानावेसे वाटते. तोच आत्मविश्वास, तीच जिद्द, तीच स्वप्नं असतात मनात, पण असं होतं. एकटेपणाची खूप भीती वाटते. कुणीतरी सोबत असावे असे वाटते. मुद्दाम सर्वांपासून दूर राहायचा, अबोला धरायचा निर्णय आपण घेतो. गरज असते संवादाची आणि आपण तोंड लपवून पळत राहतो. करायचे असते काहीतरी, करतो वेगळेच. असेही होते. अरे पण का होते याचे उत्तर कुणालाच सापडत नाही. कदाचित ते उत्तर न सापडण्यातच जगण्याची मजा आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन फुलपाखरासारखे असते. रंगीबेरंगी. कधी या फुलावर तर कधी त्या. मध्येच खूश होते. आनंदात रडवते, दु:खात हसवते. प्रगतीचा ध्यास लावते. ती मिळाली की, त्याचे महत्त्व संपवते. फुलपाखराप्रमाणे उडत राहते. पाऊस नाही पडला की, मन म्हणते ‘कसे होणार जगाचे? पावसाला काही काळजीच नाही.’ धो धो पडला की, तेच मन म्हणते, ‘अरे, काही सीमा आहे की नाही? किती पडायचे पावसाने!’ आणि अगदीच काही नाही तर म्हणते ‘पावसाचे काहीच खरं नाही, कधीही येतो आणि कधीही जातो.’ मन हे असेच. छोट्या पोरांची मनं सांभाळण्यासाठी आपण जी मेहनत घेतो, तेवढेच श्रम आपण स्वत:चे मन सांभाळण्यासाठी घ्यायला हवे. मनाशी संवाद साधा. स्वत:च्या मनाला समजवा. ‘मूड’च्या नावाखाली काम न होणे हे योग्य नाही. मन बदलत राहते, उडत राहते, भावनांचे मंथन करते, विचारांचे पत्ते पिसते, मूड नावाच्या गुंत्यात गुंतवते. मन अक्षरश: आपल्याला नाचवते आणि आपण नाचत राहतो. काही कळतच नाही, कधी कधी बेसूर रडगाण्याचे खड्डे खणून त्याभोवती बेताल ठेके देत नाचतो. खड्ड्यात पडू या भीतीने कुढतो, पण नाचत राहतो. हा नाच नाचण्यापेक्षा मनाचे हे खेळ समजून घ्या. आपल्या बाळांचे जेवण सांडणे, धडपडणे, रडणे, हसणे, अगदी काहीही जसे ‘गोड’ किंवा ‘किऊट’ वाटते तसेच स्वत:च्या मनाच्या नाचालाही गोड मानून हसत रहा. त्या बेताल नृत्याला छान समजूतदारीचा ठेका द्या. मनाच्या खेळांची मजा घ्या. त्यात व्यापून जाऊ नका. आनंदाचा ताल धरून मनासोबत नाचा. रोज नाचा. आनंद घ्या जगण्याचा. मनाच्या उड्यांचा. उत्तरे शोधू नका. अनुभव घ्या. मनासोबत आनंदाने नाचताना खुशाल म्हणा ‘‘आय ऍम अ डिस्को डान्सर.’’
मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदूला रेडिएशनचा धोका असतो. पण त्यामुळे मोबाईल वापरणे बंद करता येणार नाही. म्हणूनच मोबाईल वापरणार्यांनी ही काळजी जरूर घ्यावी. मोबाईलमधील कमीत कमी रेडिएशन मेंदूपर्यंत पोहोचावे यासाठी या काही साध्या साध्या गोष्टी जरूर करा.
- ऍडवेयरपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या इंटरनेट एक्सप्लोररमधील ‘पॉपअप ब्लॉकरचा’ वापर करणे. त्यासाठी इंटरनेट एक्सप्लोर - प्रॉपरटीस - प्रायव्हसी - टर्न ऑफ पॉपअप ब्लॉकरवरील टीक काढून टाकणे. यामुळे तुमच्या संगणकातून कोणत्याही संकेतस्थळावरील पॉपअप कायमच्या बंद होतील. जर तुम्हाला काही विशिष्ट संकेतस्थळावरील पॉपअप बघायच्या असतील तर तुम्ही याच ऑप्शनमधील ‘आलाऊ वेबसाईट’चा वापर करून त्या संकेतस्थळावरील पॉपअप बघू शकता.
आयुष्यात विविध प्रकारचे प्रसंग आणि विविध प्रकारची माणसं भेटतात. चांगले बूट नाही म्हणून रडणारेही भेटतात, तसेच कुबड्यांवर चालत हसणारेही भेटतात. शिक्षणाचा कंटाळा करून थकलेलेही सापडतील आणि शाळेच्या वर्गाबाहेर लपून शिकणारेही दिसतील. ‘प्रॉब्लेम’ या शब्दाने सर्वांचा ताबाच घेतला आहे. संकट म्हणजे खूप मोठे तुफान आणि प्रॉब्लेम म्हणजे छोटे-मोठे वादळ असा समज करून जगणारे नियमितपणे आपल्या बिचारेपणाचे पालन-पोषण करीत असतात. अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाणे प्रत्येकाला फार छान जमते. काहीजण तर घाबरण्याकरिता असली नसलेली सगळी ताकत लावतात. प्रॉब्लेम काय, तो कसा सोडवावा याकडे दुर्लक्ष होते. राहते काय तर घाबरणे. बुडणार्याचा मृत्यू होतो ५०ज्ञ् पाण्याच्या प्रभावाने आणि ५०ज्ञ् भीतीने. भीतीने शस्त्र टाकले तर ‘विजय’ शत्रूला भेट म्हणून दिल्यासारखेच नाही का? बर्याचदा आपणच आपले शत्रू बनतो. नकारार्थी गणिते मांडून आपणच आपल्या जीवनाची उत्तरे चुकवितो. भय सर्वात मोठा राक्षस आहे. या राक्षसाला मारायला देवाने पाठवलेले दूत म्हणजे संयम आणि युक्ती. भय आपल्या मेंदूला व्यापून काही सुचू देत नाही. या भयाला मनात शिरू देऊ नका. भय आणि भैया एकदा का शिरले की, निघता निघत नाहीत. लॅन्स आर्मस्ट्रँग नावाचा एक खेळाडू होता. सायकल रेसिंगचा बादशहा. सायकलिंगच्या सर्व रेस जिंकण्याची सवय असलेला लॅन्स कधीच घाबरला नाही. ‘हरण्याला’ही नाही आणि ‘कॅन्सर’लाही नाही. तो लढत राहिला, कॅन्सरशी नाही तर त्याच्या मनातील ‘भयाशी.’ तो सांगतो, ‘‘मी रोज सकाळी उठून एक युक्ती करायचो. आरशात पाहून स्वत:ला सांगायचो की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम दिवस आहे. मला हवे ते आणि हवे तसे मिळणार. मी आजारी नाही. आजाराला मी झालोय. त्यामुळे आजाराची मला दया येते.’’ जगण्याची तीव्र इच्छा, जगण्याची ४०ज्ञ् संभावना आणि लढण्याची १००ज्ञ् तयारी असल्यामुळे अशा परिस्थितीतही लॅन्स जिंकतच राहिला. कॅन्सरनी त्रासलेल्यांना आत्मविश्वास कसा मिळवावा व उपाय करण्यासाठी एक संस्थादेखील काढली. कधी कधी शक्ती संपली वाटले की, युक्तीचा वापर करा. संकट म्हणजे शेवट नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग ‘भय पळवणे, युक्ती लढवणे.’
‘१५ जूनला गुगल आपला महत्त्वाकांक्षी ‘लॅपटॉप गुगल क्रोम बुक’ जगासमोर आणणार आहे. गुगल क्रोम बुक गेल्या दोन दशकांच्या मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणालीला थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. गुगलच्या ‘ऍण्ड्रॉईड’ या मोबाईल प्रणालीने नोकियाच्या ‘सिंबियन’ या मोबाईल प्रणालीला अक्षरश: वर्षभरातच मागे टाकले व मोबाईल विश्वात स्वत:चा दबदबा निर्माण केला. असेच काहीसे गुगल त्यांच्या ‘क्रोम बुक’ या लॅपटॉपद्वारे करेल असे त्यांचे वैशिष्ट्य बघून वाटते. सध्या तरी सोशल नेटवर्किंग ब्लॉग्ज व इंटरनेटच्या जगात फक्त चर्चा आहे ती गुगल क्रोम बुकची व त्यांच्या वैशिष्ट्यांची.
कायमचे डोळे मिटून हे जग सोडून जाताना दोन अंध व्यक्तिंना हे जग पाहण्याची संधी तुम्ही केलेल्या नेत्रदानामुळे मिळते. म्हणूनच नेत्रदान हे श्रेष्ठदानापैकी एक मानले जाते. पण आजही नेत्रदानाविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजचा अंधार दूर करण्यासाठी आणि नेत्रदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० जूनला जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...
Introduction
- जांभळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे.